शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
4
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
5
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
6
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
7
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
8
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
9
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
10
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
11
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
12
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
13
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
14
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
15
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
16
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
17
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
18
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
19
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
20
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या

ओलसावली म्हणजे स्त्री-पुरुष नात्याचे भावबंध

By admin | Updated: August 3, 2014 00:56 IST

आपल्या देशात सर्वच क्षेत्रात प्रचंड वेगाने स्थित्यंतरे घडत आहेत. परंतु एक गोष्ट मात्र आजही बदललेली दिसत नाही ती म्हणजे स्त्री-पुरुष नात्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन.

पुस्तक प्रकाशन समारंभात लेखिका नीरजा यांचे प्रतिपादननागपूर : आपल्या देशात सर्वच क्षेत्रात प्रचंड वेगाने स्थित्यंतरे घडत आहेत. परंतु एक गोष्ट मात्र आजही बदललेली दिसत नाही ती म्हणजे स्त्री-पुरुष नात्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन. परंतु प्रेयसी वा पत्नीशिवायही एका पुरुषाचा एका महिलेशी संबंध असू शकतो. त्या संबंधालाच आम्ही मैत्री म्हणतो. स्त्री-पुरुष मैत्रीचे हेच विविध पदर ज्येष्ठ पत्रकार शैलेश पांडे यांच्या ओलसावली या ललितबंधात आले आहेत. लेखकाने स्त्री-पुरुष नात्यातील तरल भावबंध अतिशय हळव्या शब्दात या पुस्तकात मांडले आहेत. म्हणूनच या पुस्तकातील प्रत्येक ओळ, ओळीतला प्रत्येक शब्द थेट वाचकांच्या मनाला भिडतो, असे प्रतिपादन प्रसिद्धी कवयित्री व लेखिका नीरजा यांनी केले. जागतिक मैत्रीदिनाच्या पूर्वसंध्येला विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात आधार व विदर्भ गौरव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ओलसावली पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वि. सा. संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर तर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध कवी संदीप खरे, गुरू ठाकूर, प्रशांत असनारे, ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी उपस्थित होते. नीरजा पुढे म्हणाल्या, ओलसावली हा ललितबंध लेखकाने अनुभवलेल्या दुभंग आणि सुगंधात विभागलेला आहे. जीवनात भेटणाऱ्या सखीला वाहिलेले हे पुस्तक आहे. कुठलेही ललित लिहिणे हे सोपे काम नाही. इतर कुठल्याही लिखाणापेक्षा थकवून टाकणारे हे काम असते. कारण, लेखनातील अस्सलता ललितबंधात व्यक्त होत असते, याकडेही नीरजा यांनी लक्ष वेधले. शुक्रवारी मनोहर म्हैसाळकर यांचा ८१ वा वाढदिवस झाला. या निमित्ताने या प्रकाशन समारंभात त्यांना विशेष शुभेच्छा देण्यात आल्या. संचालन शुभदा फडणवीस यांनी केले.(प्रतिनिधी)