शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

‘त्या’ अतिरेक्यांना हजर ठेवण्याचे आदेश

By admin | Updated: February 6, 2015 00:54 IST

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली-सैलानी येथील दहशतवादी कृत्य प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपींवर २१ फेब्रुवारी रोजी दोषारोप निश्चित होणार असून या सर्व आरोपींना न्यायालयात

दोषारोप निश्चित होणार: चिखली-सैलानी दहशतवादी कृत्य प्रकरणनागपूर : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली-सैलानी येथील दहशतवादी कृत्य प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपींवर २१ फेब्रुवारी रोजी दोषारोप निश्चित होणार असून या सर्व आरोपींना न्यायालयात हजर ठेवण्याचे आदेश गुरुवारी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयाने नागपूर दहशतवादविरोधी (एटीएस) पथकाला दिले. सीमी आणि इंडियन मुजाहिद्दीनचा सक्रिय कार्यकर्ता जहाल दहशतवादी शाकीर ऊर्फ खलील अकिल खिलजी, अकिल युसुफ खिलजी (४५), जफर हुसैन कुरेशी (३२), मोहम्मद अबरार खान ऊर्फ मुन्ना, अन्वर इब्राहम हुसैन खत्री , अशी या आरोपींची नावे आहेत. त्यापैकी अन्वर हा नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात असून बाकीचे आरोपी वेगवेगळ्या कारागृहात आहेत. आरोपपत्रात एकूण आठ जणांचा समावेश असून त्यापैकी एक चकमकीत ठार झालेला आहे तर दोघे फरार आहेत. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी, बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली आणि सैलानी येथे शिबिरे चालवून दहशतवादी कारवाया केल्या प्रकरणी अकोला एटीएसचे पोलीस निरीक्षक केशव श्यामराव पातोंड यांच्या फिर्यादीवरून २७ मार्च २०१२ रोजी भादंविच्या कलम १५३ अ, १२० ब, बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याच्या कलम १०, १३, १५, १६ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. या दहशतवाद्यांपैकी २६ मार्च २०१२ रोजी औरंगाबाद येथे खलील खिलजी याने पोलीस पथकावर गोळीबार केला होता. प्रत्युत्तरात पोलीस पथकानेही दहशतवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला होता. परिणामी खलीलच्या पायाला गोळी लागून तो जखमी झाला होता. आणखी एक दहशतवादी अजहर कुरेशी ऊर्फ वकील कुरेशी हा चकमकीत ठार झाला होता. एटीएसने मोहम्मद अबरार, अन्वर हुसैन आणि खलील खिलजी यांना अटक केली होती. त्यानंतर सैलानी आणि चिखली येथे सापळा रचून अकिल खिलजी आणि जफर कुरेशी यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून मुस्लीम तरुणांना चिथावणारे आक्षेपार्ह साहित्य, रिव्हॉल्व्हर आणि पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. हा खटला चालविण्यासाठी सरकारने पी. के. सत्यनाथन यांना विशेष सरकारी वकील नेमले आहे. (प्रतिनिधी)