शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

दरवर्षी एक लाख बुबुळांची गरज : विकास महात्मे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 21:23 IST

देशात मृत्यूच्या एक टक्का जरी नेत्रदान झाले तरी संपूर्ण देशाची बुबुळाची गरज भागविल्या जाऊ शकते. यामुळे प्रत्येकाने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करावा, असे आवाहन पद्मश्री खा. डॉ. विकास महात्मे यांनी केले.

ठळक मुद्देनेत्रदान जनजागृती रॅली रविवारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतात दरवर्षी सुमारे ८० लाख लोकांचा मृत्यू होतो. मात्र यातील एक लाख लोकांचेही नेत्रदान होत नाही. यामुळे अनेकांवर अंधत्व जीवन जगण्याची वेळ येते. देशात मृत्यूच्या एक टक्का जरी नेत्रदान झाले तरी संपूर्ण देशाची बुबुळाची गरज भागविल्या जाऊ शकते. यामुळे प्रत्येकाने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करावा, असे आवाहन पद्मश्री खा. डॉ. विकास महात्मे यांनी केले.महात्मे आय बँक, आय हॉस्पिटलमधील नेत्रपेढीच्यावतीने नेत्रदान पंधरवड्याच्या निमित्ताने आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी ‘एसएमएम आय वेल्फेअर चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष डॉ. सुनीता महात्मे, डॉ. निखिलेश वैरागडे उपस्थित होते.डॉ. महात्मे म्हणाले, मोतीबिंदू, काचबिंदू आणि वाढत्या वयामुळे बुबुळाचे अंधत्व वाढत आहे. भारतात याचे प्रमाण १५.४ टक्के आहे. बुबुळ प्रत्यारोपण हाच एकमेव यावर उपचार आहे. यासाठी नेत्रदान होणे गरजेचे आहे. नेत्रदानाचा टक्का वाढविण्यास नेत्रपेढीचा मोलाचा वाटा असतो. गेल्या पाच वर्षात महात्मे आय हॉस्पिटलने ३०० हून अधिक लोकांमध्ये बुबुळ प्रत्यारोपण करून नवी दृष्टी दिली. एका प्रश्नाला उत्तर देताना खा. डॉ. महात्मे म्हणाले, मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र मोहीम चांगल्या गतीने सुरू आहे. यात शासनाचा निधी वाढवून देण्याचा प्रयत्न केला जाईल.डॉ. सुनीता महात्मे म्हणाल्या, नेत्रदानाचा संदेश लोकांपर्यंत पोहचण्यासाठी रविवार १ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली महात्मे आय बँक येथून सुरू होऊन जयप्रकाशनगर, सोमलवाडा होत संस्थेच्या आवारात समारोप होईल. रॅलीत सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. डॉ. वैरागडे म्हणाले, नेत्रदानाला वय, लिंग, रक्तगटाचे बंधन नाही. फार कमी अपवाद वगळता कुणीही नेत्रदान करू शकते. नेत्रदानाविषयी गैरसमज दूर व्हायला हवेत, असेही ते म्हणाले. या प्रसंगी नेत्रदानासाठी पुढाकार घेणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

 

 

 

टॅग्स :Vikas Mahatmeविकास महात्मेOrgan donationअवयव दान