शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

तेल स्वस्त - डाळी महागल्या

By admin | Updated: September 17, 2014 00:56 IST

जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत घट होईल, असा अंदाज बांधून असणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या पदरात अद्याप काहीही पडले नाही. खाद्य तेल व गहू वगळता इतर वस्तूंमधून दरवाढीचे चक्र कायमच आहे.

सुकामेव्यात भाववाढ : मसाले स्थिरनागपूर : जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत घट होईल, असा अंदाज बांधून असणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या पदरात अद्याप काहीही पडले नाही. खाद्य तेल व गहू वगळता इतर वस्तूंमधून दरवाढीचे चक्र कायमच आहे. त्याचा सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत आहे. सध्या पावसामुळे भाज्यांच्या किमतीत वाढ झालेली दिसत आहे. काही महिन्यांपासून कांदे आणि बटाट्याचे भाव स्थिर आहेत. कळमना धान्य बाजाराचे विश्लेषक आणि व्यावसायिक रमेश उमाटे यांनी सांगितले की, महिन्याभरात गहू वगळता सर्व प्रकारच्या तांदळाचे भाव १०० ते २५० रुपयांपर्यंत तर तूर डाळीच्या किमती एक हजाराने वधारल्या आहेत. याशिवाय मसूर डाळीत क्विंटलमागे ६०० रुपयांची तेजी आली आहे. अनियमित पावसामुळे भाववाढ झाली असून पुढे भाव स्थिर राहतील, असा अंदाज आहे. पितृपक्षामुळे इतवारी ठोक बाजारातच नव्हे तर शहरात सर्वत्र मंदीचे वातावरण आहे. नवरात्रात उत्साह संचारेल, अशी अपेक्षा आहे. सध्या इतवारी ठोक बाजारात लोकवन गहू १८०० ते २१०० रुपये क्विंटल, शरबती २४०० ते ३०००, तुकडी २००० ते २३००, सुवर्णा तांदूळ २४०० ते २६५०, बीपीटी २८५० ते ३५५०, एचएमटी ४१००-४४००, श्रीराम ४९००-५५००, चिन्नोर ५२००-५६००, तूर डाळ दर्जानुसार ६५०० ते ७५५०, चना डाळ ३५००-४२५०, मूंग मोगर ९००० ते ९५००, मूंग डाळ ७८०० ते ८५००, मसूर डाळ ६५०० ते ७०००, उडद मोगर ८२०० ते ९५००, हिरवा मटर ४२०० ते ६०००, काबुली चना ५५०० ते ७००० रुपये भाव आहेत. दिवाळीपर्यंत भाववाढीची शक्यता नाही, असे रमेश उमाटे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)सोयाबीन तेल सहा रुपयांनी स्वस्त!सध्या खाद्य तेलात ‘अच्छे दिन’ आहेत. विदर्भात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या सोयाबीन तेलात महिन्याभरात प्रति किलो सहा रुपयांची घसरण झाली असून किरकोळमध्ये प्रतिकिलो भाव ७० रुपये आहेत. एका वर्षाआधी ८० रुपयांवर होते. आॅगस्टमध्ये ११३० रुपयांवर गेलेले १५ किलोचे भाव (प्रति टिन) सध्या १०४० ते १०६० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. वर्षाआधी १२५ रुपये किलोवर पोहोचलेले फल्ली तेल सध्या ९० रुपयांपर्यंत खाली आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून फल्ली तेलाचे भाव स्थिर आहेत. खाद्य तेलाच्या विक्रीच्या आकडेवारीनुसार विदर्भात ७० टक्के सोयाबीन तेलाची विक्री होते. उर्वरित तेलाची विक्री ३० टक्के आहे. यात फल्ली, जवस, पामोलिन, सरसो, खोबरेल, एरंडी, सनफ्लॉवर या खाद्य तेलांचा समावेश आहे. ठोक बाजारात एक महिन्यात सर्वच खाद्य तेलात १५ किलोमागे ६० ते ७० रुपयांची घसरण झाली. पामोलिन तेल प्रतिकिलो ६० रुपये, वनस्पती घी ६७, सरसो तेल ७२, कॉटन तेल ६६, राईस ब्रॅण्ड ७०, खोबरेल १९० तर सनफ्लॉवर ७५ रुपये आहे. तेल व्यापारी अनिलकुमार अग्रवाल यांनी सांगितले की, सध्या खाद्यतेल सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहे. जवळपास ४० लाख लोकसंख्येच्या नागपूर जिल्ह्यात दररोज ५ हजार डब्बे (१५ किलो) विकले जातात. नागपुरात पॅकिंग करणारे १५ व्यापारी आहेत. दिवाळीपर्यंत भाववाढीची अपेक्षा नाही.बदाम व आक्रोडची भाववाढ, मसाले स्थिरइतवारी ठोक बाजारात मसाल्याचे भाव स्थिर असून मागणीअभावी बादाम वगळता सुका मेव्यात मंदी आहे. मागणीचा अभाव आणि एलबीटीच्या त्रासामुळे कोणताही व्यापारी बाहेरून माल बोलविण्याच्या स्थितीत नाही. इतवारी ठोक बाजारात बादामाचे भाव १०० रुपयांनी वाढून ७१० रुपयांवर गेले आहेत. अंजीर ४५० ते ५०० रुपये किलो, पिवळी खारक ७५ ते ८०, दर्जानुसार काळी खारक १०० ते ३००, किसमिस २८० ते ३८०, काजू ५८० रुपये, पिश्ता दर्जानुसार ७०० ते १५०० रुपये किलो भाव आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये पुरामुळे आक्रोडचे पीक पूर्णत: खराब झाले आहे. केवळ पाच दिवसांत किलोमागे २०० रुपयांची वाढ होऊन दर्जानुसार भाव ८०० ते १००० आणि १४०० ते १६०० रुपयांवर पोहोचल्याची माहिती बाजार विश्लेषक चंदन गोस्वामी यांनी दिली.मसाल्यात मंदीदरदिवशी वाढणारे मसाल्याचे भाव गेल्या महिन्याभरापासून स्थिर वा कमी झाले आहेत. लवंग ८४ रुपये किलोवरून ८८ रुपये, शहाजिरे ५४० वरून ४६०, जिरे मध्यम १२४ वरून ११८, धणे (मध्यम) १२६ वरून ११८, हिरवे धणे १८०, हिरवी विलायची ११५० वरून १०८०, मेथी दाणे ६६, खाकस ३३० ते ४८०, खोबरेल डोल २२० वरून १९० आणि काळीमिर्चचे भाव ८०० रुपयांवरून ७२५ रुपयांपर्यंत खाली आल्याचे गोस्वामी यांनी स्पष्ट केले.