शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

'जीडीपी' ठरविण्याचे सूत्रच चुकीचे  : बजरंगलाल गुप्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 22:43 IST

आपल्या देशातील एकूण सामाजिक व आर्थिक स्थिती तसेच विविधता लक्षात घेता ‘जीडीपी’ ठरविण्याचे सूत्र व प्रक्रियाच चुकीची असल्याची बाब निदर्शनास आली आहे.

ठळक मुद्देविकासाच्या नवीन मानकांवर व्याख्यानाचे आयोजन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आपल्या देशाने आर्थिक क्षेत्रात पाश्चिमात्य देशांची नकल केली. ‘जीडीपी’च्या आधारावर अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचे मूल्यमापन करण्यात येते. परंतु आपल्या देशातील एकूण सामाजिक व आर्थिक स्थिती तसेच विविधता लक्षात घेता ‘जीडीपी’ ठरविण्याचे सूत्र व प्रक्रियाच चुकीची असल्याची बाब निदर्शनास आली आहे. विकासाच्या नवीन ‘मॉडेल’ला विकसित करण्याची आवश्यकता आहे, असे मत दिल्ली विद्यापीठाचे सेवानिवृत्त प्राध्यापक, अर्थतज्ज्ञ व संघ विचारक डॉ. बजरंगलाल गुप्ता यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लोकप्रशासन विभागातर्फे विकासाच्या नवीन मानकांसंदर्भात व्याख्यानाचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.पदव्युत्तर गणित विभागाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे, लोकप्रशासन विभागप्रमुख डॉ.निर्मलकुमार सिंह, डॉ.जितेंद्र वासनिक प्रामुख्याने उपस्थित होते. पाश्चिमात्य देशांचे आपण अनुकरण केले. ‘जीडीपी’ मोजण्याची प्रक्रियाच चुकीची आहे. आपल्या समाजातील घरांघरांमध्ये गृहिणीदेखील दररोज अनेक खाद्यपदार्थ बनवतात. आपल्या इथे उत्पादन तर होत आहे, मात्र त्याचा समावेश ‘जीडीपी’त होत नाही. बाहेरील देशात हेच पदार्थ बाहेरुन विकत घ्यावे लागतात. त्यामुळे त्यांचा ‘जीडीपी’ वाढल्याचे दिसून येते. शेतकरी उत्पादनातील काही भाग स्वत: तसेच नातेवाईकांसाठी ठेवतो. उर्वरित उत्पादन ‘मार्केटेबल सरप्लस’ म्हणून विकण्यासाठी घेऊन जातो. केवळ त्याचीच गणना ‘जीडीपी’मध्ये होते. अशी असंख्य उदाहरणे आहेत. त्यामुळेच ‘जीडीपी’चे मोजमाप करण्यासाठी नवीन सूत्र विकसित करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ.बजरंगलाल गुप्ता यांनी केले. जास्त उपभोग घेतला तर जास्त मागणी येईल, अशी विकासाची सध्याची व्याख्या सांगते. विकासाची सध्याची व्याख्या वर्तमान समस्यांचे समाधान करु शकत नाही. ‘जीडीपी’च नव्हे तर विकासाच्या व्याख्येसंदर्भात जगभरात संभ्रम आहे.यामुळेच ‘सुमंगलम्’ या संकल्पनेवर आधारित विकासाचे ‘मॉडेल’ विकसित करुन त्यावर भर देण्याची गरज आहे. ‘सुमंगलम’ या विकासाच्या संकल्पनेत एकात्म दृष्टिकोनदेखील आहे. यात मूलभूत गरजांची पूर्तता, सर्वांचे आरोग्य, संस्कारक्षम व समान शिक्षणाची संधी, सर्वांना रोजगार, प्रत्येकाला घर व सर्वांना सुरक्षा यांचा समावेश होतो. आपल्या देशात अर्थव्यवस्थेचे विकेंद्रीकरण करण्यावर भर दिला पाहिजे, असा सल्लादेखील त्यांनी यावेळी दिला. डॉ. विनायक देशपांडे यांनीदेखील यावेळी अर्थव्यवस्थेवर भाष्य केले. डॉ.निर्मलकुमार सिंग यांनी प्रास्ताविक केले. सुप्रिया डेव्हिड यांनी संचालन केले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ