शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

औरंगाबाद, पुण्याच्या बसमध्ये केवळ १५ प्रवासीच ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:07 IST

नागपूर : कोरोनामुळे प्रवासी घराबाहेर पडणे टाळत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नावरही त्याचा परिणाम पडला आहे. जिल्ह्याबाहेर जाणेही प्रवाशांनी ...

नागपूर : कोरोनामुळे प्रवासी घराबाहेर पडणे टाळत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नावरही त्याचा परिणाम पडला आहे. जिल्ह्याबाहेर जाणेही प्रवाशांनी कमी केल्यामुळे एसटी महामंडळाच्या बसेसला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. यात पुणे आणि औरंगाबादला जाणाऱ्या बसमध्ये केवळ १५ प्रवासीच मिळत असल्याची स्थिती आहे.

मुख्यालयातून जातात ५५० फेऱ्या

नागपूर शहरात गणेशपेठ आगारातून पूर्वी ११५० फेऱ्या नियमित सोडण्यात येत होत्या. परंतु कोरोनामुळे प्रवाशांनी प्रवास टाळणे सुरु केल्यामुळे आता केवळ ५५० फेऱ्या सोडण्यात येत आहेत. ११५० फेऱ्या असताना २५ हजार प्रवासी प्रवास करायचे. परंतु फेऱ्या कमी करण्यात आल्यामुळे प्रवाशांची संख्या केवळ १२ हजारावर आली आहे.

पुणे, औरंगाबादच्या बसमध्ये प्रवासी कमी

कोरोनाच्या पूर्वी पुण्यासाठी ६ बसेस सोडण्यात येत होत्या. परंतु प्रवाशांची संख्या घटल्यामुळे एसटी महामंडळाने पुण्याला जाणाऱ्या ४ बसेस बंद केल्या. सध्या दोनच बसेस पुण्याला जातात. औरंगाबादलाही जाणाऱ्या ६ बसेसपैकी ४ बसेस बंद करण्यात आल्या आहेत. प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद असल्यामुळे पुणे आणि औरंगाबादच्या बसेसमध्ये केवळ १४ ते १५ प्रवासीच मिळत आहेत.

या मार्गावर आहे गर्दी

नागपूरवरून सद्यस्थितीत मध्य प्रदेशात जाणाऱ्या बसेसमध्ये गर्दी आहे. परंतु मध्य प्रदेश शासनाने सीमा बंद केल्यामुळे मध्य प्रदेशात जाणारे प्रवासी देवरी, गोंदियापर्यंत जात असून एका बसमध्ये २२ प्रवासी मिळत आहेत तर नागपूरवरून अमरावतीला जाणाऱ्या बसेसला प्रवाशांचा प्रतिसाद आहे. परंतु पुणे, औरंगाबाद, यवतमाळ, चंद्रपूर, नांदेड या मार्गावर प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद असून एका बसमध्ये केवळ १५ प्रवासीच मिळत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

नाईट आऊट बसेसला प्रतिसाद नाही

रात्री मुक्कामी जाणाऱ्या (नाईट आऊट) बसेस पूर्वी २३ सोडण्यात येत होत्या. अंबेजोगाई, पुसद, वाशिम, नांदेड, पंढरपूर, सोलापूर, अकोला, राजनांदगाव, शिवनी, मोहगाव, लोधीखेडा आणि विविध जिल्ह्याच्या ठिकाणी या बसेस जात होत्या. परंतु कोरोनामुळे प्रवाशांची संख्या घटल्यामुळे आता केवळ १३ बसेस सोडण्यात येत आहेत. या १३ बसेसमध्येही प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत असून एका बसमध्ये १५ ते १६ प्रवासीच मिळत असल्याची स्थिती आहे.

जिल्ह्याबाहेर जाणारे प्रवासी झाले कमी

कोरोनाच्या पूर्वी जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या २० हजाराच्या आसपास होती. परंतु कोरोनामुळे प्रवासी जिल्ह्याबाहेर जाणे टाळत आहेत. त्यामुळे जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या १० हजारावर आली आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढेपर्यंत फेऱ्यांची संख्या न वाढविण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

गरजेनुसार बसेस सोडण्यात येतात

‘कोरोनामुळे एसटी बसेसमधील प्रवाशांची संख्या कमी झाली असून गरजेनुसार बसेस सोडण्यात येत आहेत. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर पूर्ववत बसेस सुरु करण्यात येतील.’

-अनिल आमनेरकर, आगारप्रमुख, गणेशपेठ आगार

...................