शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

जुन्या गाण्यांचा काळ लवकरच येणार

By admin | Updated: October 4, 2015 03:24 IST

आजच्या गाण्यांमध्ये संगीत कमी आणि गोंगाटच अधिक असतो. त्यात जुन्या गाण्यांप्रमाणे कुठेही रस दिसून येत नाही. त्यामुळे लवकरच पुन्हा जुनी गाणी व संगीताचा काळ येईल, ..

आजच्या गाण्यात गोंगाटच अधिक : संगीतकार रवींद्र जैन यांचा विश्वास नागपूर : आजच्या गाण्यांमध्ये संगीत कमी आणि गोंगाटच अधिक असतो. त्यात जुन्या गाण्यांप्रमाणे कुठेही रस दिसून येत नाही. त्यामुळे लवकरच पुन्हा जुनी गाणी व संगीताचा काळ येईल, असा विश्वास प्रख्यात संगीतकार डॉ. रवींद्र जैन यांनी शनिवारी व्यक्त केला. बादल आर्टस् व स्वरमधूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी देशपांडे सभागृहात आयोजित ‘अखियों के झरोको से...’ या कार्यक्रमासाठी ते नागपुरात आले असता ‘लोकमत’शी बोलत होते. डॉ. जैन पुढे म्हणाले, आजचे तरुण कलाकार एका रात्रीतून स्टार बनण्याचे स्वप्न पाहात आहेत. परंतु ते योग्य नाही. त्यांनी धैर्य राखले पाहिजे. शॉर्टकटचा मार्ग कधीही धोक्याचा असतो. त्यामुळे तरुणांनी अगोदर संगीतात पारंगत झाले पाहिजे. त्यासाठी चांगल्या गुरू कडे शिक्षा घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. सध्या ते ‘तानसेन’ हा चित्रपट तयार करीत असून, या चित्रपटातील संगीत व दिग्दर्शन त्यांचे राहणार आहे. रवींद्र जैन यांचे वडील पंडित इंद्रमणी जैन संस्कृतमधील विद्वान व आयुर्वेदाचार्य होते. नागपूरविषयी बोलताना, या शहराशी आपला फारच घनिष्ठ संबंध राहिला असल्याचे त्यांनी सांगितले. येथील महालेखाकार कार्यालयात त्यांचे मोठे बंधू डी.के. जैन नोकरीला होते, असेही ते म्हणाले. डॉ. रवींद्र जैन यांना पद्मश्री व फिल्मफेअर सारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. उद्या देशपांडे सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात रवींद्र जैन यांनी संगीत दिलेल्या लोकप्रिय गीतांसह संगीताशी निगडीत त्यांच्या जीवनातील रहस्यांचे पैलू उलगडले जाणार आहेत. या कार्यक्रमात गायक राजेश दुरुगकर, राजू व्यास, श्रद्धा जोशी, आकांक्षा नगरकर, रिजवान साबरी, अरुण बोडे व संजय इंगळे विविध लोकप्रिय गाणे सादर करतील. (प्रतिनिधी)