शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

३१ मेपूर्वी शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:07 IST

नागपूर : जि.प. शिक्षकांच्या ३१ मेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने बदल्या करण्याबाबतचा शासन निर्णय ग्रामविकास विभागाकडून ७ एप्रिल रोजी निर्गमित ...

नागपूर : जि.प. शिक्षकांच्या ३१ मेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने बदल्या करण्याबाबतचा शासन निर्णय ग्रामविकास विभागाकडून ७ एप्रिल रोजी निर्गमित करण्यात आला आहे. शिक्षकांच्या बदलीबाबत यापूर्वीचा २७ फेब्रुवारी २०१७ चा शासन निर्णय प्रचंड वादग्रस्त ठरला होता. त्यामुळे या शासन निर्णयात बदल करण्याची मागणी शिक्षक संघटनाकडून सातत्याने करण्यात आली होती. शासनाकडून जि.प. पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. त्या शासन निर्णयातील तरतुदीमध्ये बऱ्याच सुधारणा करून नवीन शासन निर्णय तयार केला आहे. नव्याने निर्गमित शासन निर्णयाबाबतसुद्धा शिक्षक व शिक्षक संघटनांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया दिसून येत आहेत.

नवीन शासन निर्णयातील तरतुदी व मार्गदर्शक सूचनानुसार सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षांची सेवा व एका शाळेत ५ वर्षांची सेवा पूर्ण करणारे तसेच अवघड क्षेत्रात ३ वर्षे सेवा पूर्ण करणारे शिक्षक बदलीकरिता पात्र ठरणार आहेत. त्यामुळे सन २०१८ च्या तुलनेत बऱ्याच कमी प्रमाणात बदल्या होणार, असे दिसून येते. कर्मचाऱ्याच्या जोडीदारास गंभीर आजार असल्यास अशा कर्मचाऱ्यांना संवर्ग १ चा लाभ मिळणार आहे. तर संवर्ग २ चा लाभ घेणाऱ्या शिक्षकांचा पुढील बदलीच्या वेळी एक एकक म्हणून बदलीसाठी विचार करण्यात येणार आहे. संवर्ग १ व २ अंतर्गत बदली करणाऱ्यांना पुढील तीन वर्षे बदली करता येणार नाही.

अवघड गावांची संख्या घटणार

अवघड गावांची निश्चिती करण्याकरिता एकूण सात निकष दिले असून त्यापैकी तीन निकषांची पूर्तता करणाऱ्या गावाचीच अवघड क्षेत्रातील गाव म्हणून निश्चिती होणार असल्याने यावर्षी अवघड गावांची संख्या घटण्याची शक्यता आहे.

खोटी माहिती देणाऱ्या शिक्षकांचे निलंबन

खोटी माहिती सादर करून संवर्ग १ व संवर्ग २ मध्ये बदलीचा लाभ घेतल्यास अशा शिक्षकांना निलंबित करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरू करावी, अशी स्पष्ट तरतूद या शासन निर्णयात करण्यात आली आहे.

- सन २०१८ च्या बदलीतील रँडम व विस्थापित शिक्षकांकरिता सेवाज्येष्ठतेची अट न ठेवता त्यांना संवर्ग १ मध्ये बदलीची संधी द्यावी. बदलीकरिता सेवाज्येष्ठता पात्रता तारीख ३० जून गृहीत धरण्यात यावी. तसेच अवघड गावांची निवड करण्याबाबतचे निकष शिथिल करण्यात यावे.

-लीलाधर ठाकरे, जिल्हाध्यक्ष,

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, जिल्हा नागपूर