शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

भूसंपादन कायद्याला विरोध

By admin | Updated: April 18, 2015 02:37 IST

संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने २०१३ च्या भूसंपादन कायद्यात शेतकरी हिताच्या बाबींचा सर्वांने विचार केला होता.

नागपूर : संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने २०१३ च्या भूसंपादन कायद्यात शेतकरी हिताच्या बाबींचा सर्वांने विचार केला होता. त्यात असलेल्या चांगल्या बाबी आपण केल्या असे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला खोटे सांगत आहेत. उलट मोदी यांनी या कायद्यातील शेतकरी हिताची कलमे वगळली असून शेतकऱ्यांना विश्वासात न घेता बळजबरीने भूसंपादन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. एवढेच नव्हे तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे मोदींचे वकील बनून देशभरात या कायद्याचे समर्थन करीत फिरत असल्याची टीकाही त्यांनी केली. जयराम रमेश यांनी मोदी सांगत असलेल्या पाच खोट्या गोष्टींचा ऊहापोह केला. ते म्हणाले, शेतकऱ्यांना जमिनीचा चारपट मोबदला देणे, भूसंपादनात होणारे विस्थापन व पुनर्वसन याची जबाबदारी सरकारने घेणे या बाबी आपण केल्याचे मोदी सांगतात. प्रत्यक्षात काँग्रेसने केलेल्या कायद्यात या अटींचा समावेश आहे. भूसंपादनाशी संबंधित १३ कायद्यात एक वर्षात सुधारणा करण्याची अट काँग्रेसने आधीच घातली आहे. ८० टक्के शेतकऱ्यांची संमतीची अट राहिली तर सिंचन प्रकल्प पूर्ण होणार नाही, असे मोदींचे म्हणणे आहे. मात्र. प्रत्यक्षात सरकारी प्रकल्पांसाठी ८० टक्के संमतीची अट कायद्यातच नाही. संरक्षण विभाग व राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रकल्पांना काँग्रेसच्या कायद्यात विशेष दर्जा दिला आहे. त्यामुळे या दोन्हीसाठी भूसंपादन करायचे असेल तर कुठल्याही अटी लागू राहणार नाही, असे कायद्यात नमूद आहे. असे असतानाही मोदी कायद्यात सुधारणा केली नाही तर संरक्षण विभागाचे प्रकल्प रखडतील, असे खोटे सांगत असल्याचे त्यांनी सांगितले. या कायद्याला काँग्रेसचा विरोध असण्याची कारणे सांगताना ते म्हणाले, आता खासगी कंपन्यांसाठी सरकारला शेतकऱ्यांची संमती न घेता भूसंपादन करता येईल. सामाजिक प्रभाव मूल्यांकन करणे, पाच वर्षात प्रकल्प उभारला नाही तर शेतकऱ्याला जमिनी परत करणे या अटी वगळल्या आहेत. इंडस्ट्रिल कॉरिडोअरच्या दोन्ही बाजूला एक किलोमीटरपर्यंत भूसंपादन केले जाणार आहे. खासगी बिल्डर, डेव्हलपर्स, भूमाफिया यांच्यासाठी दरवाजे उघडले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष सुनीता गावंडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)