शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

ओबीसींच्या जागा खुल्या करणे हे कायद्याचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:08 IST

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या ४ मार्चच्या निकालाच्या संबंधाने निवडणूक आयोगाने रद्द ठरवलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांचे सदस्यत्व ...

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या ४ मार्चच्या निकालाच्या संबंधाने निवडणूक आयोगाने रद्द ठरवलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले, तर बुधवारी राज्य निवडणूक आयोगाने या सर्व जागा खुल्या केल्या. राज्य निवडणूक आयोगाने केलेला हा प्रकार पंचायत समिती कायदा १९६१ च्या कलम १२ (२) ‘क’ चे उल्लंघन असल्याचा आरोप राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाने केला आहे. या विरोधात ओबीसी समाजात जनजागृती करण्याकरिता आंदोलनाचा इशारा दिला आहे.

राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचे मुख्य संयोजक नितीन चौधरी म्हणाले, ४ मार्चच्या निकाला संबंधाने निवडणूक आयोगाने या जागा खुल्या करून निवडणूक घेण्याचा आदेश काढला, हा प्रकार पंचायत समिती कायदा १९६१ कलम १२(२) ‘क’ चे उल्लंघन आहे. निवडणूक आयोगाने निकालाचे विश्लेषण करीत, त्या विरोधात दाद मागण्यास नव्याने सर्वोच्च न्यायालयात जाण्याऐवजी ओबीसींवर अन्याय करणारे धोरण स्वीकारले. याचा परिणाम ओबीसीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील राखीव जागेवर होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा ४ मार्च २०२१ चा निकाल हा संविधान पिठाच्या निर्देशाचे उल्लंघन आहे. राज्य सरकारने ही बाब संविधान पीठाकडे उचलावी, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

- राजकीय आरक्षणात लोकसंख्येचा आधार घेऊ नये : तायवाडे

राज्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींना शैक्षणिक व नोकरीमध्ये १३ व ७ टक्के आरक्षण आहे. सर्वोच्च न्यायालयाने ५० टक्क्यांवर आरक्षण नाकारले आहे. त्यामुळे उरलेले ३० टक्के आरक्षण ओबीसी व व्हीजेएनटीला देण्यात यावे. सरकारने लोकसंख्येचा आधार घेऊन आरक्षण काढू नये, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केली.