शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

नक्षलग्रस्त गडचिरोलीत केवळ ८ हजार ३२९ किमीचेच रस्ते

By admin | Updated: July 4, 2014 01:07 IST

या नक्षलग्रस्त जिल्ह्यात केवळ ८३२९.७६ किमी लांबीच्याच रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे रस्ते विकासाचा मोठा अनुशेष निर्माण झाला आहे. रस्ते व पुलांच्या बांधकामाला

बीआरओ गेले : रस्त्यांची कामे नक्षलवाद्यांमुळेही रखडलीगडचिरोली : या नक्षलग्रस्त जिल्ह्यात केवळ ८३२९.७६ किमी लांबीच्याच रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे रस्ते विकासाचा मोठा अनुशेष निर्माण झाला आहे. रस्ते व पुलांच्या बांधकामाला नक्षलवाद्यांचा कायम विरोध राहत असल्याने दुर्गम भागात रस्ते विकासाचे काम करणे कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभाग या दोघांसाठीही अडचणीचे ठरत आहे.२६ आॅगस्ट १९८२ ला चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली हा नवा जिल्हा निर्माण करण्यात आला. त्याच वेळी जिल्ह्यात नक्षलवादी चळवळीचाही उदय झाला. नक्षलवाद्यांची पाळेमुळे अल्पावधीतच भक्कमपणे रोवल्या गेली. त्यांनी विकासाला कायम विरोध केला आहे. रस्ते, पूल, मोबाईल टॉवर उभारणीच्या कामालाही नक्षलवाद्यांचा विरोध आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ८३२९.७५ किमी लांबीचेच रस्ते होऊ शकले. यामध्ये ५० किमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग, १३०५.१५ किमी लांबीचा राज्य महामार्ग, ९२९.४८ किमी लांबीचा मोठा जिल्हा मार्ग, १३५२.९९ किमी लांबीचे अन्य जिल्हा मार्ग व ४६९२.१२ किमी लांबीचे व्हिलेज रस्ते पूर्ण करण्यात आले. जिल्ह्याच्या आदिवासीबहुल भागात १४१०७ चौ.किमी, गैर आदिवासीबहुल भागात १३२७.०० चौ. किमी तर जंगलव्याप्त भागात १३२०० चौ. किमी लांबीचे रस्ते निर्माण करण्यात आले. रस्ते उभारण्यासाठी १९८५ नंतर सीमासडक संघटन (बीआरओ)ला आणण्यात आले होते. त्यांनी एटापल्ली, भामरागड आदी भागात रस्ते व पूल उभारणीचे काम केले. भामरागड तालुक्यात पामुलगौतम नदीवर धोडराजवळील पूल तर एटापल्ली येथे बांडे नदीवर मोठा पूल उभारला. याशिवाय रस्त्यांचीही अनेक कामे पूर्ण केली. २०१२ मध्ये जिल्ह्यातून बीआरओने आपला गाशा गुंडाळला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हे काम सोपविण्यात आले. २००९ मध्ये नक्षलवाद्यांनी अनेक बांधकाम व्यावसायिकांची हत्या केली त्यामुळे रस्ते विकासाच्या कामाची गती मंदाविली. आजही जवळजवळ १५ ते २० कामे बंद पडून आहेत. अनेक कामांना कंत्राटदार मिळेनासे झाले आहेत. नक्षलवाद्यांकडून कंत्राटदारांची वाहने जाळल्याच्याही घटना गेल्या ५ वर्षांत वाढल्या आहेत. या घटनांमध्ये सुमारे ४ कोटी रूपयाची हानी झालेली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)