शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
2
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
3
दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
4
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
5
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?
6
UPI New Rules: ३ नोव्हेंबरपासून युपीआय पेमेंटमध्ये होणार मोठा बदल! पटापट करा चेक
7
"मी दोन दिवसांपूर्वीच रोहित आर्याला भेटलेलो...", मराठी अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "त्याच्यावर शंका आली नाही कारण..."
8
Tarot Card: नवा उत्साह, चैतन्य आणि आशादायी चित्र घेऊन येणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
ग्रहण योग-अशुभ पंचकात कार्तिकी एकादशी: १० राशींचा भाग्योदय-भरघोस भरभराट; विठुराया शुभ करेल!
10
भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप
11
IND vs SA World Cup Final: भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पावसात रद्द झाल्यास काय? २००२ मध्ये भारतासोबत काय झालेले...
12
Shocking!! कॅप्टन बनताच Bigg Boss 19च्या घरातून बेघर झाला प्रणित मोरे? एलिमिनेशनमध्ये मोठा ट्विस्ट
13
Wife च्या नावे पोस्टाच्या या स्कीममध्ये ₹८०००, ५ वर्षांत होईल धनवर्षाव; पाहा कमाईचं संपूर्ण गणित
14
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
15
“कार्तिकी एकादशीच्या महापूजेपूर्वीच विठुरायाने ठाण्यात अवतरून मला दर्शन दिले”: एकनाथ शिंदे
16
LPG Cylinder Price Cut:आजपासून गॅस सिलिंडरची किंमत झाली कमी, पाहा तुमच्या शहरात काय आहेत नवे दर?
17
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
18
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
19
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
20
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात

स्थलांतरित श्रमिकांच्या जागेवर स्थानिकांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 11:15 IST

बहुतांश उद्योग अपुऱ्या मनुष्यबळाचा सामना करीत आहेत. आता राज्य सरकारने या श्रमिकांच्या जागेवर स्थानिकांना रोजगार देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचा सकारात्मक परिणाम नागपुरात दिसून येत आहे.

ठळक मुद्देउद्योगांकडून ३९० कामगारांची मागणीनियुक्ती प्रक्रिया आज सुरू होणार

कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ लॉकडाऊनदरम्यान प्रवासी श्रमिक मोठ्या संख्येने आपापल्या राज्यात परतले आहेत. या कारणाने बहुतांश उद्योग अपुऱ्या मनुष्यबळाचा सामना करीत आहेत. आता राज्य सरकारने या श्रमिकांच्या जागेवर स्थानिकांना रोजगार देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचा सकारात्मक परिणाम नागपुरात दिसून येत आहे. उद्योगांनी आतापर्यंत ३९० श्रमिकांची मागणी केली आहे. बुधवारपासून नियुक्तीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

आतापर्यंत जवळपास ८ हजार प्रवासी श्रमिक स्वगृही परतल्याचा औद्योगिक संघटनांचा दावा आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून उद्योगांनी उत्पादन सुरू केले आहे. परंतु पर्याप्त मनुष्यबळाअभावी उत्पादन प्रभावित होत आहे. यादरम्यान राज्य शासनाच्या पुढाकाराने जिल्हा कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन केंद्राने स्थानिक लोकांना रोजगार देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या निर्देशानंतर केंद्राच्या चमूने बुटीबोरी, हिंगणा आणि कळमेश्वर येथील उद्योजकांशी संपर्क साधून त्यांना कुशल आणि अकुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. आतापर्यंत उद्योगांकडून ३९० रिक्त जागांवर भरती करण्याचे आश्वासन मिळाले आहे. ही संख्या कमी दिसत असली तरीही पुढे त्यात वाढ होईल, असे केंद्रातर्फे सांगण्यात आले आहे.उद्योग प्रारंभी टप्प्यात प्रवासी श्रमिक परतीची वाट पाहात होते. केंद्राचे उपायुक्त प्रभाकर हरडे म्हणाले, नागपुरात उद्योगांची मागणी पूर्ण करण्यासाठी सक्षम मनुष्यबळ उपलब्ध आहे. केंद्राकडे ८० हजार आयटीआय पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी आहे.

ग्रामपंचायत, आयटीआयचे सहकार्ययुनिटच्या जवळपास राहणारे श्रमिक उपलब्ध करून देण्याची उद्योगांची मागणी आहे. ही स्थिती पाहता जिल्हा कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन केंद्राने आपल्या क्षेत्रातील बेरोजगार युवकांना नोंदणी करण्याचा सल्ला देण्याचे आवाहन ग्रामपंचायतींना केले आहे. या प्रकारे आयटीआयला थेट उद्योगांशी संपर्क साधून त्यांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे.

काय आहे प्रक्रियाराज्य सरकारने रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ई-स्वयं नावाने पोर्टल तयार केले आहे. उपायुक्त हरडे म्हणाले, बेरोजगार युवकांना त्याचा फायदा घेण्यासाठी आॅनलाईन नोंदणी करावी लागते. उद्योगांनाही नोंदणी करून आपली आवश्यकता पोर्टलवर टाकावी लागते. केंद्र त्याच्या आधारावर उमेदवारांची यादी देतो. मुलाखतीनंतर उद्योग नियुक्ती करतो. अधिकाधिक उद्योग या पोर्टलशी जुळावेत, असा केंद्राचा प्रयत्न आहे.

टॅग्स :businessव्यवसाय