शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

१० लाख टन ई-कचऱ्यापैकी केवळ एक टक्का रिसायकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:07 IST

निशांत वानखेडे नागपूर : इलेक्ट्रानिक्स वेस्ट म्हणजे ई-कचऱ्याची समस्या आता साेपी राहिलेली नाही. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार राज्यात ...

निशांत वानखेडे

नागपूर : इलेक्ट्रानिक्स वेस्ट म्हणजे ई-कचऱ्याची समस्या आता साेपी राहिलेली नाही. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार राज्यात २०१९-२० या वर्षात तब्बल १० लाख टन ई-वेस्ट जमा झाला. मात्र त्यापैकी नाममात्र ९७५-२५ टन म्हणजे केवळ एक टक्का ई-कचरा रिसायकल प्रक्रियेतून गेला. ११०१५ टन सुटा करण्यात आला पण पुनर्वापरात गेला नाही. बाकी असंघटित क्षेत्रातील ९९ टक्के ई-कचरा पुनर्वापराविना वातावरणात पडून आहे. यावरून ही समस्या किती भीषण आहे, याचा अंदाज लावता येईल.

एमपीसीबीचे विभागीय अधिकारी नंदकुमार गुरव यांनी एका ऑनलाईन सेमिनारच्या माध्यमातून ही माहिती समाेर ठेवली आहे. गेल्या काही वर्षात इलेक्ट्रानिक्स वस्तुूचा वापर वाढला आहे पण टिकण्याची क्षमता कमी झाल्याने त्याचे कचऱ्यात रुपांतर हाेण्याचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या दशकभरात ई-कचऱ्याची समस्या भीषण हाेत गेली आहे. त्यापेक्षा पुनर्वापर हाेत नसल्याने धाेका वाढत चालला आहे. सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात सर्वाधिक ई-कचऱ्याची निर्मिती हाेते. मात्र ९० टक्केहून अधिक असंघटित क्षेत्राकडून हाताळला जात आहे. हे बेकायदेशीर असून त्याची आकडेवारी कुणाकडेही नाही. हा असंघटित क्षेत्रातील ई-कचरा संघटित क्षेत्राच्या कक्षेत आणून पुनर्वापराची प्रक्रिया गतिमान करणे नितांत गरजेचे असून त्यासाठी मंडळाद्वारे प्रयत्न केले जात असल्याची ग्वाही गुरव यांनी दिली. पर्यावरण कृती कार्यक्रमाचा भाग बनवण्यासाठी ही आमची महत्त्वाची शिफारस असून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळालाही याबाबत माहिती दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

८४ लाख टन घनकचरा गेल्या वर्षी

नंदकुमार गुरव यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात २०१९-२० या वर्षात ८४ लाख टन घनकचरा जमा करण्यात आला हाेता. दरराेज २२९४५ टन कचरा जमा हाेताे व त्यापैकी २२६८५ टन म्हणजेच ९८.७ टक्के कचरा जमा केला जाताे. त्यातील १५९८० टन म्हणजे ७० टक्के कचरा शास्त्रशुद्ध प्रक्रियेतून गेल्याची समाधानकारक बाब त्यांनी स्पष्ट केली. त्यातही २०२१ मध्ये ८० टक्के कचरा शास्त्रीय प्रक्रियेतून गेल्याचा दावा त्यांनी केला. याशिवाय राज्यात ४.४ लाख टन प्लास्टिक कचरा निर्माण झाला आणि त्यापैकी ८८ टक्के जमा करण्यात येऊन ६१ टक्के पुनर्वापरासाठी पाठवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जमा होणाऱ्या कचऱ्याची नोंद ठेवणे अतिशय कठीण असून त्यासाठी एका सामायिक मंचची गरज भासत असल्याचे सांगत हीच प्रदूषण नियंत्रण मंडळाची महत्त्वाची शिफारस असल्याचे वातावरण फाऊंडेशनच्या कार्यक्रमात सांगितले.