शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

सोन्यात गुंतवणुकीची हीच संधी!

By admin | Updated: April 29, 2015 02:42 IST

लग्नकार्य किंवा अन्य कारणांसाठी दागिने तयार केले जाणार असतील तर जास्त काळ वाट पाहण्यात काहीच अर्थ नाही.

नागपूर : लग्नकार्य किंवा अन्य कारणांसाठी दागिने तयार केले जाणार असतील तर जास्त काळ वाट पाहण्यात काहीच अर्थ नाही. सोन्याचा भाव किती खाली जाईल याची खात्री कुणीही देऊ शकत नाही. सोन्याची ही चमक धोकाही देऊ शकते. आगामी काळात सोने भाव खाणार, यात शंका नाही. त्यामुळे ग्राहकांनी सोने खरेदीसाठी वाट पाहू नये. सोन्यात गुंतवणुकीची हीच संधी असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.लग्नसराईच्या तोंडावर सोन्याचे भाव उतरल्याने लोकांमध्ये समाधानाचे वातावरण असले, तरी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणारे व्यापारी आणि सट्टेबाज यांचे त्यामुळे आर्थिक गणित कोलमडले आहे. अक्षयतृतीयेपासून बाजारात प्रचंड गर्दी आहे. ग्राहकच नव्हे तर तोटा भरून काढण्यासाठी व्यापारीही सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत. खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांमध्ये मध्यमवर्गीय व गृहिणींचे प्रमाण लक्षणीय आहे. सोन्याचे भाव उतरल्याने दागिन्यांची हौस पुरी करण्यासाठी खरेदी वाढल्याचे सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले. ग्रामीण भागात व्यवसायावर परिणामभारतात होणारी सुमारे ७५ टक्के सोने खरेदी ही दागिन्यांच्या रूपात असते. त्यातही ५० टक्क्यांहून अधिक खरेदी ही गुंतवणुकीच्या उद्देशापोटीच केली जाते. भारताच्या बाबतीत लक्षात आलेली आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे भारतात होणाऱ्या सोने खरेदीतील ७० टक्के वाटा हा ग्रामीण भारताचा असतो. पण यावर्षी पावसाचा पिकांना फटका बसला आहे. त्याचा परिणाम ग्रामीण भागात सराफा व्यवसायावर पडल्याचे सोने-चांदी ओळ कमिटीचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम कावळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. कावळे म्हणाले, भारतीय व्यक्ती सोन्याच्या दागिन्यांकडे ते परिधान करण्याबरोबरच गुंतवणूक म्हणूनही पाहत असते. दागिन्यांची खरेदी ही काही केवळ अंगावर घालण्यासाठी किंवा केवळ मिरवण्यासाठी होत नाही. (प्रतिनिधी)