शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

ओखी चक्रीवादळग्रस्त शेतकरी व मच्छीमारांना मदत; चंद्रकांत पाटील यांची विधान परिषदेत घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 19:51 IST

राज्यात ४ ते ६ डिसेंबर २०१७ या कालावधीत ओखी चक्रीवादळामुळे आलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकरी व मच्छीमारांना मदत देण्याची घोषणा मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.

ठळक मुद्देपंचनाम्यांच्या तक्रारी तात्काळ निकाली काढणार

आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्यात ४ ते ६ डिसेंबर २०१७ या कालावधीत ओखी चक्रीवादळामुळे आलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकरी व मच्छीमारांना मदत देण्याची घोषणा मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.सदस्य सुनील तटकरे यांनी उपस्थित केलेल्या नियम ९७ वरील चर्चेला उत्तर देताना पाटील म्हणाले की, ओखी वादळामुळे कोकणातील कडधान्ये, भाजीपाला, आंबा, काजू पिकासह नाशिक जिल्ह्यातील द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. कडधान्य पिकाचे सुमारे ३०० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. तसेच रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मच्छीमारांच्या बोटी आणि मच्छीमारी जाळ्यांचे नुकसान झाले आहे. घरांचेही नुकसान झाले आहे. या सर्व बाबींचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. पंचनाम्यांबाबत कोठे काही तक्रारी असल्यास संबंधित जिल्हाधिकारी व प्रांताधिकाºयांना कडक सूचना दिल्या जातील असेही ते म्हणाले.ओखी वादळामुळे अंशत: नुकसान झालेल्या बोटींच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी ४,१०० रुपये, नष्ट झालेल्या बोटींसाठी ९,६०० रुपये, अंशत: नुकसान झालेल्या मासेमारी जाळ्यांसाठी २,१०० रुपये तर पूर्ण नष्ट झालेल्या जाळ्यांसाठी २,६०० रुपयांची मदत दिली जाणार आहे. नुकसानग्रस्त कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी ६,८०० रुपये, बागायती पिकांसाठी प्रतिहेक्टरी १३,५०० तर फळपिकांसाठी प्रतिहेक्टरी १८ हजारांची मदत देण्याची घोषणा पाटील यांनी केली. घोषित केलेली नुकसानभरपाईची मदत केंद्र शासनाकडून राष्ट्रीय आपत्ती मदत निधीतून (एनडीआरएफ) निधी येईपर्यंत वाट न पाहता राज्य शासनाच्या निधीतून ही मदत तात्काळ देण्यात येणार आहे.वादळापूर्वी समुद्र किनाऱ्यावर धोक्याचा इशारा देण्यात आला होता. तरीही समुद्रात गेलेल्या सर्व २,६०६ बोटींना संदेशयंत्रणा राबवून समुद्रकिनाऱ्यावर आणण्यात आले. केरळ, तामिळनाडू, गोवा तसेच कर्नाटक राज्यातील ३८९ बोटी भरकटून आपल्या समुद्रकिनाऱ्यावर आल्या होत्या. त्यावरील २,८८५ खलाशांची निवासाची, बोटींना डिझेल देण्याची व्यवस्था राज्य शासनाने केल्याची माहिती पाटील यांनी दिली. सुनील तटकरे यांनी नुकसानग्रस्तांना सरसकट मदतीची मागणी केली. चर्चेत भाई गिरकर, जयंत पाटील,हुस्नबानू खलिफे यांनी सहभाग घेतला.

 

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७chandrakant patilचंद्रकांत पाटील