शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरित श्रमिकांच्या जागेवर स्थानिकांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 11:15 IST

बहुतांश उद्योग अपुऱ्या मनुष्यबळाचा सामना करीत आहेत. आता राज्य सरकारने या श्रमिकांच्या जागेवर स्थानिकांना रोजगार देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचा सकारात्मक परिणाम नागपुरात दिसून येत आहे.

ठळक मुद्देउद्योगांकडून ३९० कामगारांची मागणीनियुक्ती प्रक्रिया आज सुरू होणार

कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ लॉकडाऊनदरम्यान प्रवासी श्रमिक मोठ्या संख्येने आपापल्या राज्यात परतले आहेत. या कारणाने बहुतांश उद्योग अपुऱ्या मनुष्यबळाचा सामना करीत आहेत. आता राज्य सरकारने या श्रमिकांच्या जागेवर स्थानिकांना रोजगार देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचा सकारात्मक परिणाम नागपुरात दिसून येत आहे. उद्योगांनी आतापर्यंत ३९० श्रमिकांची मागणी केली आहे. बुधवारपासून नियुक्तीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

आतापर्यंत जवळपास ८ हजार प्रवासी श्रमिक स्वगृही परतल्याचा औद्योगिक संघटनांचा दावा आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून उद्योगांनी उत्पादन सुरू केले आहे. परंतु पर्याप्त मनुष्यबळाअभावी उत्पादन प्रभावित होत आहे. यादरम्यान राज्य शासनाच्या पुढाकाराने जिल्हा कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन केंद्राने स्थानिक लोकांना रोजगार देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या निर्देशानंतर केंद्राच्या चमूने बुटीबोरी, हिंगणा आणि कळमेश्वर येथील उद्योजकांशी संपर्क साधून त्यांना कुशल आणि अकुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. आतापर्यंत उद्योगांकडून ३९० रिक्त जागांवर भरती करण्याचे आश्वासन मिळाले आहे. ही संख्या कमी दिसत असली तरीही पुढे त्यात वाढ होईल, असे केंद्रातर्फे सांगण्यात आले आहे.उद्योग प्रारंभी टप्प्यात प्रवासी श्रमिक परतीची वाट पाहात होते. केंद्राचे उपायुक्त प्रभाकर हरडे म्हणाले, नागपुरात उद्योगांची मागणी पूर्ण करण्यासाठी सक्षम मनुष्यबळ उपलब्ध आहे. केंद्राकडे ८० हजार आयटीआय पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी आहे.

ग्रामपंचायत, आयटीआयचे सहकार्ययुनिटच्या जवळपास राहणारे श्रमिक उपलब्ध करून देण्याची उद्योगांची मागणी आहे. ही स्थिती पाहता जिल्हा कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन केंद्राने आपल्या क्षेत्रातील बेरोजगार युवकांना नोंदणी करण्याचा सल्ला देण्याचे आवाहन ग्रामपंचायतींना केले आहे. या प्रकारे आयटीआयला थेट उद्योगांशी संपर्क साधून त्यांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे.

काय आहे प्रक्रियाराज्य सरकारने रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ई-स्वयं नावाने पोर्टल तयार केले आहे. उपायुक्त हरडे म्हणाले, बेरोजगार युवकांना त्याचा फायदा घेण्यासाठी आॅनलाईन नोंदणी करावी लागते. उद्योगांनाही नोंदणी करून आपली आवश्यकता पोर्टलवर टाकावी लागते. केंद्र त्याच्या आधारावर उमेदवारांची यादी देतो. मुलाखतीनंतर उद्योग नियुक्ती करतो. अधिकाधिक उद्योग या पोर्टलशी जुळावेत, असा केंद्राचा प्रयत्न आहे.

टॅग्स :businessव्यवसाय