शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
2
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
3
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
4
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
5
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
6
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
7
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
8
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
9
दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
10
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
11
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
12
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
13
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
14
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
15
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका
16
1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
17
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
18
Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
19
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
20
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ

-तर एक लाख मागासवर्गीय अधिकाºयांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 01:56 IST

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत बढत्यांमधील आरक्षण देण्यात येणार नाही, असा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी तयार केला आणि तो मत मागविण्यासाठी विधी व न्याय विभागाकडे पाठविला आहे.

ठळक मुद्देबढत्यांमधील आरक्षण अनेकांच्या पदोन्नतीचे आदेश मागे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत बढत्यांमधील आरक्षण देण्यात येणार नाही, असा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी तयार केला आणि तो मत मागविण्यासाठी विधी व न्याय विभागाकडे पाठविला आहे. राज्य शासनाने हा निर्णय घेतला तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वीच राज्यातील तब्बल एक लाख शासकीय मागासवर्गीय कर्मचाºयांना थेट फटका बसणार आहे.काही दिवसांपूर्वीच मागासवर्गीय कर्मचारी संघटनेची मुख्य सचिवांसोबत नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत अनुशेषाबाबत चर्चा झाली होती. त्यात अनुसूचित जाती व जमातीच्या ७० हजार कर्मचारीअधिकाºयांच्या पदोन्नतीचा अनुशेष असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच भटके विमुक्तांचे २५ ते ३० हजार कर्मचारी अधिकाºयांचे पदोन्नती आरक्षणाचा अनुशेष असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार शासनाने पदोन्नती आरक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला तर त्याचा थेट फटका आताच या मागासवर्गीय अधिकारी-कर्मचाºयांना बसणार आहे. मागासवर्गीय शासकीय कर्मचाºयांच्या बढत्यांमधील आरक्षणाबाबत सध्या सर्वोच्च न्यायालयात वाद सुरू आहे. तत्पूर्वी बढत्यांमधील आरक्षणाचा शासनाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने रद्द ठरविला होता.उच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयास १२ आठवड्यांची स्थगिती दिली होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून बढत्यांमधील आरक्षण कायम राहील, अशी भूमिका राज्य शासनाने घेतली होती. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतरही हे आरक्षण कायम ठेवत राज्य सरकारने काही कर्मचारी व अधिकाºयांना पदोन्नती दिली होती. उच्च न्यायालयाची १२ आठवड्यांची स्थगिती २७ आॅक्टोबरला संपुष्टात आली. त्यातच बढत्यांमधील आरक्षण रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्याची राज्य शासनाची विनंती सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अमान्य केली होती. दरम्यान काही संघटनांनी बढत्यांमधील आरक्षण बंद करण्याची मागणी शासनाने केली आहे.या सर्व पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत बढत्यांमधील आरक्षण देण्यात येणार नाही, असा प्रस्ताव राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने तयार केला असून त्यावर मत मागविण्यासाठी विधी व न्याय विभागाकडे तो पाठविण्यात आला आहे.दरम्यान अनेक अधिकारी कर्मचाºयांच्या पदोन्नतीचे निघालेले आदेश मध्येच रोखण्यात आले आहेत. त्यामुळे निर्णय घेण्यापूर्वीच अनेकांना याचा फटका आताच बसलेला आहे. शासनाने हा निर्णय घेतलाच तर जवळपास एक लाख मागासवर्गीय अधिकारी-कर्मचाºयांना याचा फटका बसणार आहे. त्यामुळे मागासवर्गीय कर्मचारी संघटनांमध्ये असंतोष पसरलेला आहे.