शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नागपूर जिल्ह्यातील एक ग्रा. पं. हरवली, शोधणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 10:23 IST

नागपूर जिल्ह्यातील ३८१ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. निवडणूक ३८१ ग्रा.पं.साठी होत असली तरी जिल्ह्यात नेमक्या ग्रामपंचायती किती, यावरून सध्या संभ्रम आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात नेमक्या ग्रा.पं किती?निवडणुकीपूर्वीच प्रशासनाचा गोंधळ

जितेंद्र ढवळे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यातील ३८१ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. २६ सप्टेंबर रोजी ही निवडणूक होईल. निवडणूक ३८१ ग्रा.पं.साठी होत असली तरी जिल्ह्यात नेमक्या ग्रामपंचायती किती, यावरून सध्या संभ्रम आहे. त्यामुळे ग्रामपंचायती वास्तवात हरविल्या की कागदी घोडे नाचविताना कुणाच्या हाताने ही प्रशासकीय चूक झाली, हे सध्याच स्पष्ट झाले नाही.ग्रा.पं. निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने निवडणुकीची तयारी सुरू आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयाने एक पत्रक जारी केले आहे. यात नागपूर जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतींची संख्या ७६८ इतकी असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार काटोल तालुक्यात ८३, नरखेड (७०), सावनेर (७५), कळमेश्वर (५०), रामटेक (४८), पारशिवनी (५१), मौदा (६३), कामठी (४७), उमरेड (४७), भिवापूर (५६), कुही (५८), नागपूर ग्रामीण(६७) आणि हिंगणा तालुक्यात ५३ ग्रा.पं.असल्याचे नमूद आहे. इकडे निवडणूक अधिकारी नगर पंचायत, नागपूर कार्यालयाने जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पत्राची प्रत माध्यमांना पुरविली आहे. यात नागपूर जिल्ह्यात एकूण ७६९ ग्रा.पं.असल्याचे नमूद केले आहे.त्यानुसार काटोल तालुक्यात ८३, नरखेड (७०), सावनेर (७५), कळमेश्वर (५०), रामटेक (४८), पारशिवनी (५१), मौदा (६२), कामठी (४७), उमरेड (४७), भिवापूर (५६), कुही (५९), नागपूर ग्रामीण (६८) आणि हिंगणा तालुक्यात ५३ ग्रा.पं. असल्याचे नमूद केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जारी केलेल्या ग्रामपंचायतींच्या यादीत एका ग्रामपंचायतीचा फरक आहे. त्यामुळे जिल्ह्यात एक ग्रामपंचायत हरविली का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.इकडे जि.प.च्या संकेतस्थळावर जिल्ह्यात ७७० ग्रा.प.असल्याचे नमूद करण्यात आल्याने हा गोंधळ आणखी वाढला आहे.

मौदा, कुही, नागपूर ग्रामीणमध्ये घोळजि.प.च्या मुख्य कार्यकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जारी केलेल्या पत्रात ग्रामपंचायतीचा घोळ मौदा, कुही आणि नागपूर ग्रामीण तालुक्यात दिसून येतो. कदाचित हा घोळ तांत्रिक स्वरुपाचा असावा. मात्र डिजिटल नागपूर जिल्ह्यातील या घोळामुळे जिल्ह्यात एक ग्रामपंचायत कमी झाली की वाढली याबाबत संभ्रम आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक