शहरं
Join us  
Trending Stories
1
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

स्थलांतरित श्रमिकांच्या जागेवर स्थानिकांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 11:15 IST

बहुतांश उद्योग अपुऱ्या मनुष्यबळाचा सामना करीत आहेत. आता राज्य सरकारने या श्रमिकांच्या जागेवर स्थानिकांना रोजगार देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचा सकारात्मक परिणाम नागपुरात दिसून येत आहे.

ठळक मुद्देउद्योगांकडून ३९० कामगारांची मागणीनियुक्ती प्रक्रिया आज सुरू होणार

कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ लॉकडाऊनदरम्यान प्रवासी श्रमिक मोठ्या संख्येने आपापल्या राज्यात परतले आहेत. या कारणाने बहुतांश उद्योग अपुऱ्या मनुष्यबळाचा सामना करीत आहेत. आता राज्य सरकारने या श्रमिकांच्या जागेवर स्थानिकांना रोजगार देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचा सकारात्मक परिणाम नागपुरात दिसून येत आहे. उद्योगांनी आतापर्यंत ३९० श्रमिकांची मागणी केली आहे. बुधवारपासून नियुक्तीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

आतापर्यंत जवळपास ८ हजार प्रवासी श्रमिक स्वगृही परतल्याचा औद्योगिक संघटनांचा दावा आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून उद्योगांनी उत्पादन सुरू केले आहे. परंतु पर्याप्त मनुष्यबळाअभावी उत्पादन प्रभावित होत आहे. यादरम्यान राज्य शासनाच्या पुढाकाराने जिल्हा कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन केंद्राने स्थानिक लोकांना रोजगार देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या निर्देशानंतर केंद्राच्या चमूने बुटीबोरी, हिंगणा आणि कळमेश्वर येथील उद्योजकांशी संपर्क साधून त्यांना कुशल आणि अकुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. आतापर्यंत उद्योगांकडून ३९० रिक्त जागांवर भरती करण्याचे आश्वासन मिळाले आहे. ही संख्या कमी दिसत असली तरीही पुढे त्यात वाढ होईल, असे केंद्रातर्फे सांगण्यात आले आहे.उद्योग प्रारंभी टप्प्यात प्रवासी श्रमिक परतीची वाट पाहात होते. केंद्राचे उपायुक्त प्रभाकर हरडे म्हणाले, नागपुरात उद्योगांची मागणी पूर्ण करण्यासाठी सक्षम मनुष्यबळ उपलब्ध आहे. केंद्राकडे ८० हजार आयटीआय पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी आहे.

ग्रामपंचायत, आयटीआयचे सहकार्ययुनिटच्या जवळपास राहणारे श्रमिक उपलब्ध करून देण्याची उद्योगांची मागणी आहे. ही स्थिती पाहता जिल्हा कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन केंद्राने आपल्या क्षेत्रातील बेरोजगार युवकांना नोंदणी करण्याचा सल्ला देण्याचे आवाहन ग्रामपंचायतींना केले आहे. या प्रकारे आयटीआयला थेट उद्योगांशी संपर्क साधून त्यांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे.

काय आहे प्रक्रियाराज्य सरकारने रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ई-स्वयं नावाने पोर्टल तयार केले आहे. उपायुक्त हरडे म्हणाले, बेरोजगार युवकांना त्याचा फायदा घेण्यासाठी आॅनलाईन नोंदणी करावी लागते. उद्योगांनाही नोंदणी करून आपली आवश्यकता पोर्टलवर टाकावी लागते. केंद्र त्याच्या आधारावर उमेदवारांची यादी देतो. मुलाखतीनंतर उद्योग नियुक्ती करतो. अधिकाधिक उद्योग या पोर्टलशी जुळावेत, असा केंद्राचा प्रयत्न आहे.

टॅग्स :businessव्यवसाय