शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

ओखी चक्रीवादळग्रस्त शेतकरी व मच्छीमारांना मदत; चंद्रकांत पाटील यांची विधान परिषदेत घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 19:51 IST

राज्यात ४ ते ६ डिसेंबर २०१७ या कालावधीत ओखी चक्रीवादळामुळे आलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकरी व मच्छीमारांना मदत देण्याची घोषणा मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.

ठळक मुद्देपंचनाम्यांच्या तक्रारी तात्काळ निकाली काढणार

आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्यात ४ ते ६ डिसेंबर २०१७ या कालावधीत ओखी चक्रीवादळामुळे आलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकरी व मच्छीमारांना मदत देण्याची घोषणा मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.सदस्य सुनील तटकरे यांनी उपस्थित केलेल्या नियम ९७ वरील चर्चेला उत्तर देताना पाटील म्हणाले की, ओखी वादळामुळे कोकणातील कडधान्ये, भाजीपाला, आंबा, काजू पिकासह नाशिक जिल्ह्यातील द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. कडधान्य पिकाचे सुमारे ३०० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. तसेच रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मच्छीमारांच्या बोटी आणि मच्छीमारी जाळ्यांचे नुकसान झाले आहे. घरांचेही नुकसान झाले आहे. या सर्व बाबींचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. पंचनाम्यांबाबत कोठे काही तक्रारी असल्यास संबंधित जिल्हाधिकारी व प्रांताधिकाºयांना कडक सूचना दिल्या जातील असेही ते म्हणाले.ओखी वादळामुळे अंशत: नुकसान झालेल्या बोटींच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी ४,१०० रुपये, नष्ट झालेल्या बोटींसाठी ९,६०० रुपये, अंशत: नुकसान झालेल्या मासेमारी जाळ्यांसाठी २,१०० रुपये तर पूर्ण नष्ट झालेल्या जाळ्यांसाठी २,६०० रुपयांची मदत दिली जाणार आहे. नुकसानग्रस्त कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी ६,८०० रुपये, बागायती पिकांसाठी प्रतिहेक्टरी १३,५०० तर फळपिकांसाठी प्रतिहेक्टरी १८ हजारांची मदत देण्याची घोषणा पाटील यांनी केली. घोषित केलेली नुकसानभरपाईची मदत केंद्र शासनाकडून राष्ट्रीय आपत्ती मदत निधीतून (एनडीआरएफ) निधी येईपर्यंत वाट न पाहता राज्य शासनाच्या निधीतून ही मदत तात्काळ देण्यात येणार आहे.वादळापूर्वी समुद्र किनाऱ्यावर धोक्याचा इशारा देण्यात आला होता. तरीही समुद्रात गेलेल्या सर्व २,६०६ बोटींना संदेशयंत्रणा राबवून समुद्रकिनाऱ्यावर आणण्यात आले. केरळ, तामिळनाडू, गोवा तसेच कर्नाटक राज्यातील ३८९ बोटी भरकटून आपल्या समुद्रकिनाऱ्यावर आल्या होत्या. त्यावरील २,८८५ खलाशांची निवासाची, बोटींना डिझेल देण्याची व्यवस्था राज्य शासनाने केल्याची माहिती पाटील यांनी दिली. सुनील तटकरे यांनी नुकसानग्रस्तांना सरसकट मदतीची मागणी केली. चर्चेत भाई गिरकर, जयंत पाटील,हुस्नबानू खलिफे यांनी सहभाग घेतला.

 

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७chandrakant patilचंद्रकांत पाटील