शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील असेही एक गाव विकासाने झपाटलेले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 23:41 IST

ग्रा.प.निवडणूक म्हणजे गटबाजी आली. या गटबाजीतून होणारे वाद आणि भांडणेही नवीन नाही ! वैमनस्य असल्याशिवाय हल्ली गावातील राजकारणच पुढे सरकत नाही. मात्र या सर्व बाबींना बगल देत केवळ विकासाच्या मुद्यावर एकसंघ होत नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील मरगसूरच्या ग्रामस्थांनी एक नवा आदर्श समाजापुढे आणि भरकटत चाललेल्या राजकारण्यापुढे उभा केला आहे. गावाच्या विकासावर एकमत करीत येथे सलग तिसऱ्यांदा ग्रा.प.ची निवडणूक बिनविरोध करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसलग तिसऱ्यांदा ग्रा.प.बिनविरोध : राजकारणी घेणार का आदर्श ?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्रा.प.निवडणूक म्हणजे गटबाजी आली. या गटबाजीतून होणारे वाद आणि भांडणेही नवीन नाही ! वैमनस्य असल्याशिवाय हल्ली गावातील राजकारणच पुढे सरकत नाही. मात्र या सर्व बाबींना बगल देत केवळ विकासाच्या मुद्यावर एकसंघ होत नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील मरगसूरच्या ग्रामस्थांनी एक नवा आदर्श समाजापुढे आणि भरकटत चाललेल्या राजकारण्यापुढे उभा केला आहे. गावाच्या विकासावर एकमत करीत येथे सलग तिसऱ्यांदा ग्रा.प.ची निवडणूक बिनविरोध करण्यात आली आहे.जिल्ह्यातील ३७० पेक्षा अधिक ग्रा.प.मध्ये २६ रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. यासाठी गावोगावी गटबाजी आणि प्रचाराला उधाण आले असतांना आज मरगसूरमध्ये मात्र विकासपर्वाचा गुलाल उधळला जात आहे.तालुक्यातील मरगसूर व आलागोंदी ही दोन गावे मिळून गटग्रामपंचायत मरगसूर बनलेली आहे. गावातील शिक्षित तरु ण माजी सरपंच हरिभाऊ मोहतकर व श्रीकृष्ण मानकर यांनी एकत्रित गावचे प्रबोधन केले. म्हणून सलग तिसºयांदा ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आली.पहिल्या वेळेस श्रीकृष्ण मानकर तर दुसऱ्यांदा हरिभाऊ मोहतकर अविरोध सरपंच झाले होते.आता सरपंचपदाची माळ संगीता मानकर यांच्या गळात पडली असून सदस्य म्हणून हरिभाऊ मोहतकर ,अरु ण टेकाम,राजेंद्र गोतमारे,अनसूया इरपाची,विनिता सहारे, शशिकला नेहारे,सीमा नेहारे बिनविरोध निवडून आलेल्या आहेत.मागील वेळेस सरपंच हरिभाऊ मोहतकर यांनी ग्रामपंचायत सभागृह, स्मशानभूमी रस्ता व शेड,आलागोंदी शाळेला सुरक्षा भिंत,तलाव दुरु स्ती,पाणीपुरवठा योजना,भवानी माता धाम विकास ,गटार व्यवस्था, घरकुल योजनेत घरे,आदिवासी वस्तीत सिमेंट रस्ते व दिव्याची सोय, एल.ए.डी लाईट प्रकाश योजना,आलागोंदी येथे टाकीची व्यवस्था,आलागोंदी डिजिटल शाळा इत्यादी विकासात्मक कामे केली.यामुळे ग्रामस्थांनी पुन्हा निवडणूक बिनविरोध होण्याकरिता सहकार्य केले.सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख, युवा नेते सलील देशमुख, जि. प. सदस्य चंद्रशेखर चिखले, सामाजिक कार्यकर्ते जयंत टालाटूले,बंडू राठोड,संजय डांगोरे आदींनी अभिनंदन केले आहे.

 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक