शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

संत्र्याच्या मृग बहाराची शक्यता मावळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:07 IST

याेगेश गिरडकर लाेकमत न्यूज नेटवर्क सावरगाव : अंबिया बहाराच्या तुलनेत मृग बहाराचा संत्रा चविष्ट असल्याने बाजारात मृग बहाराच्या संत्र्याला ...

याेगेश गिरडकर

लाेकमत न्यूज नेटवर्क

सावरगाव : अंबिया बहाराच्या तुलनेत मृग बहाराचा संत्रा चविष्ट असल्याने बाजारात मृग बहाराच्या संत्र्याला तुलनेत भरीव मागणी असते. यावर्षी उन्हाळ्यात व पावसाळ्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाच्या सरी बरसल्याने संत्रा झाडांना मृगाचा बहार येण्याची शक्यता आता मावळली आहे. त्यामुळे संत्रा उत्पादकांना निसर्गाच्या या लहरीपणाचा जबर फटका बसला आहे.

नरखेड तालुक्यात १०,२१५ हेक्टरमध्ये संत्र्याच्या फलधारणाक्षम बागा आहेत. यातील आठ हजार हेक्टरमध्ये अंबिया बहाराचे पीक घेतले जाते. मृग बहाराच्या संत्र्याचे पीक घेण्यासाठी झाडांना एप्रिल व मे महिन्यांत किमान ६० दिवसांचा चांगला ताण पडणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकरी एप्रिलपासून बागांना पाणी देणे बंद करतात. मात्र, यावर्षी मे महिन्यात अवकाळी पावसाच्या तालुकाभर चांगल्याच सरी बसरल्या. त्यातच सतत दाेन ते तीन दिवस ढगाळ वातावरणही हाेते. या प्रतिकूल वातावरणाचा फटका संत्र्याच्या मृग बहाराला बसला, पूर्वमशागतीची कामे व्यवस्थित पूर्ण करणे शक्य झाले नाही, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली असून, याला डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्रज्ञ डाॅ. प्रदीप दवणे यांनी दुजाेरा दिला आहे. मृग बहाराच्या संत्र्याची फूट हाेण्याची शक्यता आता मावळल्याने, तसेच संत्र्याच्या बागांमध्ये इतर पीक घेणे शक्य नसल्याने ती शेती पेरणीविना ठेवावी लागते. त्यामुळे संत्रा उत्पादकांवर आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे.

लिंबूवर्गीय फळझाडांना बहर येण्यासाठी झाडाची वाढ करणारे अन्नद्रव्य (कर्ब/नत्र) वाढीकरिता खर्च न होता त्या अन्नद्रव्यांचा संचय होणे आवश्यक असते. अन्नद्रव्यांचा संचय झाडाच्या फांद्यांमध्ये प्रमाणबद्ध झाल्यावर पोषक हवामान मिळताच बहराची फुले नवतीसोबत दिसू लागतात. बहर धरणे म्हणजे, झाडांना पाण्याचा ताण देऊन विश्रांती देणे हाेय. निसर्गतः संत्रा-मोसंबी फळझाडास वर्षातून तीनदा बहर येतो. अवकाळी पावसामुळे झाडांचा ताण तुटला गेल्याने मृग बहर फुटण्याची शक्यता नाही, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी डाॅ. याेगिराज जुमडे यांनी दिली.

...

१५० ते २०० कोटी रुपयांचे नुकसान

अंबिया बहाराच्या संत्र्याचे अधिक पीक घेतले जात असले तरी मृग बहाराच्या संत्र्याला बाजारात दरवर्षी चांगला भाव मिळताे. जानेवारी -२०२१ मध्ये मृग बहाराच्या संत्र्याचे दर ६२ हजार रुपये प्रतिटन झाले हाेते. तुलनेत अंबिया बहाराच्या संत्र्याला ऑक्टाेबर-२०२० मध्ये २० ते २२ हजार रुपये प्रतिटन भाव मिळाला हाेता. संत्र्याच्या भावातील तफावत लक्षात घेत अवकाळी पावसामुळे नरखेड तालुक्यातील संत्रा उत्पादकांचे किमान १५० ते २०० काेटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

...

संत्र्याचे तीन बहार

संत्रा झाडांना वर्षभरात तीनदा फलधारणा हाेते. मृग नक्षत्रात काेसळलेल्या पावसामुळे जून-जुलैमध्ये फलधारणेस मृग बहार, हस्त नक्षत्रात म्हणजेच ऑक्टाेबरमध्ये हाेणाऱ्या फलधारणेस हस्त बहार आणि शिशिर ऋतूत म्हणजेच जानेवारी व फेब्रुवारीमध्ये हाेणाऱ्या फलधारणेस अंबिया बहार संबाेधले जाते. याच काळात अंब्याला बहार येत असल्याने संत्र्याच्या बहारालाही अंबिया बहार म्हणून ओळखले जाते.

...

वादळामुळे नरखेड तालुक्यातील सात हजार हेक्टरमधील अंबिया बहाराच्या संत्र्याचे नुकसान झाले आहे. याचा अहवाल वरिष्ठांना सादर केला आहे. मृग बहाराची फूट आल्यावर त्यावर सिट्रससिलाचा प्रादुर्भाव आढळतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यावर इमिडा क्लोप्रिड किंवा क्विनॉलफॉस किंवा थायोमिथॉक्साम या औषधांची फवारणी करावी.

-डॉ. योगिराज जुमडे,

तालुका कृषी अधिकारी, नरखेड

...

यावर्षी मृग नक्षत्राआधीपासूनच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे मृग बहाराच्या फुटीसाठी आवश्यक वातावरण तयार झाले. सतत तिसऱ्या वर्षी मृग बहाराच्या फुटीवर परिणाम झाला आहे.

-नंदलाल मोवाडे,

संत्रा उत्पादक,

आग्रा, ता. नरखेड

...