शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

शाळा उघडा उघडा... बंद करा, बंद करा ! मंत्र्यांच्या धरसोड वृत्तीने राज्यातील शिक्षक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 11:23 IST

आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करता येतील, असा निर्णय जाहीर करून शिक्षण विभागाने सोमवारी सर्वांना सुखद धक्का दिला. मात्र, २४ तासांच्या आत हा निर्णय मागे घेऊन शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या आनंदावर वरवंटा फिरविला.

 लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करता येतील, असा निर्णय जाहीर करून शिक्षण विभागाने सोमवारी सर्वांना सुखद धक्का दिला. मात्र, २४ तासांच्या आत हा निर्णय मागे घेऊन शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या आनंदावर वरवंटा फिरविला. निर्णय घेण्यातील शिक्षणमंत्र्यांच्या या धरसोड वृत्तीबद्दल राज्यातील शिक्षकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

ज्या परिसरात कोरोना रुग्ण नाहीत अशा ठिकाणी आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू करता येईल, असा निर्णय सोमवारी शालेय शिक्षण विभागाने जाहीर केला. राज्य शासनाच्या संकेतस्थळावर हा निर्णय झळकताच राज्यातील शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले. राज्यात अनेक गावे, तालुके कोरोनामुक्त आहेत. त्यामुळे आठवीच्या पुढील वर्ग निश्चितच सुरू होतील, असा विश्वास निर्माण झाला होता. मात्र, हा आनंद औट घटकेचा ठरला. मंगळवारी सकाळीच शिक्षण विभागाने आपला निर्णय फिरवला. सोमवारी संकेतस्थळावर अपलोड केलेला निर्णय एका झटक्यात संकेतस्थळावरून काढून टाकण्यात आला. या निर्णयात तांत्रिक चुका असल्याचा लंगडा युक्तिवाद मंत्रालयातर्फे करण्यात आला. मात्र, निर्णय जाहीर करताना या चुका कशा लक्षात आल्या नाही ? आणि निर्णय जाहीर होताच अवघ्या काही तासांत चुका कशा दिसल्या, असे प्रश्न जिल्ह्यातील शिक्षक उपस्थित करीत आहेत.

प्रत्यक्षात या निर्णयासाठी केंद्र शासनाकडून हिरवी झेंडी मिळालेली नाही. शिवाय केवळ ग्रामपंचायतीची परवानगी घेऊन शाळा सुरू करता येईल, अशी सूचना या निर्णयात करण्यात आली होती. प्रत्यक्षात दहावी आणि बारावीचे बहुतांश वर्ग हे नगरपालिका आणि महापालिकांच्या क्षेत्रात आहेत. मात्र, नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या परवानगीचाही उल्लेख या निर्णयात करण्यात आला नाही. शिवाय साथरोग नियंत्रणाच्या दृष्टीने सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे असताना त्यांच्या परवानगीबाबतही उल्लेख टाळण्यात आला. ग्रामविकास विभाग, आरोग्य विभाग, नगरविकास विभाग अशा विविध विभागांच्या समन्वयाअभावी हा निर्णय घाईगडबडीत घेण्यात आल्याचा संताप शिक्षक व्यक्त करीत आहे.

 

शिक्षकांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

शाळा सुरू करा, असे म्हणत आशा दाखविणाऱ्या शिक्षणमंत्र्यांनी झटक्यात निर्णय रद्द करून शिक्षकांची-विद्यार्थ्यांची निराशा केली. त्यामुळे मंगळवारी जिल्ह्यातील शिक्षकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन शाळा उघडण्याची परवानगी मागितली. ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षण शक्यच नाही. त्यामुळे सात ते आठ विद्यार्थ्यांचा एक गट करून तीन ते चार तासिका शाळेच्याच इमारतीत घेण्याची परवानगी शिक्षकांनी मागितली. विशेष म्हणजे ६० पेक्षा अधिक शिक्षकांनी एकमेकांशी चर्चा केल्यानंतर शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले. यावेळी पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख सभेचे महेंद्र वेरुळकर, अनिल पखाले, महेश खोडके, विकास दरणे, मनीष लढी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र