शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

२०१५ मध्ये स्तनाच्या कर्करोगाचे दीड लाखांवर रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 20:16 IST

भारतात २०१५ मध्ये केवळ स्तनाच्या कर्करोगाचे १ लाख ५५ हजार नवे रुग्ण आढळून आले तर यातील ७६ हजार रुग्णांचा मृत्यू झाला. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांमध्ये याविषयी जनजागृती व्हावी, असे आवाहन वरिष्ठ मेडिकल आॅन्कोलॉजिस्ट डॉ. सुशील मानधनिया यांनी केले.

ठळक मुद्देडॉ. सुशील मानधनिया : आजार बळावण्यासाठी दुर्लक्ष, अज्ञान व लाज ठरतेय कारण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गर्भाशयाचा कर्करोग स्त्रियांमध्ये सर्वसामान्यपणे आढळणारा आजार आहे. ‘पॅपस्मियर्स’ आणि ‘एचपीव्ही’ (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) या नियमित चाचण्यांच्या मदतीने या आजाराची तपासणी करता येते. या आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी १४ वर्षांवरील मुला-मुलींना लस देणे हा एक चांगला पर्याय आहे. या शिवाय स्तनाच्या कर्करोगामध्ये स्वत:हून तपासणी करून निदान करणे हा एक चांगला पर्याय असतानाही दुर्लक्ष, अज्ञान व लाजेमुळे स्त्रिया कर्करोगाला गंभीरतेने घेत नाही. भारतात २०१५ मध्ये केवळ स्तनाच्या कर्करोगाचे १ लाख ५५ हजार नवे रुग्ण आढळून आले तर यातील ७६ हजार रुग्णांचा मृत्यू झाला. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांमध्ये याविषयी जनजागृती व्हावी, असे आवाहन वरिष्ठ मेडिकल आॅन्कोलॉजिस्ट डॉ. सुशील मानधनिया यांनी केले.८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने मंगळवारी आयोजित पत्रपरिषदेत डॉ. मानधनिया यांनी कर्करोगाला दूर ठेवण्यासाठी महिलांमध्ये जनजागृती व लवकर निदान यावर भर दिला. स्तनाचा कर्करोग हा भारतीय महिलांमध्ये सर्वात सामान्य आहे. दरदिवशी या कर्करोगाचे २०० नवे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे योग्य जीवनशैली व जनुकीय घटकांबद्दल अधिक जागृत राहणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.यांना कर्करोगाचा धोका अधिकडॉ. मानधनिया म्हणाले, स्तनाच्या कर्करोगाला कौटुंबिक इतिहास असतो. आपल्या निकटच्या नातेवाईकाला झाला असल्यास त्याच्याकडून तो पसरण्याची भीती असते. महिलांचे वय वाढते तसा धोकाही वाढतो. वयाच्या १२ व्या वर्षाच्या आधी मासिक पाळी सुरू होणे, वयाच्या ५० वर्षानंतर रजोनिवृत्ती संपणे, मूल झालेले नसणे तसेच मद्यपान, अधिक चरबीयुक्त आहार, चोथायुक्त अधिक आहार, धूम्रपान, लठ्ठपणा आणि आधी गर्भाशयाचा किंवा कोलोनचा कर्करोग झालेला असणे, अशा महिलांना स्तनाचा कर्करोग होण्याचा अधिक धोका असतो.एक लाख लोकसंख्येत स्तनाच्या कर्करोगाचे २५.८ रुग्णडॉ. मानधनिया म्हणाले, भारतात एक लाख लोकसंख्येमध्ये २५.८ रुग्ण हे स्तनाच्या कर्करोगाचे आढळून येतात. तर याच लोकसंख्येमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामध्ये २०.२ रुग्ण, आतड्यांच्या कर्करोगामध्ये ४.५ तर अंडाशयाचा व कोलोनचा कर्करोगामध्ये ४.५ रुग्ण आढळून येतात. पहिल्या टप्प्यातच कर्करोगाचे निदान झाल्यास उपचाराचा यशाचा टक्का ९० असतो तर तिसऱ्या  व चौथ्या टप्प्यात निदान झाल्यास हा टक्का १०वर येतो.

टॅग्स :cancerकर्करोगWomen's Day 2018महिला दिन २०१८