शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

दरवर्षी एक लाख बुबुळांची गरज : विकास महात्मे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 21:23 IST

देशात मृत्यूच्या एक टक्का जरी नेत्रदान झाले तरी संपूर्ण देशाची बुबुळाची गरज भागविल्या जाऊ शकते. यामुळे प्रत्येकाने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करावा, असे आवाहन पद्मश्री खा. डॉ. विकास महात्मे यांनी केले.

ठळक मुद्देनेत्रदान जनजागृती रॅली रविवारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतात दरवर्षी सुमारे ८० लाख लोकांचा मृत्यू होतो. मात्र यातील एक लाख लोकांचेही नेत्रदान होत नाही. यामुळे अनेकांवर अंधत्व जीवन जगण्याची वेळ येते. देशात मृत्यूच्या एक टक्का जरी नेत्रदान झाले तरी संपूर्ण देशाची बुबुळाची गरज भागविल्या जाऊ शकते. यामुळे प्रत्येकाने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करावा, असे आवाहन पद्मश्री खा. डॉ. विकास महात्मे यांनी केले.महात्मे आय बँक, आय हॉस्पिटलमधील नेत्रपेढीच्यावतीने नेत्रदान पंधरवड्याच्या निमित्ताने आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी ‘एसएमएम आय वेल्फेअर चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष डॉ. सुनीता महात्मे, डॉ. निखिलेश वैरागडे उपस्थित होते.डॉ. महात्मे म्हणाले, मोतीबिंदू, काचबिंदू आणि वाढत्या वयामुळे बुबुळाचे अंधत्व वाढत आहे. भारतात याचे प्रमाण १५.४ टक्के आहे. बुबुळ प्रत्यारोपण हाच एकमेव यावर उपचार आहे. यासाठी नेत्रदान होणे गरजेचे आहे. नेत्रदानाचा टक्का वाढविण्यास नेत्रपेढीचा मोलाचा वाटा असतो. गेल्या पाच वर्षात महात्मे आय हॉस्पिटलने ३०० हून अधिक लोकांमध्ये बुबुळ प्रत्यारोपण करून नवी दृष्टी दिली. एका प्रश्नाला उत्तर देताना खा. डॉ. महात्मे म्हणाले, मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र मोहीम चांगल्या गतीने सुरू आहे. यात शासनाचा निधी वाढवून देण्याचा प्रयत्न केला जाईल.डॉ. सुनीता महात्मे म्हणाल्या, नेत्रदानाचा संदेश लोकांपर्यंत पोहचण्यासाठी रविवार १ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली महात्मे आय बँक येथून सुरू होऊन जयप्रकाशनगर, सोमलवाडा होत संस्थेच्या आवारात समारोप होईल. रॅलीत सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. डॉ. वैरागडे म्हणाले, नेत्रदानाला वय, लिंग, रक्तगटाचे बंधन नाही. फार कमी अपवाद वगळता कुणीही नेत्रदान करू शकते. नेत्रदानाविषयी गैरसमज दूर व्हायला हवेत, असेही ते म्हणाले. या प्रसंगी नेत्रदानासाठी पुढाकार घेणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

 

 

 

टॅग्स :Vikas Mahatmeविकास महात्मेOrgan donationअवयव दान