शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या विधिमंडळ सचिवालयात दोन महिन्यात केवळ एकच बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:07 IST

आनंद डेकाटे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर व विदर्भातील निवडून आलेल्या आमदारांना विधिमंडळाशी संबंधित कामासाठी मुंबईला वारंवार चकरा ...

आनंद डेकाटे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर व विदर्भातील निवडून आलेल्या आमदारांना विधिमंडळाशी संबंधित कामासाठी मुंबईला वारंवार चकरा मारण्याची गरज पडू नये. त्यांची कामे नागपुरातच व्हावी, या उद्देशाने नागपुरातील विधानभवनात विधानमंडळ सचिवालयाचा कक्ष सुरु करण्यात आला. हा कक्ष सुरु होऊन दोन महिने झाले. परंतु ज्या उद्देशासाठी हा सुरु झाला तो उद्देश मात्र या दोन महिन्यातही पूर्ण होताना दिसून येत नाही. दोन महिन्यात येथील विधानभवनात केवळ एकच बैठक होऊ शकली. तसेच विधानमंडळाचे सर्व कामकाज ऑनलाईन होत असल्याने हे केंद्र केवळ सल्लागार केंद्र बनले आहे.

नागपुरात विधानभवन आहे. हिवाळी अधिवेशन सोडले तर विधानभवनाची पूर्ण इमारत वर्षभर रिकामीच असते. त्यामुळे या इमारतीचा वर्षभर उपयोग व्हावा. यातून इमारतीचीही देखभाल होत राहील. तसेच येथील लोकप्रतिनिधींनाही विधिमंडळाशी संबंधित कामे येथूनच करता यावीत, यासाठी येथे विधिमंडळ सचिवालय कायमस्वरुपी असावे, अशी मागणी अनेक वर्षांपासूनची होती. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या पुढाकाराने ही मागणी पूर्णत्वास आली. गेल्या ४ जानेवारी राेजी विधानमंडळ सचिवालयाच्या कक्षाचे उद्घाटन झाले. राष्ट्रकुल संसदीय मंडळ कक्ष पहिला मजला, जुनी इमारत विधानभवन येथे हे कक्ष सुरु करण्यात आले आहे. या कक्षाच्या कामकाजासाठी उपसचिव , दोन अवर सचिव, दोन कक्ष अधिकारी, सहायक कक्ष अधिकारी, लिपीक टंकलेखक शिपाई यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. परंतु गेल्या दोन महिन्यात या कक्षाचा आणि विधानभवनाच्या इमारतीचाही पाहिजे तसा उपयोग होत असल्याचे दिसून येत नाही.

विधानमंडळाशी संबंधित कामे उदाहरणार्थ अधिवेशन काळातील प्रश्न सादर करणे, लक्षवेधी, सूचना, आदी प्रश्न सादर करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन आहे. त्यामुळे आमदार ही प्रक्रिया आपल्या कार्यालयातून किंवा घरूनच पार पाडतात. काही अडचण आली तेव्हाच आमदारांचे पीए या कक्षाची मदत घेतात. त्यामुळे सध्यातरी हे कक्ष सल्लागार केंद्राचीच भूमिका पार पाडत असल्याचे दिसून येते.

शक्ती कायद्यावर पार पडली बैठक

आंध्र प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने राज्यात शक्ती कायदा अस्तित्वात आणला आहे. या कायद्यावर चर्चा करण्यासाठी विविध सामाजिक संघटनांची बैठक गृहविभागातर्फे बोलावण्यात आली होती. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक विधानभवनाच्या सभागृहात पार पडली होती. ही एकमेव बैठक आजवर येथे झाली. या व्यतिरिक्त विधानभवनाच्या इमारतीचा उपयोगच आतापर्यंत झालेला नाही. राज्यातील चार वजनदार मंत्री नागपुरातच राहतात. गृह विभाग, ऊर्जा विभाग, क्रीडा, मदत व पुनर्वसन विभागांसह विविध विभागांच्या बैठका विभागीय आयुक्त कार्यालयात होतात. तिथे जागेची अडचण आहेच. कोरोनाकाळात आधीच गर्दी टाळण्याचे साांगितले जाते. या बैठकांमुळे नाहक गर्दी होते. या बैठकांसाठी विधानभवनातील सभागृहांचा वापर करता येऊ शकतो.