शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

'जीडीपी' ठरविण्याचे सूत्रच चुकीचे  : बजरंगलाल गुप्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 22:43 IST

आपल्या देशातील एकूण सामाजिक व आर्थिक स्थिती तसेच विविधता लक्षात घेता ‘जीडीपी’ ठरविण्याचे सूत्र व प्रक्रियाच चुकीची असल्याची बाब निदर्शनास आली आहे.

ठळक मुद्देविकासाच्या नवीन मानकांवर व्याख्यानाचे आयोजन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आपल्या देशाने आर्थिक क्षेत्रात पाश्चिमात्य देशांची नकल केली. ‘जीडीपी’च्या आधारावर अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचे मूल्यमापन करण्यात येते. परंतु आपल्या देशातील एकूण सामाजिक व आर्थिक स्थिती तसेच विविधता लक्षात घेता ‘जीडीपी’ ठरविण्याचे सूत्र व प्रक्रियाच चुकीची असल्याची बाब निदर्शनास आली आहे. विकासाच्या नवीन ‘मॉडेल’ला विकसित करण्याची आवश्यकता आहे, असे मत दिल्ली विद्यापीठाचे सेवानिवृत्त प्राध्यापक, अर्थतज्ज्ञ व संघ विचारक डॉ. बजरंगलाल गुप्ता यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लोकप्रशासन विभागातर्फे विकासाच्या नवीन मानकांसंदर्भात व्याख्यानाचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.पदव्युत्तर गणित विभागाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे, लोकप्रशासन विभागप्रमुख डॉ.निर्मलकुमार सिंह, डॉ.जितेंद्र वासनिक प्रामुख्याने उपस्थित होते. पाश्चिमात्य देशांचे आपण अनुकरण केले. ‘जीडीपी’ मोजण्याची प्रक्रियाच चुकीची आहे. आपल्या समाजातील घरांघरांमध्ये गृहिणीदेखील दररोज अनेक खाद्यपदार्थ बनवतात. आपल्या इथे उत्पादन तर होत आहे, मात्र त्याचा समावेश ‘जीडीपी’त होत नाही. बाहेरील देशात हेच पदार्थ बाहेरुन विकत घ्यावे लागतात. त्यामुळे त्यांचा ‘जीडीपी’ वाढल्याचे दिसून येते. शेतकरी उत्पादनातील काही भाग स्वत: तसेच नातेवाईकांसाठी ठेवतो. उर्वरित उत्पादन ‘मार्केटेबल सरप्लस’ म्हणून विकण्यासाठी घेऊन जातो. केवळ त्याचीच गणना ‘जीडीपी’मध्ये होते. अशी असंख्य उदाहरणे आहेत. त्यामुळेच ‘जीडीपी’चे मोजमाप करण्यासाठी नवीन सूत्र विकसित करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ.बजरंगलाल गुप्ता यांनी केले. जास्त उपभोग घेतला तर जास्त मागणी येईल, अशी विकासाची सध्याची व्याख्या सांगते. विकासाची सध्याची व्याख्या वर्तमान समस्यांचे समाधान करु शकत नाही. ‘जीडीपी’च नव्हे तर विकासाच्या व्याख्येसंदर्भात जगभरात संभ्रम आहे.यामुळेच ‘सुमंगलम्’ या संकल्पनेवर आधारित विकासाचे ‘मॉडेल’ विकसित करुन त्यावर भर देण्याची गरज आहे. ‘सुमंगलम’ या विकासाच्या संकल्पनेत एकात्म दृष्टिकोनदेखील आहे. यात मूलभूत गरजांची पूर्तता, सर्वांचे आरोग्य, संस्कारक्षम व समान शिक्षणाची संधी, सर्वांना रोजगार, प्रत्येकाला घर व सर्वांना सुरक्षा यांचा समावेश होतो. आपल्या देशात अर्थव्यवस्थेचे विकेंद्रीकरण करण्यावर भर दिला पाहिजे, असा सल्लादेखील त्यांनी यावेळी दिला. डॉ. विनायक देशपांडे यांनीदेखील यावेळी अर्थव्यवस्थेवर भाष्य केले. डॉ.निर्मलकुमार सिंग यांनी प्रास्ताविक केले. सुप्रिया डेव्हिड यांनी संचालन केले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ