शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

अधिकारी कामे करत नसल्याची खंत

By admin | Updated: April 24, 2016 03:08 IST

माझ्याकडे जबाबदारी असलेल्या मंत्रालयांकडे मुबलक निधी उपलब्ध आहे. परंतु अधिकारी हव्या त्या गतीने कामच करत नाहीत ही दुर्दैवी बाब आहे.

नितीन गडकरी : राज्यात लवकरच ‘ई-रिक्षा’ला मान्यता मिळणारनागपूर : माझ्याकडे जबाबदारी असलेल्या मंत्रालयांकडे मुबलक निधी उपलब्ध आहे. परंतु अधिकारी हव्या त्या गतीने कामच करत नाहीत ही दुर्दैवी बाब आहे. विकास होण्यासाठी इच्छाशक्तीची आवश्यकता असते व त्यासाठी संपूर्ण प्रणालीलाच गती देण्याची आवश्यकता आहे. अधिकाऱ्यांनी कामे करण्यावर भर द्यावा, या शब्दांत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. नागपुरातील टिळक पत्रकार भवनात त्यांची पत्रपरिषद झाली. यावेळी त्यांनी विविध विकास कामांबाबत माहिती दिली.देशातील काही राज्यांनी ‘ई-रिक्षा’ला मान्यता दिली असून महाराष्ट्रात मात्र याबाबतच्या कायद्याला संमती मिळालेली नाही. याद्वारे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. यासंदर्भात लवकरच आदेश निघेल, असे आश्वासन रावते यांनी दिल्याचे गडकरी यांनी सांगितले. महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांची लांबी ५,५६० किलोमीटर इतकी होती. केंद्रातील सत्ताबदलानंतर आतापर्यंत महाराष्ट्रात १५,८९९ किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामास मंजुरी मिळाली आहे, अशी माहितीदेखील त्यांनी दिली. (प्रतिनिधी)रस्ते अपघात कमी करणारदेशात मोठ्या प्रमाणावर होणारे रस्ते अपघात ही चिंतेची बाब आहे. देशात दरवर्षी दीड लाखांहून अधिक नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो ही बाब मनाला चटका लावून जाते. रस्ते अपघातांची संख्या कमी व्हावी यासंदर्भात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी रस्ते अपघातांच्या जागांची नोंद करण्यात येत असून तेथील रस्त्यांची डागडुजी, वळणांचा धोका कमी करणे इत्यादी उपाययोजना करण्यात येतील. राष्ट्रीय महामार्गांवरील अपघाताची स्थळे शोधण्यात आली आहेत. रस्ते अपघातांची संख्या ५० टक्क्यांहून तरी कमी व्हावी, असा आमचा मानस आहे, असे त्यांनी सांगितले.‘एआयबीपी’मुळे राज्यातील सिंचनक्षमता वाढणारकेंद्र सरकारने राष्ट्रीय सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ‘एआयबीपी’अंतर्गत (इमिजिएट इरिगेशन बेनिफिट प्रोजेक्ट) ८० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ‘एआयबीपी’अंतर्गत राज्यातील २८ प्रकल्पांचा समावेश असून विदर्भातील गोसेखुर्ददेखील यातील एक प्रकल्प आहे. या २८ प्रकल्पांच्या माध्यमांतून महाराष्ट्रातील २५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. याबाबत महाराष्ट्र शासन व केंद्रीय जलसंपदा मंत्र्यांची पुढील आठवड्यात मुंबईमध्ये बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली.‘सागरमाला’ंमुळे घटणार मालवाहतुकीचा खर्चदेशांतर्गत मालवाहतुकीचा खर्च जास्त असून जलवाहतुकीच्या माध्यमातून याला कमी केले जाऊ शकते. सागरमाला कार्यक्रमांतर्गत मालवाहतुकीचा खर्च कमी करण्यासाठी बहुआयामी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यात येईल. सागरमाला कार्यक्रमांतर्गत देशात २८ महाप्रकल्प उभारण्यात येत असून यामाध्यमातून पायाभूत संरचना, उद्योग व बंदरे इत्यादी क्षेत्रांत ९५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे, असेदेखील गडकरी यांनी सांगितले. वर्ध्यातील ‘ड्रायपोर्ट’चे पुढील महिन्यात उद्घाटन होणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.वेगळ्या विदर्भावर मौनवेगळ्या विदर्भावरून राज्यातील राजकारण तापले आहे. वेगळ्या विदर्भासंबंधातील केंद्राचे धोरण काय आहे याबाबत गडकरी यांना विचारणा करण्यात आली असता या मुद्यावर अगोदर अनेकदा उत्तर दिले आहे, असे म्हणून त्यांनी ठोस उत्तर देण्याचे टाळले.