शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

संत्र्याच्या मृग बहाराची शक्यता मावळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:07 IST

याेगेश गिरडकर लाेकमत न्यूज नेटवर्क सावरगाव : अंबिया बहाराच्या तुलनेत मृग बहाराचा संत्रा चविष्ट असल्याने बाजारात मृग बहाराच्या संत्र्याला ...

याेगेश गिरडकर

लाेकमत न्यूज नेटवर्क

सावरगाव : अंबिया बहाराच्या तुलनेत मृग बहाराचा संत्रा चविष्ट असल्याने बाजारात मृग बहाराच्या संत्र्याला तुलनेत भरीव मागणी असते. यावर्षी उन्हाळ्यात व पावसाळ्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाच्या सरी बरसल्याने संत्रा झाडांना मृगाचा बहार येण्याची शक्यता आता मावळली आहे. त्यामुळे संत्रा उत्पादकांना निसर्गाच्या या लहरीपणाचा जबर फटका बसला आहे.

नरखेड तालुक्यात १०,२१५ हेक्टरमध्ये संत्र्याच्या फलधारणाक्षम बागा आहेत. यातील आठ हजार हेक्टरमध्ये अंबिया बहाराचे पीक घेतले जाते. मृग बहाराच्या संत्र्याचे पीक घेण्यासाठी झाडांना एप्रिल व मे महिन्यांत किमान ६० दिवसांचा चांगला ताण पडणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकरी एप्रिलपासून बागांना पाणी देणे बंद करतात. मात्र, यावर्षी मे महिन्यात अवकाळी पावसाच्या तालुकाभर चांगल्याच सरी बसरल्या. त्यातच सतत दाेन ते तीन दिवस ढगाळ वातावरणही हाेते. या प्रतिकूल वातावरणाचा फटका संत्र्याच्या मृग बहाराला बसला, पूर्वमशागतीची कामे व्यवस्थित पूर्ण करणे शक्य झाले नाही, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली असून, याला डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्रज्ञ डाॅ. प्रदीप दवणे यांनी दुजाेरा दिला आहे. मृग बहाराच्या संत्र्याची फूट हाेण्याची शक्यता आता मावळल्याने, तसेच संत्र्याच्या बागांमध्ये इतर पीक घेणे शक्य नसल्याने ती शेती पेरणीविना ठेवावी लागते. त्यामुळे संत्रा उत्पादकांवर आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे.

लिंबूवर्गीय फळझाडांना बहर येण्यासाठी झाडाची वाढ करणारे अन्नद्रव्य (कर्ब/नत्र) वाढीकरिता खर्च न होता त्या अन्नद्रव्यांचा संचय होणे आवश्यक असते. अन्नद्रव्यांचा संचय झाडाच्या फांद्यांमध्ये प्रमाणबद्ध झाल्यावर पोषक हवामान मिळताच बहराची फुले नवतीसोबत दिसू लागतात. बहर धरणे म्हणजे, झाडांना पाण्याचा ताण देऊन विश्रांती देणे हाेय. निसर्गतः संत्रा-मोसंबी फळझाडास वर्षातून तीनदा बहर येतो. अवकाळी पावसामुळे झाडांचा ताण तुटला गेल्याने मृग बहर फुटण्याची शक्यता नाही, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी डाॅ. याेगिराज जुमडे यांनी दिली.

...

१५० ते २०० कोटी रुपयांचे नुकसान

अंबिया बहाराच्या संत्र्याचे अधिक पीक घेतले जात असले तरी मृग बहाराच्या संत्र्याला बाजारात दरवर्षी चांगला भाव मिळताे. जानेवारी -२०२१ मध्ये मृग बहाराच्या संत्र्याचे दर ६२ हजार रुपये प्रतिटन झाले हाेते. तुलनेत अंबिया बहाराच्या संत्र्याला ऑक्टाेबर-२०२० मध्ये २० ते २२ हजार रुपये प्रतिटन भाव मिळाला हाेता. संत्र्याच्या भावातील तफावत लक्षात घेत अवकाळी पावसामुळे नरखेड तालुक्यातील संत्रा उत्पादकांचे किमान १५० ते २०० काेटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

...

संत्र्याचे तीन बहार

संत्रा झाडांना वर्षभरात तीनदा फलधारणा हाेते. मृग नक्षत्रात काेसळलेल्या पावसामुळे जून-जुलैमध्ये फलधारणेस मृग बहार, हस्त नक्षत्रात म्हणजेच ऑक्टाेबरमध्ये हाेणाऱ्या फलधारणेस हस्त बहार आणि शिशिर ऋतूत म्हणजेच जानेवारी व फेब्रुवारीमध्ये हाेणाऱ्या फलधारणेस अंबिया बहार संबाेधले जाते. याच काळात अंब्याला बहार येत असल्याने संत्र्याच्या बहारालाही अंबिया बहार म्हणून ओळखले जाते.

...

वादळामुळे नरखेड तालुक्यातील सात हजार हेक्टरमधील अंबिया बहाराच्या संत्र्याचे नुकसान झाले आहे. याचा अहवाल वरिष्ठांना सादर केला आहे. मृग बहाराची फूट आल्यावर त्यावर सिट्रससिलाचा प्रादुर्भाव आढळतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यावर इमिडा क्लोप्रिड किंवा क्विनॉलफॉस किंवा थायोमिथॉक्साम या औषधांची फवारणी करावी.

-डॉ. योगिराज जुमडे,

तालुका कृषी अधिकारी, नरखेड

...

यावर्षी मृग नक्षत्राआधीपासूनच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे मृग बहाराच्या फुटीसाठी आवश्यक वातावरण तयार झाले. सतत तिसऱ्या वर्षी मृग बहाराच्या फुटीवर परिणाम झाला आहे.

-नंदलाल मोवाडे,

संत्रा उत्पादक,

आग्रा, ता. नरखेड

...