शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

ओखी चक्रीवादळग्रस्त शेतकरी व मच्छीमारांना मदत; चंद्रकांत पाटील यांची विधान परिषदेत घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 19:51 IST

राज्यात ४ ते ६ डिसेंबर २०१७ या कालावधीत ओखी चक्रीवादळामुळे आलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकरी व मच्छीमारांना मदत देण्याची घोषणा मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.

ठळक मुद्देपंचनाम्यांच्या तक्रारी तात्काळ निकाली काढणार

आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्यात ४ ते ६ डिसेंबर २०१७ या कालावधीत ओखी चक्रीवादळामुळे आलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकरी व मच्छीमारांना मदत देण्याची घोषणा मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.सदस्य सुनील तटकरे यांनी उपस्थित केलेल्या नियम ९७ वरील चर्चेला उत्तर देताना पाटील म्हणाले की, ओखी वादळामुळे कोकणातील कडधान्ये, भाजीपाला, आंबा, काजू पिकासह नाशिक जिल्ह्यातील द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. कडधान्य पिकाचे सुमारे ३०० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. तसेच रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मच्छीमारांच्या बोटी आणि मच्छीमारी जाळ्यांचे नुकसान झाले आहे. घरांचेही नुकसान झाले आहे. या सर्व बाबींचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. पंचनाम्यांबाबत कोठे काही तक्रारी असल्यास संबंधित जिल्हाधिकारी व प्रांताधिकाºयांना कडक सूचना दिल्या जातील असेही ते म्हणाले.ओखी वादळामुळे अंशत: नुकसान झालेल्या बोटींच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी ४,१०० रुपये, नष्ट झालेल्या बोटींसाठी ९,६०० रुपये, अंशत: नुकसान झालेल्या मासेमारी जाळ्यांसाठी २,१०० रुपये तर पूर्ण नष्ट झालेल्या जाळ्यांसाठी २,६०० रुपयांची मदत दिली जाणार आहे. नुकसानग्रस्त कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी ६,८०० रुपये, बागायती पिकांसाठी प्रतिहेक्टरी १३,५०० तर फळपिकांसाठी प्रतिहेक्टरी १८ हजारांची मदत देण्याची घोषणा पाटील यांनी केली. घोषित केलेली नुकसानभरपाईची मदत केंद्र शासनाकडून राष्ट्रीय आपत्ती मदत निधीतून (एनडीआरएफ) निधी येईपर्यंत वाट न पाहता राज्य शासनाच्या निधीतून ही मदत तात्काळ देण्यात येणार आहे.वादळापूर्वी समुद्र किनाऱ्यावर धोक्याचा इशारा देण्यात आला होता. तरीही समुद्रात गेलेल्या सर्व २,६०६ बोटींना संदेशयंत्रणा राबवून समुद्रकिनाऱ्यावर आणण्यात आले. केरळ, तामिळनाडू, गोवा तसेच कर्नाटक राज्यातील ३८९ बोटी भरकटून आपल्या समुद्रकिनाऱ्यावर आल्या होत्या. त्यावरील २,८८५ खलाशांची निवासाची, बोटींना डिझेल देण्याची व्यवस्था राज्य शासनाने केल्याची माहिती पाटील यांनी दिली. सुनील तटकरे यांनी नुकसानग्रस्तांना सरसकट मदतीची मागणी केली. चर्चेत भाई गिरकर, जयंत पाटील,हुस्नबानू खलिफे यांनी सहभाग घेतला.

 

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७chandrakant patilचंद्रकांत पाटील