शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
5
Irani Cup 2025 : मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
6
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
7
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
8
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
9
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
10
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
11
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
12
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
13
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
14
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
15
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
16
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
17
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
18
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
19
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
20
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?

काँग्रेस-राष्ट्रवादीचे केवळ १० आमदार प्रभावशाली

By admin | Updated: May 19, 2014 00:49 IST

महाराष्ट्रासह देशभरात काँग्रेसच्या पानिपतासाठी ‘नमो’ त्सुनामीसह विविध कारणांचा यासाठी बागुलबुवा केला जात आहे. मात्र राज्यातील या पक्षाच्या काही आमदारांनी आघाडीच्या उमेदवारांना आपल्या

 विलास गावंडे -यवतमाळ

महाराष्ट्रासह देशभरात काँग्रेसच्या पानिपतासाठी ‘नमो’ त्सुनामीसह विविध कारणांचा यासाठी बागुलबुवा केला जात आहे. मात्र राज्यातील या पक्षाच्या काही आमदारांनी आघाडीच्या उमेदवारांना आपल्या मतदारसंघातून आघाडी मिळवून दिली आहे. राज्यात सत्ता असलेल्या या पक्षाच्या एकूण १४४ सदस्यांपैकी केवळ १० आमदार प्रभावशाली ठरले आहे. लोकसभेत महायुतीचा उमेदवार विजयी झालेल्या मतदारसंघातील हे आमदार आहेत. २८८ सदस्य संख्या असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत काँग्रेसचे ८२ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ६२ सदस्य आहेत. १४ व्या लोकसभेत हे आमदार आपल्या पक्षाच्या उमेदवाराला आघाडी मिळवून देतील, ही स्वाभाविक अपेक्षा असताना केवळ १० आमदार या परीक्षेत पास झाले आहेत. लोकसभेच्या बहुतांश मतदारसंघात आघाडीतील सहकारी पक्षाने प्रामाणिकपणे काम केले नाही, अशी ओरड आहे. याच कारणाखाली आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र दहा आमदारांनी आपल्या मतदारसंघात घेतलेली आघाडी या प्रश्नालाही बाजूला सारणारी आहे. प्रत्येक पक्षात मतभेद असतातच पण परिस्थिती पाहून त्याला सामोरे जावे लागते. नेमके हेच या दहा आमदारांनी दाखवून दिले आहे. इतर आमदारांसाठी हा एक धडा आहे. महाराष्ट्रातील काही मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. या मतदारसंघांमध्ये असलेल्या या पक्षाच्या काही आमदारांना आघाडी मिळवून देता आली नसली तरी इतर सहकारी आमदारांनी दिलेली साथ या पक्षाच्या उमेदवारांच्या यशात मैलाचा दगड ठरली आहे. लोकप्रतिनिधीचा आपल्या मतदारसंघावर प्रभाव असला तर कुठलीही लाट आणि विरोध झुगारून यश संपादन करता येते, हेच यातून सिद्ध झाले आहे.