शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
4
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
5
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
7
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
8
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
9
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
10
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
11
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
12
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
13
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
14
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
15
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
16
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
17
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
18
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
19
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
20
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट

आपले आयुष्य हेच आपले मित्र

By admin | Updated: June 12, 2016 02:37 IST

जैन संत आचार्य पुष्पदंतसागरजी महाराज यांचे शिष्य मुनीश्री प्रतीकसागरजी महाराज यांनी शनिवारी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जाऊन तेथील कैद्यांना प्रवचनात उपदेश दिले.

मुनीश्री प्रतीकसागरजी महाराज यांचे कारागृहातील कैद्यांना संबोधन नागपूर : जैन संत आचार्य पुष्पदंतसागरजी महाराज यांचे शिष्य मुनीश्री प्रतीकसागरजी महाराज यांनी शनिवारी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जाऊन तेथील कैद्यांना प्रवचनात उपदेश दिले. उपदेशात त्यांनी बंदिवानांना स्वत:च्या जीवनाशी मैत्री करा, असे आवाहन केले.महाराजांनी आपल्या प्रवचनाची सुरुवात भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या जीवनातील एक प्रसंग सांगून केली. त्यांनी सांगितले की, डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी एकदा रेल्वे प्रवासादरम्यान स्टेशनवर लोकांना बादलीने पाणी पाजणे सुरू केले. हे पाहून लोकांनी त्यांना प्रश्न केला. त्यावर डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी सर्व मानवांमध्ये एक समान आत्मा विद्यमान असल्याचे उत्तर दिले होते. प्रतीकसागरजी महाराज पुढे म्हणाले, डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्यामध्ये मानवीयतेची शक्ती होती. समता भावनेची हीच शक्ती श्रीराम, श्रीकृष्ण, गुरू नानकदेव, भगवान महावीर आणि बुद्ध यांच्यात होती. प्रत्येक माणसामध्ये या शक्तीचा वास असतो. महापुरुषांनी या शक्तीचा उपयोग प्राणिमात्रांच्या उत्थानासाठी केला व त्यामुळेच ते महान झाले. स्वत:मधील शक्तीचा जो जसा उपयोग करतो, त्याचे व्यक्तिमत्त्व तसे होते. ती व्यक्ती जगात राहून त्याचप्रमाणे कार्य करीत असते. मुनीश्री पुढे म्हणाले, तुम्हाला जन्म देणाऱ्या आईने तुम्ही मोठे व्यक्ती होण्याचे स्वप्न पाहिले असेल. मात्र तुम्ही स्वत:च्या आंतरिक शक्तींना ओळखले नाही. या आंतरिक शक्तींचा दुरुपयोग केल्यानेच आज कारागृहात जावे लागल्याचे ते म्हणाले. मात्र या ठिकाणाला कारागृह समजू नका. हे कारागृह नसून तुम्हाला चांगल्या मार्गावर नेण्याचे स्थान आहे. याला कारागृह नव्हे सुधारगृह समजून जीवन जगा. जो व्यक्ती आपल्या धर्माचे पालन करतो, तो जीवनात मोठेपण प्राप्त करीत असतो. मुनीश्रींनी सांगितले की, मनुष्याच्या जीवनात कुठल्या ना कुठल्या समस्या नेहमीच येत असतात. मात्र धर्माच्या मार्गाने चालूनच या समस्यांचे समाधान काढले जाऊ शकते. वाईट मार्गाने चालल्यास जीवनात वाईटच होईल. जीवनात वाईट मार्गाने नेणारे बरेच मित्र भेटतात. त्यामुळे कुणाला मित्र बनविण्यापेक्षा स्वत:च्या आयुष्याशी मैत्री करा. आयुष्याला मित्र बनविले तर तुम्ही जीवनाला समृद्ध कराल आणि जीवन तुम्हाला समृद्ध करेल. कारागृहाला आयुष्य बदलण्याचे माध्यम माना. येथून बाहेर पडताना आपल्या कार्याने समाजात मोठे नाव करण्याचा संकल्प घ्या. येथे केवळ वेळ घालविण्यासाठी नाही, तर स्वत:ला बदलण्यासाठी आले आहात, असे गृहित धरा. स्वत:चे मन शांत ठेवा, असे आवाहन मुनीश्री यांनी बंदिवानांना केले. शनिवारी सकाळी मुनीश्री प्रतीकसागरजी महाराज मोठ्या संख्येने उपस्थित श्रावक-श्राविकांसह कारागृहात पोहचले. यावेळी कारागृहाचे उपअधीक्षक सुनील निघोट, जेल ग्रुप वनचे के.बी. मिरासे, जेलर कन्नेवार, करघे, योगेश पाटील, संजीव हटवादे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)