शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

भूसंपादन कायद्याला विरोध

By admin | Updated: April 18, 2015 02:37 IST

संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने २०१३ च्या भूसंपादन कायद्यात शेतकरी हिताच्या बाबींचा सर्वांने विचार केला होता.

नागपूर : संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने २०१३ च्या भूसंपादन कायद्यात शेतकरी हिताच्या बाबींचा सर्वांने विचार केला होता. त्यात असलेल्या चांगल्या बाबी आपण केल्या असे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला खोटे सांगत आहेत. उलट मोदी यांनी या कायद्यातील शेतकरी हिताची कलमे वगळली असून शेतकऱ्यांना विश्वासात न घेता बळजबरीने भूसंपादन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. एवढेच नव्हे तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे मोदींचे वकील बनून देशभरात या कायद्याचे समर्थन करीत फिरत असल्याची टीकाही त्यांनी केली. जयराम रमेश यांनी मोदी सांगत असलेल्या पाच खोट्या गोष्टींचा ऊहापोह केला. ते म्हणाले, शेतकऱ्यांना जमिनीचा चारपट मोबदला देणे, भूसंपादनात होणारे विस्थापन व पुनर्वसन याची जबाबदारी सरकारने घेणे या बाबी आपण केल्याचे मोदी सांगतात. प्रत्यक्षात काँग्रेसने केलेल्या कायद्यात या अटींचा समावेश आहे. भूसंपादनाशी संबंधित १३ कायद्यात एक वर्षात सुधारणा करण्याची अट काँग्रेसने आधीच घातली आहे. ८० टक्के शेतकऱ्यांची संमतीची अट राहिली तर सिंचन प्रकल्प पूर्ण होणार नाही, असे मोदींचे म्हणणे आहे. मात्र. प्रत्यक्षात सरकारी प्रकल्पांसाठी ८० टक्के संमतीची अट कायद्यातच नाही. संरक्षण विभाग व राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रकल्पांना काँग्रेसच्या कायद्यात विशेष दर्जा दिला आहे. त्यामुळे या दोन्हीसाठी भूसंपादन करायचे असेल तर कुठल्याही अटी लागू राहणार नाही, असे कायद्यात नमूद आहे. असे असतानाही मोदी कायद्यात सुधारणा केली नाही तर संरक्षण विभागाचे प्रकल्प रखडतील, असे खोटे सांगत असल्याचे त्यांनी सांगितले. या कायद्याला काँग्रेसचा विरोध असण्याची कारणे सांगताना ते म्हणाले, आता खासगी कंपन्यांसाठी सरकारला शेतकऱ्यांची संमती न घेता भूसंपादन करता येईल. सामाजिक प्रभाव मूल्यांकन करणे, पाच वर्षात प्रकल्प उभारला नाही तर शेतकऱ्याला जमिनी परत करणे या अटी वगळल्या आहेत. इंडस्ट्रिल कॉरिडोअरच्या दोन्ही बाजूला एक किलोमीटरपर्यंत भूसंपादन केले जाणार आहे. खासगी बिल्डर, डेव्हलपर्स, भूमाफिया यांच्यासाठी दरवाजे उघडले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष सुनीता गावंडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)