शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
4
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
5
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
6
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
7
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
8
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
9
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
10
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
11
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
12
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
13
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
14
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
15
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
16
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
17
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
18
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
19
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!

अनाथ अभिषेकला मिळाले हक्काचे घर ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:10 IST

नागपूर -अनाथांना आधार देणे, त्यांचे दु:ख कवटाळणे ही मानवसेवा आणि हीच ईश्वरसेवा आहे. राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज यांचा हा संदेश ...

नागपूर -अनाथांना आधार देणे, त्यांचे दु:ख कवटाळणे ही मानवसेवा आणि हीच ईश्वरसेवा आहे. राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज यांचा हा संदेश स्वीकारून सामाजिक कार्यकर्त्यांनी बालसदनला राहणाऱ्या अनाथ अभिषेक पराडे या विद्यार्थ्याचा निवासाचा प्रश्न साेडविला. त्याला हक्काचे घर देऊन त्याच्या वेदनांवर फुंकर घातली.

पाेलीस लाईन टाकळी चाैक, काटाेल राेड येथे बालसदन आहे. विदर्भ सहायता समितीद्वारे संचालित या बालसदनात आईवडिलांचे प्रेम गमाविलेली अनाथ मुले, तांड्या-पाड्यावर राहणारी मुले, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले, गरीब पालकांच्या आर्थिक विवंचनेतून शिकू न शकणारी मुले येथे राहतात आणि शिकतात. तुकडाेजी महाराजांची ग्रामगीता हीच या बालसदनची प्रेरणा. या बालसदनमध्ये सातव्या वर्गात असलेल्या अभिषेकचे एक दिवस आगमन झाले. बालपणी आईचे छत्र हरपले तर माेलमजुरी करणाऱ्या वडिलांनीही एक दिवस जगाचा निराेप घेतला. पुरता पाेरका झालेला अभिषेक आता कुणाच्या आधाराने राहील, हा प्रश्न हाेता. त्यामुळे त्याच्या शिक्षिकेने त्याला येथे आणले हाेते. तेव्हापासून हे बालसदनच त्याचे आधारवड झाले. सातवीत असताना आलेला अभिषेक आज बारावीचे शिक्षण घेत आहे. मात्र वयाचे बंधन असल्याने बारावीनंतर बालसदन सुटेल व आपण पुन्हा अनाथ हाेऊ हे दु:स्वप्न त्याला अस्वस्थ करीत हाेते. अशावेळी मदतीसाठी धावले प्रशांत हाडके.

प्रशांत हाडके हे शिक्षक. मानवसेवेची निष्ठा बाळगणारे प्रशांत बालसदनच्या मुलांनाही शिकवायला येतात व यातूनच या मुलांशी त्यांची मैत्री जुळली. त्यांच्या मार्गदर्शनात मुलांनी श्रमदानातून या परिसरात ‘श्रीगुरुदेव नर्सरी’ फुलविली. येथील मुले आपली सुख-दु:खे सहज त्यांच्यासमाेर बाेलून जातात. त्यांच्या डाेळ्यातून अभिषेकची उदासीनता सुटू शकली नाही. त्यांनी विचारले तर, बारावीनंतर मी कुठे राहणार? या त्याच्या प्रश्नाने त्याच्या निराशेचे कारण समजले. अभिषेकच्या वडिलांनी तयार केलेले पकड झाेपडे असल्याची बाब चर्चेतून पुढे आली. त्यानंतर प्रशांत यांनी अभिषेकला त्याचे घर बांधून द्यायचे, हा संकल्प केला. त्यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून मदत घेतली. ते झाेपड कचरा व झाडाझुडपांनी वेढले हाेते. सर्वांच्या श्रमदानातून ते साफ करण्यात आले. गेल्या वर्षी बांधकामाचे भूमिपूजन झाले आणि हळूहळू ते झाेपडे घराच्या रूपात उभे राहिले. नुकतेच १६ फेब्रुवारीला त्या घरात अभिषेकचा गृहप्रवेशही झाला. त्याला त्याच्या हक्काचे घर मिळाले. अनाथाला आधार देण्याच्या मानवीय संकल्पातून एका निरागस जीवनाचे स्वप्न पूर्ण झाले.