शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

नागपूर जिल्ह्यातील असेही एक गाव विकासाने झपाटलेले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 23:41 IST

ग्रा.प.निवडणूक म्हणजे गटबाजी आली. या गटबाजीतून होणारे वाद आणि भांडणेही नवीन नाही ! वैमनस्य असल्याशिवाय हल्ली गावातील राजकारणच पुढे सरकत नाही. मात्र या सर्व बाबींना बगल देत केवळ विकासाच्या मुद्यावर एकसंघ होत नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील मरगसूरच्या ग्रामस्थांनी एक नवा आदर्श समाजापुढे आणि भरकटत चाललेल्या राजकारण्यापुढे उभा केला आहे. गावाच्या विकासावर एकमत करीत येथे सलग तिसऱ्यांदा ग्रा.प.ची निवडणूक बिनविरोध करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसलग तिसऱ्यांदा ग्रा.प.बिनविरोध : राजकारणी घेणार का आदर्श ?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्रा.प.निवडणूक म्हणजे गटबाजी आली. या गटबाजीतून होणारे वाद आणि भांडणेही नवीन नाही ! वैमनस्य असल्याशिवाय हल्ली गावातील राजकारणच पुढे सरकत नाही. मात्र या सर्व बाबींना बगल देत केवळ विकासाच्या मुद्यावर एकसंघ होत नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील मरगसूरच्या ग्रामस्थांनी एक नवा आदर्श समाजापुढे आणि भरकटत चाललेल्या राजकारण्यापुढे उभा केला आहे. गावाच्या विकासावर एकमत करीत येथे सलग तिसऱ्यांदा ग्रा.प.ची निवडणूक बिनविरोध करण्यात आली आहे.जिल्ह्यातील ३७० पेक्षा अधिक ग्रा.प.मध्ये २६ रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. यासाठी गावोगावी गटबाजी आणि प्रचाराला उधाण आले असतांना आज मरगसूरमध्ये मात्र विकासपर्वाचा गुलाल उधळला जात आहे.तालुक्यातील मरगसूर व आलागोंदी ही दोन गावे मिळून गटग्रामपंचायत मरगसूर बनलेली आहे. गावातील शिक्षित तरु ण माजी सरपंच हरिभाऊ मोहतकर व श्रीकृष्ण मानकर यांनी एकत्रित गावचे प्रबोधन केले. म्हणून सलग तिसºयांदा ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आली.पहिल्या वेळेस श्रीकृष्ण मानकर तर दुसऱ्यांदा हरिभाऊ मोहतकर अविरोध सरपंच झाले होते.आता सरपंचपदाची माळ संगीता मानकर यांच्या गळात पडली असून सदस्य म्हणून हरिभाऊ मोहतकर ,अरु ण टेकाम,राजेंद्र गोतमारे,अनसूया इरपाची,विनिता सहारे, शशिकला नेहारे,सीमा नेहारे बिनविरोध निवडून आलेल्या आहेत.मागील वेळेस सरपंच हरिभाऊ मोहतकर यांनी ग्रामपंचायत सभागृह, स्मशानभूमी रस्ता व शेड,आलागोंदी शाळेला सुरक्षा भिंत,तलाव दुरु स्ती,पाणीपुरवठा योजना,भवानी माता धाम विकास ,गटार व्यवस्था, घरकुल योजनेत घरे,आदिवासी वस्तीत सिमेंट रस्ते व दिव्याची सोय, एल.ए.डी लाईट प्रकाश योजना,आलागोंदी येथे टाकीची व्यवस्था,आलागोंदी डिजिटल शाळा इत्यादी विकासात्मक कामे केली.यामुळे ग्रामस्थांनी पुन्हा निवडणूक बिनविरोध होण्याकरिता सहकार्य केले.सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख, युवा नेते सलील देशमुख, जि. प. सदस्य चंद्रशेखर चिखले, सामाजिक कार्यकर्ते जयंत टालाटूले,बंडू राठोड,संजय डांगोरे आदींनी अभिनंदन केले आहे.

 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक