शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
ब्रिटिशांसारखीच भारतावरही २१ वर्षांपूर्वी वेळ आलेली...; जेव्हा मिराज-२००० मॉरीशसमध्ये अडकलेले...
3
"मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवा अन्...." हिंदू सेनेच्या तलवार बाबाचे संतापजनक विधान
4
FD, SIP सर्व विसरुन जाल... Post Office कडे आहेत जबरदस्त सेव्हिंग स्कीम्स; एकदा गुंतवणूक, दरवर्षी मिळतील २.४६ लाख
5
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
6
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
7
श्रीराम-भरत मिलाप! रामायणातील महत्वाची घटना; सिनेमाबद्दल आदिनाथ कोठारे म्हणतो...
8
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
9
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा; उद्धवसेनेकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता
10
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
11
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
12
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
13
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
14
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
15
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
16
उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का? हायकोर्टाने सरकारकडे मागितली माहिती
17
एटीएसमुळे आयुष्य उद्ध्वस्त झाले, शेख यांची खंत; ना वडिलांच्या दफनविधीला, ना मुलीच्या लग्नाला आलाे !
18
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
19
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
20
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी एक; तानसा तलाव भरून वाहू लागला!

सोन्यात गुंतवणुकीची हीच संधी!

By admin | Updated: April 29, 2015 02:42 IST

लग्नकार्य किंवा अन्य कारणांसाठी दागिने तयार केले जाणार असतील तर जास्त काळ वाट पाहण्यात काहीच अर्थ नाही.

नागपूर : लग्नकार्य किंवा अन्य कारणांसाठी दागिने तयार केले जाणार असतील तर जास्त काळ वाट पाहण्यात काहीच अर्थ नाही. सोन्याचा भाव किती खाली जाईल याची खात्री कुणीही देऊ शकत नाही. सोन्याची ही चमक धोकाही देऊ शकते. आगामी काळात सोने भाव खाणार, यात शंका नाही. त्यामुळे ग्राहकांनी सोने खरेदीसाठी वाट पाहू नये. सोन्यात गुंतवणुकीची हीच संधी असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.लग्नसराईच्या तोंडावर सोन्याचे भाव उतरल्याने लोकांमध्ये समाधानाचे वातावरण असले, तरी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणारे व्यापारी आणि सट्टेबाज यांचे त्यामुळे आर्थिक गणित कोलमडले आहे. अक्षयतृतीयेपासून बाजारात प्रचंड गर्दी आहे. ग्राहकच नव्हे तर तोटा भरून काढण्यासाठी व्यापारीही सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत. खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांमध्ये मध्यमवर्गीय व गृहिणींचे प्रमाण लक्षणीय आहे. सोन्याचे भाव उतरल्याने दागिन्यांची हौस पुरी करण्यासाठी खरेदी वाढल्याचे सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले. ग्रामीण भागात व्यवसायावर परिणामभारतात होणारी सुमारे ७५ टक्के सोने खरेदी ही दागिन्यांच्या रूपात असते. त्यातही ५० टक्क्यांहून अधिक खरेदी ही गुंतवणुकीच्या उद्देशापोटीच केली जाते. भारताच्या बाबतीत लक्षात आलेली आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे भारतात होणाऱ्या सोने खरेदीतील ७० टक्के वाटा हा ग्रामीण भारताचा असतो. पण यावर्षी पावसाचा पिकांना फटका बसला आहे. त्याचा परिणाम ग्रामीण भागात सराफा व्यवसायावर पडल्याचे सोने-चांदी ओळ कमिटीचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम कावळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. कावळे म्हणाले, भारतीय व्यक्ती सोन्याच्या दागिन्यांकडे ते परिधान करण्याबरोबरच गुंतवणूक म्हणूनही पाहत असते. दागिन्यांची खरेदी ही काही केवळ अंगावर घालण्यासाठी किंवा केवळ मिरवण्यासाठी होत नाही. (प्रतिनिधी)