शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यानंतर ठाकरेंना धक्का देणार, २ आमदार वगळता इतर संपर्कात; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: मतदानाआधीच ३ माजी मुख्यमंत्र्यांनी 'गेम' बदलला; इंडिया आघाडीला धक्का
3
भारताच्या ५० रुपयांचं मूल्य नेपाळमध्ये किती असेल? आश्चर्यचकित करेल उत्तर!
4
Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा
5
"ते दोन पवित्र आत्मे पितृ पंधरवड्यात जमिनीवर आले तर काय प्रश्न विचारतील?’’ भाजपाचा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना टोला
6
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका! ८३ मिलियन डॉलर्सच्या नूकसान भरपाईचा निर्णय कायम
7
"मीही बोलू शकले असते, पण.."; धनश्री वर्माचं मोठं विधान, चहलबद्दल म्हणाली- "त्याची अब्रू..."
8
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
9
तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 'हे' ५ शेअर्स आहेत का? ब्रोकरेज फर्मने सांगितली बंपर कमाईची संधी
10
Shantanu Naidu: रतन टाटांचा तरुण सहकारी राहिलेल्या शंतनू नायडूने प्रेमाची कबुली दिली? तिच्यासोबतचे फोटो आले समोर
11
टायगर श्रॉफनं मुंबईमध्ये ₹१५.६० कोटींना विकलं लक्झरी अपार्टमेंट, पाहा डिटेल्स; कितीला खरेदी केलेली प्रॉपर्टी?
12
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
13
"मराठी सिनेसृष्टीने दोन कलाकार गमावले", प्रिया मराठेसोबत लावला फोटो, मरणाची बातमी पाहून मराठी अभिनेता संतापला
14
Post Office ची ही स्कीम करेल मालामाल; दर महिन्याला मिळेल ₹५,५०० चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
15
Asia Cup 2025, AFG vs HK Head to Head Record : 'चमत्कारी' संघासमोर ते चमत्कार दाखवतील का?
16
"आई शप्पथ गळा कापेन...", अली गोनीचा ट्रोलर्सला इशारा; 'त्या' व्हिडीओवरुन झालेला वाद
17
"तू बाहेर चल, तुझं तोंडच फोडतो…’’, ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले
18
शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २६१ अंकांनी वधारला; Nifty मध्येही तेजी, 'या' स्टॉक्समध्ये मोठी तेजी
19
लवकर भरा आयकर रिटर्न, अन्यथा...; कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त आठवडाच शिल्लक
20
Asia Cup 2025: संजू सॅमसन पहिला सामना खेळणार की नाही? टीम इंडियाच्या सरावात चित्र स्पष्ट

टाळेबंदीत केवळ २९० कामगारांनीच नोंदवली तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:47 IST

रियाज अहमद / लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना महामारीने अनेकांच्या रोजगारावर मोठे संकट ओढवले आहे. टाळेबंदीच्या काळात कर्मचाऱ्यांना ...

रियाज अहमद / लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना महामारीने अनेकांच्या रोजगारावर मोठे संकट ओढवले आहे. टाळेबंदीच्या काळात कर्मचाऱ्यांना कायम ठेवणे आणि पगार नियमित देण्याचे निर्देश प्रशासनाने दिल्यानंतरही अनेक कंपन्यांनी कामगारांची कपात केली आणि कायम ठेवण्याच्या स्थितीत पगार रोखूनही धरला आहे. त्यामुळे कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. कायदेविषयक अधिकारांची माहिती नसल्याने कामगारांचा आवाज दाबला जात आहे. त्यामुळे या भयंकर संकटातही टाळेबंदीच्या काळात केवळ २९० कामगारांनीच आपल्या तक्रारी कामगार आयुक्त कार्यालयात नोंदवल्या आहेत.

कामगार आयुक्त कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, मार्च ते जुलै २०२० पर्यंत टाळेबंदीदरम्यान कामगार कायद्याच्या अंतर्गत २९० कामगारांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. यातील सर्वाधिक २४० तक्रारी कामगारांना पगार मिळाले नसल्याच्या आहेत, तर ५० तक्रारी टाळेबंदीत कामावरून कमी केल्याच्या आहेत. विभागाने यातील जवळपास २०० तक्रारींचा निपटारा केला आहे, तर उर्वरित तक्रारींवरील सुनवाई अजूनही प्रलंबित आहेत. कर्मचाऱ्यांना काढून टाकणे, पगार न देणे, शारीरिक-मानसिक प्रताडना, आदी रोखण्यासाठी लेबर ॲक्टअंतर्गत कारवाई केली जाते. प्रकरणांचा निपटारा न झाल्यास लेबर कोर्टमध्ये सुनवाई होते; परंतु बहुतांश कामगार आपल्या कायदेविषयक अधिकारांपासून वंचित आहेत. अधिकारांची माहितीच नसल्याने कामगार आपल्या तक्रारी कामगार कार्यालयापर्यंत पोहोचवतच नाहीत.

रेग्युलर व्हिजिटने मिळत होती माहिती

कामगार आयुक्त कार्यालयाकडून प्रतिष्ठानांमध्ये दर महिन्यात अधिकाऱ्यांच्या ७५ नियमित व्हिजिट होत होत्या. व्हिजिटदरम्यान अधिकारी कामगारांना त्यांच्या कायदेविषयक अधिकारांची माहिती देत होते. नंतर मात्र या नियमाला इन्सपेक्टर राज म्हणून बंद करण्यात आले. याचा फटका कामगारांना बसला आहे. कामगारांना त्यांच्या अधिकारांची माहिती मिळत नाही. त्यामुळेच समस्या असतानाही तक्रार केली जात नाही.

युनियनच्या माध्यमातून होतेय जनजागरण

फेब्रुवारी २०१९मध्ये नवा कायदा आल्यावर कामगारांच्या तक्रारीवर थेट कारवाई केली जात नाही. कारवाईपूर्वी प्रतिष्ठानकडून परवानगी घ्यावी लागते. रेग्युलर व्हिजिट आता बंद आहेत; परंतु युनियनच्या माध्यमातून कामगारांना त्यांच्या कायदेविषयक अधिकारांबाबत जागरुक केले जात आहे. कामगार जागरुक असल्यानेच त्यांच्या तक्रारी आमच्यापर्यंत पोहोचत आहेत.

- राजदीप धुर्वे, सहायक कामगार आयुक्त.

........