शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

तेल स्वस्त - डाळी महागल्या

By admin | Updated: September 17, 2014 00:56 IST

जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत घट होईल, असा अंदाज बांधून असणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या पदरात अद्याप काहीही पडले नाही. खाद्य तेल व गहू वगळता इतर वस्तूंमधून दरवाढीचे चक्र कायमच आहे.

सुकामेव्यात भाववाढ : मसाले स्थिरनागपूर : जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत घट होईल, असा अंदाज बांधून असणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या पदरात अद्याप काहीही पडले नाही. खाद्य तेल व गहू वगळता इतर वस्तूंमधून दरवाढीचे चक्र कायमच आहे. त्याचा सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत आहे. सध्या पावसामुळे भाज्यांच्या किमतीत वाढ झालेली दिसत आहे. काही महिन्यांपासून कांदे आणि बटाट्याचे भाव स्थिर आहेत. कळमना धान्य बाजाराचे विश्लेषक आणि व्यावसायिक रमेश उमाटे यांनी सांगितले की, महिन्याभरात गहू वगळता सर्व प्रकारच्या तांदळाचे भाव १०० ते २५० रुपयांपर्यंत तर तूर डाळीच्या किमती एक हजाराने वधारल्या आहेत. याशिवाय मसूर डाळीत क्विंटलमागे ६०० रुपयांची तेजी आली आहे. अनियमित पावसामुळे भाववाढ झाली असून पुढे भाव स्थिर राहतील, असा अंदाज आहे. पितृपक्षामुळे इतवारी ठोक बाजारातच नव्हे तर शहरात सर्वत्र मंदीचे वातावरण आहे. नवरात्रात उत्साह संचारेल, अशी अपेक्षा आहे. सध्या इतवारी ठोक बाजारात लोकवन गहू १८०० ते २१०० रुपये क्विंटल, शरबती २४०० ते ३०००, तुकडी २००० ते २३००, सुवर्णा तांदूळ २४०० ते २६५०, बीपीटी २८५० ते ३५५०, एचएमटी ४१००-४४००, श्रीराम ४९००-५५००, चिन्नोर ५२००-५६००, तूर डाळ दर्जानुसार ६५०० ते ७५५०, चना डाळ ३५००-४२५०, मूंग मोगर ९००० ते ९५००, मूंग डाळ ७८०० ते ८५००, मसूर डाळ ६५०० ते ७०००, उडद मोगर ८२०० ते ९५००, हिरवा मटर ४२०० ते ६०००, काबुली चना ५५०० ते ७००० रुपये भाव आहेत. दिवाळीपर्यंत भाववाढीची शक्यता नाही, असे रमेश उमाटे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)सोयाबीन तेल सहा रुपयांनी स्वस्त!सध्या खाद्य तेलात ‘अच्छे दिन’ आहेत. विदर्भात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या सोयाबीन तेलात महिन्याभरात प्रति किलो सहा रुपयांची घसरण झाली असून किरकोळमध्ये प्रतिकिलो भाव ७० रुपये आहेत. एका वर्षाआधी ८० रुपयांवर होते. आॅगस्टमध्ये ११३० रुपयांवर गेलेले १५ किलोचे भाव (प्रति टिन) सध्या १०४० ते १०६० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. वर्षाआधी १२५ रुपये किलोवर पोहोचलेले फल्ली तेल सध्या ९० रुपयांपर्यंत खाली आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून फल्ली तेलाचे भाव स्थिर आहेत. खाद्य तेलाच्या विक्रीच्या आकडेवारीनुसार विदर्भात ७० टक्के सोयाबीन तेलाची विक्री होते. उर्वरित तेलाची विक्री ३० टक्के आहे. यात फल्ली, जवस, पामोलिन, सरसो, खोबरेल, एरंडी, सनफ्लॉवर या खाद्य तेलांचा समावेश आहे. ठोक बाजारात एक महिन्यात सर्वच खाद्य तेलात १५ किलोमागे ६० ते ७० रुपयांची घसरण झाली. पामोलिन तेल प्रतिकिलो ६० रुपये, वनस्पती घी ६७, सरसो तेल ७२, कॉटन तेल ६६, राईस ब्रॅण्ड ७०, खोबरेल १९० तर सनफ्लॉवर ७५ रुपये आहे. तेल व्यापारी अनिलकुमार अग्रवाल यांनी सांगितले की, सध्या खाद्यतेल सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहे. जवळपास ४० लाख लोकसंख्येच्या नागपूर जिल्ह्यात दररोज ५ हजार डब्बे (१५ किलो) विकले जातात. नागपुरात पॅकिंग करणारे १५ व्यापारी आहेत. दिवाळीपर्यंत भाववाढीची अपेक्षा नाही.बदाम व आक्रोडची भाववाढ, मसाले स्थिरइतवारी ठोक बाजारात मसाल्याचे भाव स्थिर असून मागणीअभावी बादाम वगळता सुका मेव्यात मंदी आहे. मागणीचा अभाव आणि एलबीटीच्या त्रासामुळे कोणताही व्यापारी बाहेरून माल बोलविण्याच्या स्थितीत नाही. इतवारी ठोक बाजारात बादामाचे भाव १०० रुपयांनी वाढून ७१० रुपयांवर गेले आहेत. अंजीर ४५० ते ५०० रुपये किलो, पिवळी खारक ७५ ते ८०, दर्जानुसार काळी खारक १०० ते ३००, किसमिस २८० ते ३८०, काजू ५८० रुपये, पिश्ता दर्जानुसार ७०० ते १५०० रुपये किलो भाव आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये पुरामुळे आक्रोडचे पीक पूर्णत: खराब झाले आहे. केवळ पाच दिवसांत किलोमागे २०० रुपयांची वाढ होऊन दर्जानुसार भाव ८०० ते १००० आणि १४०० ते १६०० रुपयांवर पोहोचल्याची माहिती बाजार विश्लेषक चंदन गोस्वामी यांनी दिली.मसाल्यात मंदीदरदिवशी वाढणारे मसाल्याचे भाव गेल्या महिन्याभरापासून स्थिर वा कमी झाले आहेत. लवंग ८४ रुपये किलोवरून ८८ रुपये, शहाजिरे ५४० वरून ४६०, जिरे मध्यम १२४ वरून ११८, धणे (मध्यम) १२६ वरून ११८, हिरवे धणे १८०, हिरवी विलायची ११५० वरून १०८०, मेथी दाणे ६६, खाकस ३३० ते ४८०, खोबरेल डोल २२० वरून १९० आणि काळीमिर्चचे भाव ८०० रुपयांवरून ७२५ रुपयांपर्यंत खाली आल्याचे गोस्वामी यांनी स्पष्ट केले.