शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

टाळेबंदीत केवळ २९० कामगारांनीच नोंदवली तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:47 IST

रियाज अहमद / लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना महामारीने अनेकांच्या रोजगारावर मोठे संकट ओढवले आहे. टाळेबंदीच्या काळात कर्मचाऱ्यांना ...

रियाज अहमद / लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना महामारीने अनेकांच्या रोजगारावर मोठे संकट ओढवले आहे. टाळेबंदीच्या काळात कर्मचाऱ्यांना कायम ठेवणे आणि पगार नियमित देण्याचे निर्देश प्रशासनाने दिल्यानंतरही अनेक कंपन्यांनी कामगारांची कपात केली आणि कायम ठेवण्याच्या स्थितीत पगार रोखूनही धरला आहे. त्यामुळे कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. कायदेविषयक अधिकारांची माहिती नसल्याने कामगारांचा आवाज दाबला जात आहे. त्यामुळे या भयंकर संकटातही टाळेबंदीच्या काळात केवळ २९० कामगारांनीच आपल्या तक्रारी कामगार आयुक्त कार्यालयात नोंदवल्या आहेत.

कामगार आयुक्त कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, मार्च ते जुलै २०२० पर्यंत टाळेबंदीदरम्यान कामगार कायद्याच्या अंतर्गत २९० कामगारांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. यातील सर्वाधिक २४० तक्रारी कामगारांना पगार मिळाले नसल्याच्या आहेत, तर ५० तक्रारी टाळेबंदीत कामावरून कमी केल्याच्या आहेत. विभागाने यातील जवळपास २०० तक्रारींचा निपटारा केला आहे, तर उर्वरित तक्रारींवरील सुनवाई अजूनही प्रलंबित आहेत. कर्मचाऱ्यांना काढून टाकणे, पगार न देणे, शारीरिक-मानसिक प्रताडना, आदी रोखण्यासाठी लेबर ॲक्टअंतर्गत कारवाई केली जाते. प्रकरणांचा निपटारा न झाल्यास लेबर कोर्टमध्ये सुनवाई होते; परंतु बहुतांश कामगार आपल्या कायदेविषयक अधिकारांपासून वंचित आहेत. अधिकारांची माहितीच नसल्याने कामगार आपल्या तक्रारी कामगार कार्यालयापर्यंत पोहोचवतच नाहीत.

रेग्युलर व्हिजिटने मिळत होती माहिती

कामगार आयुक्त कार्यालयाकडून प्रतिष्ठानांमध्ये दर महिन्यात अधिकाऱ्यांच्या ७५ नियमित व्हिजिट होत होत्या. व्हिजिटदरम्यान अधिकारी कामगारांना त्यांच्या कायदेविषयक अधिकारांची माहिती देत होते. नंतर मात्र या नियमाला इन्सपेक्टर राज म्हणून बंद करण्यात आले. याचा फटका कामगारांना बसला आहे. कामगारांना त्यांच्या अधिकारांची माहिती मिळत नाही. त्यामुळेच समस्या असतानाही तक्रार केली जात नाही.

युनियनच्या माध्यमातून होतेय जनजागरण

फेब्रुवारी २०१९मध्ये नवा कायदा आल्यावर कामगारांच्या तक्रारीवर थेट कारवाई केली जात नाही. कारवाईपूर्वी प्रतिष्ठानकडून परवानगी घ्यावी लागते. रेग्युलर व्हिजिट आता बंद आहेत; परंतु युनियनच्या माध्यमातून कामगारांना त्यांच्या कायदेविषयक अधिकारांबाबत जागरुक केले जात आहे. कामगार जागरुक असल्यानेच त्यांच्या तक्रारी आमच्यापर्यंत पोहोचत आहेत.

- राजदीप धुर्वे, सहायक कामगार आयुक्त.

........