शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
4
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
5
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
6
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
7
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
8
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
9
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
10
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
11
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
12
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
13
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
14
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
15
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
16
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
17
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
18
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
19
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
20
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

आमचे दुकान बंद झाले - तुमचे होऊ देऊ नका!

By admin | Updated: August 5, 2014 01:08 IST

लोकसभा निवडणुकीत प्रचारात आपण कमी पडलो. सभांना गर्दी होत होती, लोक प्रतिसाद देत होते, मात्र निकालात चित्र उलटेच झाले. आमचे दिल्लीतील दुकान बंद झाले. आता मुंबईवाल्यांनो तुमचे

मुत्तेमवार, वासनिकांचा मुख्यमंत्र्यांवर रोख : कडेवर बसलेल्यांना तिकीट देऊ नकानागपूर : लोकसभा निवडणुकीत प्रचारात आपण कमी पडलो. सभांना गर्दी होत होती, लोक प्रतिसाद देत होते, मात्र निकालात चित्र उलटेच झाले. आमचे दिल्लीतील दुकान बंद झाले. आता मुंबईवाल्यांनो तुमचे बंद होऊ देऊ नका. वेळीच जागे व्हा. आतापासून कामाला लागा. लोकसंपर्क असलेल्या व ‘इलेक्टिव्ह मेरिट’असलेल्यांना उमेदवारी द्या, कडेवर बसलेल्यांना तिकीट देऊ नका. तरच आमदार वाढतील व तुम्ही मुख्यमंत्री व्हाल, अशा शब्दात माजी खासदार विलास मुत्तेमवार, मुकुल वासनिक यांच्यासह जुन्याजाणत्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर नेम साधला. काँग्रेसचा विदर्भ विभागीय मेळावा वसंतराव देशपांडे सभागृहात पार पडला. मेळाव्यात नेत्यांनी सामान्य कार्यकर्त्यांच्या मनातील भावना मांडत राज्य सरकारला आरसा दाखविण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री मेळाव्यात उशिरा पोहोचले. त्यांच्या पूर्वी जुन्याजाणत्या नेत्यांनी आपल्यासह काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यावर कसा अन्याय होत आहे, याचा पाढा वाचला. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुत्तेमवार, वासनिक, पालकमंत्री नितीन राऊत यांनी रोखठोक भूमिका मांडली. मुत्तेमवार म्हणाले, राज्यात फक्त दोनच नाव समोर येतात. मुख्यमंत्री चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे; ‘हम दो और हमीच दो’ असे सुरू आहे. आमची हरकत नाही. मुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन नेतृत्व करावे. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिल्ली काबीज केली, आता त्यांना आर्थिक राजधानी मुंबई काबीज करायची आहे, हे ध्यानात ठेवा. लोक म्हणतात, मुख्यमंत्री प्रामाणिक आहेत. पण आपले पंतप्रधानही प्रामाणिक होते. निकालात काय झाले? याचा विचार करा. त्यामुळे आता तिकीट देताना जवळचा, दूरचा असे लाड करू नका, कार्यकर्त्यांना न्याय द्या, अशी भूमिका त्यांनी मांडली. मुकुल वासनिक म्हणाले, नेत्यांमध्ये पराभवाची खंत दिसत नाही. असे बोलले जाते की, काही मंत्री मुख्यमंत्र्यांपासून दूर आहेत. काही आमदार मंत्र्यांपासून दूर आहेत. ही परिस्थिती सुधारली नाही तर वेळ हातून जाईल, असा सूचक इशारा त्यांनी दिला. पक्षातील व शासकीय पदे लोकसभा व विधानसभा लढलेल्या उमेदवारांच्या शिफारशीनेच दिले जातात. असेच होत राहिले तर नवे कार्यकर्ते कसे जुळतील. लोकसभेच्या पराभवाची अनेक कारणे असली तरी, कार्यकर्त्यांना शासनात भागीदारी मिळाली नाही, हे देखील एक महत्त्वाचे कारण असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर नेम साधला. पालकमंत्री नितीन राऊत म्हणाले, कठीण परिस्थितीत विदर्भ नेहमी काँग्रेसला साथ देतो. मात्र, नेत्यांनी विदर्भाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. विदर्भातील कार्यकर्त्यांचा शासनदरबारी सन्मान व्हावा. वेगळ्या विदर्भाच्या मागणीचा सन्मान करा, असेही ते म्हणाले. विधानसभेचे उपाध्यक्ष वसंत पुरके म्हणाले, सत्ता मिळाल्यानंतरही नेत्यांनी सामान्यासारखे वागले पाहिजे. सहज उपलब्ध होणारी लीडरशिप हवी. नाराजीतून बाहेर गेलेली माणसे जवळ आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आ. हरिभाऊ राठोड म्हणाले, राज्य सरकारने घेतलेले लोकहिताचे निर्णय आता समोर येत आहेत.मेघेंविरोधात नाराजीचा सूरमेळाव्यात माजी खा. दत्ता मेघे यांच्या भाजप प्रवेशाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. वसंत पुरके म्हणाले, काही लोक पदाशिवाय जगू शकत नाही. सुरुवात काँग्रेसपासून झाली. राष्ट्रवादीत गेले. पुन्हा काँग्रेसमध्ये आले. आता भाजपमध्ये गेले. अशा नेत्यांचा हिशेब करा, असे आवाहन त्यांनी केले. विलास मुत्तेमवार यांनीही मेघेंवर नेम साधला. काँग्रेसने मेघेंना सर्वकाही दिले तरी भाजपात गेले. आता तिकडेही वाईट गत आहे, अशी टीका त्यांनी केली.