शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

वनमंत्र्यांसाठी एकच दिवस धावली ‘वनबाला’

By admin | Updated: July 7, 2016 02:53 IST

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एका दिवसात सेमिनरी हिल्स बालोद्यानमधील ‘वनबाला’ सुरू करण्याचे आदेश दिले.

ट्रॅक खराब असल्याचे कारण दिले : चिमुकल्यांसह पर्यटक पालकांची निराशा नागपूर : राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एका दिवसात सेमिनरी हिल्स बालोद्यानमधील ‘वनबाला’ सुरू करण्याचे आदेश दिले. या आदेशाची तडकाफडकी अंमलबजावणी करीत वनविभागाने अनेक वर्षांपासून बंद असलेली वनबाला ही मिनी रेल्वेगाडी सुरू केली. लहान मुलांचे आकर्षण असलेली ही गाडी सुरू झाल्याचे वृत्त शहरातील सर्वच वर्तमानपत्रांनी प्रकाशित केले. यामुळे पर्यंटकांचा ओढा वाढला. परंतु दुसऱ्याच दिवशी ही ट्रेन पुन्हा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे चिमुकल्यांसह येथे येणारे पालक पर्यटक निराश होत आहेत. हा एकूणच प्रकार लक्षात घेता केवळ वनमंत्र्यांनी आदेश दिले म्हणून खानापूर्तीसाठी ही गाडी एक दिवस चालवण्यात आली का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सेमिनरी हिल्स येथील बालोद्यानाचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील ‘वनबाला’ ही ट्राय ट्रेन. मागील अनेक वर्षांपासून ही रेल्वेगाडी रुळावरच आलेली नाही. त्यामुळे येथे येणाऱ्या बच्चे कंपनीचा चांगलाच हिरमोड व्हायचा. याबाबत अनेक पक्षांनी व विविध संघटनांनी वारंवार निवेदने दिली. आंदोलने केली. त्यानंतर वन विभागाने पाऊल उचलित कामाला सुरुवात केली. वनबालालाही नवीन रूप देण्यात आले. रेल्वे गाडीचे ट्रायल सुद्धा घेण्यात आले. परंतु वनबाला सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे पुन्हा नागरिकांमध्ये असंतोष पसरत होता. मागील २० जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवन येथे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागाची आढावा बैठक बोलावली होती. बैठक संपल्यावर मुनगंटीवार जायला निघाले तेव्हा काँग्रेस पक्षाचे आनंद तिवारी, सुनील चोपडा, राम कडंबे, आसीफ अंसारी, रिजवान खान, रुमी, राजू क्षेत्री, युगल विधावत, धीरज पांडे, भागवत गायकवाड, रिजवान शेख आदी कार्यकर्त्यांनी मुनगंटीवार यांची भेट घेतली. त्यांना गुलाब पुष्प भेट देऊन वनबलाच्या परिस्थितीची जाणीव करून दिली. तेव्हा वनमंत्री मुनगंटीवार यांनी ही बाब अतिशय गांभीर्याने घेत वन विभागाच्या वरिष्ठ नेत्यांना ही वनबाला कुठल्याही परिस्थितीत दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू झालीच पाहिजे, अशी ताकीद दिली. खुद्द वनमंत्र्यांनी आदेश दिल्याने आता वनबाला सुरू होईल, असा विश्वास होता. झालेही तसेच. निवेदन देणाऱ्या संघटनेचे कार्यकर्ते आणि पर्यटक नागरिक मोठ्या संख्येने वनबालातून सैर करण्यासाठी हजर होते. गार्गी नावाच्या एका चिमुकलीच्या हस्ते वनबालाला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले, तेव्हा सेमिनरी हिल्सचे आकर्षण पुन्न्हा परतल्याचा प्रत्यय आला. शहरातील सर्वच वर्तमानपत्रांनी वनबाला सुरू झाल्याचे वृत्त प्रकर्षाने प्रकाशित केले. नागपूरकरांनाही याचा चांगलाच आनंद झाला. परिणामी सेमिनरी हिल्स आणि विशेषत: वनबालातून सैर करण्यासाठी बच्चे कंपनीसह पालकांनी गर्दी करायला सुरुवात केली. रेल्वे ट्रॅक खराबवनबालाच्या प्लॅटफॉर्मच्या तिकीट काऊंटरच्या दरवाजाच्या वर एक कागद चिकटविला आहे. त्यावर रेल्वे ट्रॅक खराबअसल्याने वनबाला बंद असल्याचे लिहून ठेवले आहे. रेल्वे ट्रॅक खराब होता तर मग त्यावरून वनमंत्र्यांनी सांगितल्यावर एक दिवसासाठी वनबाला चालवण्यात आलीच कशी. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही बाब वनमंत्र्यांच्या निदर्शनास का आणून दिली नाही. गडी चालवून लहान मुलांच्या जीवाशी का खेळले गेला असा प्रश्न सुद्धा उपस्थित झाला आहे.