शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
4
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
5
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
6
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
7
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
8
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
9
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
10
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
11
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
12
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
13
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
14
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
15
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
16
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
17
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
18
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
19
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
20
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ

एकाला सात तर, दोघांना पाच वर्षे सश्रम कारावास

By admin | Updated: September 25, 2015 03:47 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तरुणाच्या हत्याप्रकरणातील एका आरोपीला सात वर्षे तर, दोन आरोपींना पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

हायकोर्ट : तरुणाचे अपहरण करून हत्यानागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तरुणाच्या हत्याप्रकरणातील एका आरोपीला सात वर्षे तर, दोन आरोपींना पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.प्रमोद ऊर्फ गज्जू कन्हय्यालाल शाहू (४२), रा. बजेरिया, मुकेश ऊर्फ मुसा रामशंकर शिवहरे (३७), रा. दौलतवाडी व राजकुमार केळाजी वानखेडे (५४), रा. वाडी अशी आरोपींची नावे आहेत. सत्र न्यायालयाने या आरोपींना भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत जन्मठेप व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त सश्रम कारावास तर, कलम ३६४ (अपहरण) अंतर्गत पाच वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली होती. एका आरोपीला निर्दोष सोडले होते. दोषी आरोपींनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व प्रसन्न वराळे यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता आरोपींचे अपील अंशत: मंजूर करून सत्र न्यायालयाच्या निर्णयात बदल केला. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, तिन्ही आरोपींना भादंविच्या कलम ३०२ ऐवजी कलम ३०४-२ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत दोषी ठरवून प्रमोदला सात वर्षे सश्रम कारावास व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त सश्रम कारावास तर, मुकेश व राजकुमारला पाच वर्षे सश्रम कारावास व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. सत्र न्यायालयाचा अन्य आदेश कायम ठेवण्यात आला आहे. मृताचे नाव राकेश शाहू होते. ७ डिसेंबर २००८ रोजी आरोपींनी राकेशचे अपहरण केले होते. यानंतर ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास कळमेश्वर पोलिसांच्या हद्दीतील एका शेतात राकेश जखमी अवस्थेत आढळून आला. राकेशला मेयो रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. आरोपींनी घरगुती वादातून राकेशला गंभीर मारहाण केली होती. गणेशपेठ पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला होता. आरोपींतर्फे वरिष्ठ वकील सुबोध धर्माधिकारी, अ‍ॅड. शशांक मनोहर व अ‍ॅड. आर. के. तिवारी तर, शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील राजेश नायक यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)