शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

एकाला सात तर, दोघांना पाच वर्षे सश्रम कारावास

By admin | Updated: September 25, 2015 03:47 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तरुणाच्या हत्याप्रकरणातील एका आरोपीला सात वर्षे तर, दोन आरोपींना पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

हायकोर्ट : तरुणाचे अपहरण करून हत्यानागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तरुणाच्या हत्याप्रकरणातील एका आरोपीला सात वर्षे तर, दोन आरोपींना पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.प्रमोद ऊर्फ गज्जू कन्हय्यालाल शाहू (४२), रा. बजेरिया, मुकेश ऊर्फ मुसा रामशंकर शिवहरे (३७), रा. दौलतवाडी व राजकुमार केळाजी वानखेडे (५४), रा. वाडी अशी आरोपींची नावे आहेत. सत्र न्यायालयाने या आरोपींना भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत जन्मठेप व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त सश्रम कारावास तर, कलम ३६४ (अपहरण) अंतर्गत पाच वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली होती. एका आरोपीला निर्दोष सोडले होते. दोषी आरोपींनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व प्रसन्न वराळे यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता आरोपींचे अपील अंशत: मंजूर करून सत्र न्यायालयाच्या निर्णयात बदल केला. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, तिन्ही आरोपींना भादंविच्या कलम ३०२ ऐवजी कलम ३०४-२ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत दोषी ठरवून प्रमोदला सात वर्षे सश्रम कारावास व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त सश्रम कारावास तर, मुकेश व राजकुमारला पाच वर्षे सश्रम कारावास व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. सत्र न्यायालयाचा अन्य आदेश कायम ठेवण्यात आला आहे. मृताचे नाव राकेश शाहू होते. ७ डिसेंबर २००८ रोजी आरोपींनी राकेशचे अपहरण केले होते. यानंतर ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास कळमेश्वर पोलिसांच्या हद्दीतील एका शेतात राकेश जखमी अवस्थेत आढळून आला. राकेशला मेयो रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. आरोपींनी घरगुती वादातून राकेशला गंभीर मारहाण केली होती. गणेशपेठ पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला होता. आरोपींतर्फे वरिष्ठ वकील सुबोध धर्माधिकारी, अ‍ॅड. शशांक मनोहर व अ‍ॅड. आर. के. तिवारी तर, शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील राजेश नायक यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)