शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
Pahalgam Terror Attack : 'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
3
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
4
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
5
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
6
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
7
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
8
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
9
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
10
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
11
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
12
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
13
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
14
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
15
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
16
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
17
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
18
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
19
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
20
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार

शाळा उघडा उघडा... बंद करा, बंद करा ! मंत्र्यांच्या धरसोड वृत्तीने राज्यातील शिक्षक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 11:23 IST

आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करता येतील, असा निर्णय जाहीर करून शिक्षण विभागाने सोमवारी सर्वांना सुखद धक्का दिला. मात्र, २४ तासांच्या आत हा निर्णय मागे घेऊन शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या आनंदावर वरवंटा फिरविला.

 लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करता येतील, असा निर्णय जाहीर करून शिक्षण विभागाने सोमवारी सर्वांना सुखद धक्का दिला. मात्र, २४ तासांच्या आत हा निर्णय मागे घेऊन शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या आनंदावर वरवंटा फिरविला. निर्णय घेण्यातील शिक्षणमंत्र्यांच्या या धरसोड वृत्तीबद्दल राज्यातील शिक्षकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

ज्या परिसरात कोरोना रुग्ण नाहीत अशा ठिकाणी आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू करता येईल, असा निर्णय सोमवारी शालेय शिक्षण विभागाने जाहीर केला. राज्य शासनाच्या संकेतस्थळावर हा निर्णय झळकताच राज्यातील शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले. राज्यात अनेक गावे, तालुके कोरोनामुक्त आहेत. त्यामुळे आठवीच्या पुढील वर्ग निश्चितच सुरू होतील, असा विश्वास निर्माण झाला होता. मात्र, हा आनंद औट घटकेचा ठरला. मंगळवारी सकाळीच शिक्षण विभागाने आपला निर्णय फिरवला. सोमवारी संकेतस्थळावर अपलोड केलेला निर्णय एका झटक्यात संकेतस्थळावरून काढून टाकण्यात आला. या निर्णयात तांत्रिक चुका असल्याचा लंगडा युक्तिवाद मंत्रालयातर्फे करण्यात आला. मात्र, निर्णय जाहीर करताना या चुका कशा लक्षात आल्या नाही ? आणि निर्णय जाहीर होताच अवघ्या काही तासांत चुका कशा दिसल्या, असे प्रश्न जिल्ह्यातील शिक्षक उपस्थित करीत आहेत.

प्रत्यक्षात या निर्णयासाठी केंद्र शासनाकडून हिरवी झेंडी मिळालेली नाही. शिवाय केवळ ग्रामपंचायतीची परवानगी घेऊन शाळा सुरू करता येईल, अशी सूचना या निर्णयात करण्यात आली होती. प्रत्यक्षात दहावी आणि बारावीचे बहुतांश वर्ग हे नगरपालिका आणि महापालिकांच्या क्षेत्रात आहेत. मात्र, नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या परवानगीचाही उल्लेख या निर्णयात करण्यात आला नाही. शिवाय साथरोग नियंत्रणाच्या दृष्टीने सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे असताना त्यांच्या परवानगीबाबतही उल्लेख टाळण्यात आला. ग्रामविकास विभाग, आरोग्य विभाग, नगरविकास विभाग अशा विविध विभागांच्या समन्वयाअभावी हा निर्णय घाईगडबडीत घेण्यात आल्याचा संताप शिक्षक व्यक्त करीत आहे.

 

शिक्षकांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

शाळा सुरू करा, असे म्हणत आशा दाखविणाऱ्या शिक्षणमंत्र्यांनी झटक्यात निर्णय रद्द करून शिक्षकांची-विद्यार्थ्यांची निराशा केली. त्यामुळे मंगळवारी जिल्ह्यातील शिक्षकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन शाळा उघडण्याची परवानगी मागितली. ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षण शक्यच नाही. त्यामुळे सात ते आठ विद्यार्थ्यांचा एक गट करून तीन ते चार तासिका शाळेच्याच इमारतीत घेण्याची परवानगी शिक्षकांनी मागितली. विशेष म्हणजे ६० पेक्षा अधिक शिक्षकांनी एकमेकांशी चर्चा केल्यानंतर शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले. यावेळी पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख सभेचे महेंद्र वेरुळकर, अनिल पखाले, महेश खोडके, विकास दरणे, मनीष लढी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र