शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: कलांमध्ये भाजपाची 'एक नंबर' कामगिरी; NDA ची सत्ता राखण्याच्या दिशेनं घोडदौड
2
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
3
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
4
Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर
5
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
6
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
7
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
8
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
9
"माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...", अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
10
बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित
11
जबरदस्त रिटर्न देईल 'ही' स्कीम, केवळ ₹५,००० ची गुंतवणूक देईल ₹२६ लाखांपेक्षा जास्त फंड; पाहा कॅलक्युलेशन
12
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
13
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
14
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
15
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
16
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
17
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
18
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
19
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
20
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादन कायद्याला विरोध

By admin | Updated: April 18, 2015 02:37 IST

संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने २०१३ च्या भूसंपादन कायद्यात शेतकरी हिताच्या बाबींचा सर्वांने विचार केला होता.

नागपूर : संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने २०१३ च्या भूसंपादन कायद्यात शेतकरी हिताच्या बाबींचा सर्वांने विचार केला होता. त्यात असलेल्या चांगल्या बाबी आपण केल्या असे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला खोटे सांगत आहेत. उलट मोदी यांनी या कायद्यातील शेतकरी हिताची कलमे वगळली असून शेतकऱ्यांना विश्वासात न घेता बळजबरीने भूसंपादन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. एवढेच नव्हे तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे मोदींचे वकील बनून देशभरात या कायद्याचे समर्थन करीत फिरत असल्याची टीकाही त्यांनी केली. जयराम रमेश यांनी मोदी सांगत असलेल्या पाच खोट्या गोष्टींचा ऊहापोह केला. ते म्हणाले, शेतकऱ्यांना जमिनीचा चारपट मोबदला देणे, भूसंपादनात होणारे विस्थापन व पुनर्वसन याची जबाबदारी सरकारने घेणे या बाबी आपण केल्याचे मोदी सांगतात. प्रत्यक्षात काँग्रेसने केलेल्या कायद्यात या अटींचा समावेश आहे. भूसंपादनाशी संबंधित १३ कायद्यात एक वर्षात सुधारणा करण्याची अट काँग्रेसने आधीच घातली आहे. ८० टक्के शेतकऱ्यांची संमतीची अट राहिली तर सिंचन प्रकल्प पूर्ण होणार नाही, असे मोदींचे म्हणणे आहे. मात्र. प्रत्यक्षात सरकारी प्रकल्पांसाठी ८० टक्के संमतीची अट कायद्यातच नाही. संरक्षण विभाग व राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रकल्पांना काँग्रेसच्या कायद्यात विशेष दर्जा दिला आहे. त्यामुळे या दोन्हीसाठी भूसंपादन करायचे असेल तर कुठल्याही अटी लागू राहणार नाही, असे कायद्यात नमूद आहे. असे असतानाही मोदी कायद्यात सुधारणा केली नाही तर संरक्षण विभागाचे प्रकल्प रखडतील, असे खोटे सांगत असल्याचे त्यांनी सांगितले. या कायद्याला काँग्रेसचा विरोध असण्याची कारणे सांगताना ते म्हणाले, आता खासगी कंपन्यांसाठी सरकारला शेतकऱ्यांची संमती न घेता भूसंपादन करता येईल. सामाजिक प्रभाव मूल्यांकन करणे, पाच वर्षात प्रकल्प उभारला नाही तर शेतकऱ्याला जमिनी परत करणे या अटी वगळल्या आहेत. इंडस्ट्रिल कॉरिडोअरच्या दोन्ही बाजूला एक किलोमीटरपर्यंत भूसंपादन केले जाणार आहे. खासगी बिल्डर, डेव्हलपर्स, भूमाफिया यांच्यासाठी दरवाजे उघडले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष सुनीता गावंडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)