शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

नागपूर जिल्ह्यातील असेही एक गाव विकासाने झपाटलेले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 23:41 IST

ग्रा.प.निवडणूक म्हणजे गटबाजी आली. या गटबाजीतून होणारे वाद आणि भांडणेही नवीन नाही ! वैमनस्य असल्याशिवाय हल्ली गावातील राजकारणच पुढे सरकत नाही. मात्र या सर्व बाबींना बगल देत केवळ विकासाच्या मुद्यावर एकसंघ होत नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील मरगसूरच्या ग्रामस्थांनी एक नवा आदर्श समाजापुढे आणि भरकटत चाललेल्या राजकारण्यापुढे उभा केला आहे. गावाच्या विकासावर एकमत करीत येथे सलग तिसऱ्यांदा ग्रा.प.ची निवडणूक बिनविरोध करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसलग तिसऱ्यांदा ग्रा.प.बिनविरोध : राजकारणी घेणार का आदर्श ?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्रा.प.निवडणूक म्हणजे गटबाजी आली. या गटबाजीतून होणारे वाद आणि भांडणेही नवीन नाही ! वैमनस्य असल्याशिवाय हल्ली गावातील राजकारणच पुढे सरकत नाही. मात्र या सर्व बाबींना बगल देत केवळ विकासाच्या मुद्यावर एकसंघ होत नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील मरगसूरच्या ग्रामस्थांनी एक नवा आदर्श समाजापुढे आणि भरकटत चाललेल्या राजकारण्यापुढे उभा केला आहे. गावाच्या विकासावर एकमत करीत येथे सलग तिसऱ्यांदा ग्रा.प.ची निवडणूक बिनविरोध करण्यात आली आहे.जिल्ह्यातील ३७० पेक्षा अधिक ग्रा.प.मध्ये २६ रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. यासाठी गावोगावी गटबाजी आणि प्रचाराला उधाण आले असतांना आज मरगसूरमध्ये मात्र विकासपर्वाचा गुलाल उधळला जात आहे.तालुक्यातील मरगसूर व आलागोंदी ही दोन गावे मिळून गटग्रामपंचायत मरगसूर बनलेली आहे. गावातील शिक्षित तरु ण माजी सरपंच हरिभाऊ मोहतकर व श्रीकृष्ण मानकर यांनी एकत्रित गावचे प्रबोधन केले. म्हणून सलग तिसºयांदा ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आली.पहिल्या वेळेस श्रीकृष्ण मानकर तर दुसऱ्यांदा हरिभाऊ मोहतकर अविरोध सरपंच झाले होते.आता सरपंचपदाची माळ संगीता मानकर यांच्या गळात पडली असून सदस्य म्हणून हरिभाऊ मोहतकर ,अरु ण टेकाम,राजेंद्र गोतमारे,अनसूया इरपाची,विनिता सहारे, शशिकला नेहारे,सीमा नेहारे बिनविरोध निवडून आलेल्या आहेत.मागील वेळेस सरपंच हरिभाऊ मोहतकर यांनी ग्रामपंचायत सभागृह, स्मशानभूमी रस्ता व शेड,आलागोंदी शाळेला सुरक्षा भिंत,तलाव दुरु स्ती,पाणीपुरवठा योजना,भवानी माता धाम विकास ,गटार व्यवस्था, घरकुल योजनेत घरे,आदिवासी वस्तीत सिमेंट रस्ते व दिव्याची सोय, एल.ए.डी लाईट प्रकाश योजना,आलागोंदी येथे टाकीची व्यवस्था,आलागोंदी डिजिटल शाळा इत्यादी विकासात्मक कामे केली.यामुळे ग्रामस्थांनी पुन्हा निवडणूक बिनविरोध होण्याकरिता सहकार्य केले.सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख, युवा नेते सलील देशमुख, जि. प. सदस्य चंद्रशेखर चिखले, सामाजिक कार्यकर्ते जयंत टालाटूले,बंडू राठोड,संजय डांगोरे आदींनी अभिनंदन केले आहे.

 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक