शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
4
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
5
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
7
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
8
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
9
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
10
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
11
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
12
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
13
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
14
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
15
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
16
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
17
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
18
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
19
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
20
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  

सत्र न्यायालयातील सुनावणी प्रक्रियेवर आक्षेप

By admin | Updated: February 27, 2015 02:15 IST

सत्र न्यायालयातील कुश हत्याकांडाच्या सुनावणी प्रक्रियेवर बचाव पक्षाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमक्ष आक्षेप उपस्थित केले आहेत.

कुश कटारिया हत्याकांडनागपूर : सत्र न्यायालयातील कुश हत्याकांडाच्या सुनावणी प्रक्रियेवर बचाव पक्षाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमक्ष आक्षेप उपस्थित केले आहेत. सत्र न्यायालयाने बाल साक्षीदार शुभम बैद व रिदम पुरिया (दोन्ही कुशचे मित्र) यांना प्रकरणातील विसंगतीवर तपासण्याची संधी दिली नाही, अशी बचाव पक्षाची तक्रार आहे. यामुळे सत्र न्यायालयामध्ये नव्याने सुनावणी घेऊन दोन्ही बाल साक्षीदारांना तपासण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांनी गुरुवारी यासंदर्भात आदेश दिलेत. आदेशानुसार, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश के. के. सोनवणे यांच्यासमक्ष बाल साक्षीदारांना तपासण्यात येईल. यासाठी सरकारी व बचाव पक्षाला ३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता न्या. सोनवणे यांच्यासमक्ष हजर व्हायचे आहे. यानंतर न्या. सोनवणे यांना १६ मार्चपर्यंत बाल साक्षीदारांचे अतिरिक्त बयान नोंदविण्याची कार्यवाही पूर्ण करून १८ मार्चपर्यंत उच्च न्यायालयात अहवाल द्यायचा आहे. बाल साक्षीदारांना तपासताना आरोपी आयुष पुगलियालाही उपस्थित ठेवले जाणार आहे. बाल साक्षीदारांनी पोलिसांना बयान देताना कुशला आरोपी आयुषच्या अ‍ॅक्टिवा गाडीमागे धावताना पाहिले असे सांगितले होते तर, सत्र न्यायालयात बयान देताना कुशला आरोपी आयुषच्या अ‍ॅक्टिवा गाडीवर बसताना पाहिले अशी माहिती दिली होती. बयानातील या विसंगतीवर दोन्ही बाल साक्षीदारांना तपासण्याची संधी मिळाली नाही असे बचाव पक्षाचे वकील ए. एम. रिझवी यांनी उच्च न्यायालयाला सांगितले. संबंधित न्यायाधीशांनी बाल साक्षीदारांऐवजी थेट तपास अधिकाऱ्यास तपासण्यास सांगितले याकडेही त्यांनी लक्ष वेधले. विशेष सरकारी वकील राजेंद्र डागा यांनी या मुद्याचा विरोध केला. संबंधित न्यायाधीशांनी स्वत:हून संधी नाकारली नसून बचाव पक्षाच्या विनंतीवरून थेट तपास अधिकाऱ्यास तपासण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले होते, असे डागा यांनी सांगितले. याशिवाय त्यांनी स्वतंत्र अर्ज दाखल करून उच्च न्यायालयाने स्वत:समक्ष बाल साक्षीदारांना तपासून घ्यावे किंवा सत्र न्यायालयाला आवश्यक निर्देश द्यावे अशी विनंती केली. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता ही जबाबदारी सत्र न्यायालयावर सोपविली आहे. सत्र न्यायालयाने आयुषला अपहरण, हत्या व पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. परंतु, त्याला भादंविच्या कलम ३६४-अ (खंडणीसाठी अपहरण) मधून दोषमुक्त करण्यात आले आहे. आयुषने त्याच्या शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात अपील केले आहे. याशिवाय शासनाच्या दोन अपील आहेत. एक अपील आयुषला फाशीची शिक्षा देण्यासाठी, तर दुसरे अपील भादंविच्या कलम ३६४ (अ)मधून सुटकेला आव्हान देणारे आहे. उच्च न्यायालयाने या तिन्ही याचिकांवर २५ फेब्रुवारीपासून अंतिम सुनावणी घेण्यास सुरुवात केली होती. दरम्यान हा विसंगतीचा मुद्दा उपस्थित झाला. उच्च न्यायालयात या प्रकरणावर आता २५ मार्चपासून पुढील सुनावणी करण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)