शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

आमचा जाहीरनामा; मालकी पट्ट्याचा कायदा व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 10:33 IST

महाराष्ट्रातही झोपडपट्टीवासीयांना मालकी पट्टे देण्यासाठी स्वतंत्र कायदा करावा अशी अपेक्षा शहर विकास मंचाचे संयोजक अनिल वासनिक यांनी व्यक्त केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: महाराष्ट्रातही झोपडपट्टीवासीयांना मालकी पट्टे देण्यासाठी स्वतंत्र कायदा करावा अशी अपेक्षा शहर विकास मंचाचे संयोजक अनिल वासनिक यांनी व्यक्त केली आहे.महाराष्ट्र सरकारने शहरातील झोपडपट्टीवासीयांना त्यांच्या घर-जमिनीचे मालकी पट्टे देण्याचे धोरण अवलंबले आहे. यासाठी शासनाने वेळोवेळी शासनादेश काढलेले आहेत. नगर विकास विभाग, गृहनिर्माण, महसूल विभागने हे शासनादेश काढलेले आहेत. शासनादेशात दुरुस्ती करून त्यांची अंमलबजावणी केली जाते. शासनादेशाच्या अधीन राहून झोपडपट्टीधारकांना मालकी पट्टे वाटप करून रजिस्ट्री करून दिली जाते. मात्र महाराष्ट्रात याबाबतचा स्वतंत्र कायदा नाही. वेगवेगळ्या राज्यात झोपडपट्टीधारांना पट्टे वाटप वा जमीन मालकीबाबतचे वेगवेगळे कायदे आहेत. मध्य प्रदेशात पट्टा अ‍ॅक्ट १९८४ अस्तित्वात आहे. ओरिसात द. ओडिसा लॅण्ड राईट टू ड्वेलर्स अ‍ॅक्ट २०१७ अस्तित्वात आहे. महाराष्ट्रात पट्टे वाटपाचा शासनादेश असला तरी तो सक्षम व परिपूर्ण ठरत नाही. सत्तांत्तर झाले की धोरणे बदलतात. त्यामुळे धोरणात एकरूपता नसते. याचा विचार करता महाराष्ट्रातही झोपडपट्टीवासीयांना मालकी पट्टे देण्यासाठी स्वतंत्र कायदा करावा.सर्वाधिक महसूल देणाऱ्या व्यापाऱ्यांचा विचार व्हावानिवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष गरीब, सामान्य, शेतकऱ्यांचा विचार करतात आणि व्यापाऱ्यांकडे कानाडोळा करतात. पण यावर्षीच्या निवडणुकीत देशात सर्वाधिक रोजगार आणि शासनाच्या तिजोरीत महसूल देणाऱ्या व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या योजनांचा सर्वच राजकीय पक्षांनी जाहीरनाम्यात समावेश करावा असे मत चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्टी अ‍ॅण्ड ट्रेडचे अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी व्यक्त केले आहे.व्यापाऱ्यांचे हित जोपासताना राजकीय पक्षांनी भारतात विदेशी गुंतवणुकीला परवानगी देऊ नये. विदेशात २ ते ३ टक्के व्याजदराने कर्ज मिळते, पण देशात १२ ते १५ टक्के कर्ज घेऊन व्यवसाय करावा लागतो. या तफावतीमुळे देशातील व्यापाऱ्यांचा विदेशी कंपन्यांचा स्पर्धेत टिकाव लागत नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांना बँकांकडून अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याची घोषणा जाहीरनाम्यात असावी.सहजसोपा व्यवसाय आणि मेक इंडियाची गोष्ट होते तेव्हा राजकीय पक्षांनी छोट्या व्यापाऱ्यांना स्कीम देण्याची घोषणा करावी. उद्योग आणि व्यापाऱ्यांच्या भरवशावर विकासाची गोष्ट करणाऱ्या राजकीय पक्षांनी त्यांच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. जीएसटीचा करटप्पा कमी करून करप्रक्रिया सरळसोपी करावी. मासिक रिटर्नच्या झंझटीपासून व्यापाऱ्यांना मुक्तता द्यावी. एक देश, एक कर, यानुसार व्यापाऱ्यांवर अन्य करांचा भार टाकू नये. त्यामुळे जटील प्रक्रिया दूर होईल. व्यापाऱ्यांवरील जुन्या व्हॅटचा भार कमी करून सर्व व्यापाऱ्यांना जीएसटीच्या प्रक्रियेत आणण्याची घोषणा राजकीय पक्षांनी जाहीरनाम्यात करावी. उद्योजक आणि व्यापारी सर्वाधिक कर भरणारा देशाचा महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यांचा कडेलोट होणार नाही, यावर सर्वच राजकीय पक्षांनी कटाक्षाने भर देण्यावर लक्ष केंद्रित करावे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक