शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी म्हणतात, प्रत्येक मित्र असतो जिवलग

By admin | Updated: August 2, 2015 03:13 IST

व्यक्तीच्या जीवनात आईवडील आणि कुटुंब महत्त्वाचे आहे, असे समजले जाते. परंतु मानवाच्या नात्यात एक असे नाते आहे जे खास असते.

आशिष दुबे  नागपूरव्यक्तीच्या जीवनात आईवडील आणि कुटुंब महत्त्वाचे आहे, असे समजले जाते. परंतु मानवाच्या नात्यात एक असे नाते आहे जे खास असते. ते अनेक नात्यांपेक्षा मजबूत आणि विश्वासाचे असते. ते नाते आहे मैत्रीचे. याच कारणामुळे मैत्रीचा पाया भक्कम समजण्यात येतो.जेव्हा भेटतो तेव्हा मनापासून भेटतोआजकाल मदर्स डे, फादर्स डे, व्हॅलेंटाईन डे साजरे होतात. माझा या दिवसांवर विश्वास नाही. कारण हे दिवस जेथे नाते संपुष्टात येत आहेत, तेथे साजरे करण्यात येतात. प्रत्येक दिवशी त्यांना आठवणे महत्त्वाचे आहे. मी याचे पालन करतो. माझ्या मित्रांची संख्या खूप मोठी आहे. यात प्राथमिक, माध्यमिक, कॉलेज, उच्च शिक्षण, शासकीय सेवेत आल्यानंतर प्रशिक्षण अकादमीतील मित्रांचा समावेश आहे. या सर्व मित्रात सुब्रत गुप्ता मला सर्वात जवळचे आहेत. ते आमच्या बॅचचे अखिल भारतीय स्तरावरील ४ थे टॉपर होते. आम्ही सोबतच प्रशिक्षण घेतले. सेवेत आल्यानंतरही आमची मैत्री कायम आहे. आम्ही अनेक वर्षानंतर भेटतो तरीसुद्धा आमच्या मैत्रीतील ओलावा कायम आहे. आमच्यात व्हॉट्स अप सारखी मैत्री नाही. व्यक्तीच्या जीवनात मैत्री हे खास नाते असते. हे नाते कठीण प्रसंगी भक्कमपणे पाठीशी उभे राहते. सुब्रत आणि माझे अनेक मित्र आजही काही समस्या असल्यास एकमेकांना मदत करतात. - अनुप कुमार, विभागीय आयुक्तमित्रांमुळेच या पदावर आहोमाझ्या जीवनात मित्रांचे महत्त्व खूप आहे. मी आज ज्या पदावर आहो त्यात आईवडिलांसह माझ्या मित्रांचे महत्त्वाचे योगदान आहे. माझे मित्र नसते तर मी आज या पदावर राहिलो नसतो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात एक असे नाते असते जे अनेक नात्यांपासून वेगळे आणि महत्त्वाचे असते. कारण जीवनात अनेक बाबी आपण कुटुंबीयांसोबत शेअर करू शकत नाही त्या बाबी फक्त मित्रांसोबत बोलल्या जाऊ शकतात. मित्रच आपल्या समस्येला त्यांची समस्या समजतात. त्या सोबतच ती समस्या दूर करण्यासाठी खांद्याला खांदा लावून आपली साथ देतात. समस्यांचे समाधान करतात. तुम्ही त्यांचा सल्ला ऐकला, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकल्यास तुमच्या सगळ्या समस्या दूर होतात. माझ्या जीवनातही अनेक मित्र आले. आजही ते माझे मित्र आहेत. कोण्या एका मित्राचे नाव घेणे सर्वांसोबत अन्याय करणारे ठरेल. कारण माझ्या जीवनात प्रत्येक मित्राचे योगदान आहे. शाळेपासून आजपर्यंत माझ्या मित्रांनी माझी साथ देताना त्यांचा काय फायदा होईल हा विचार केला नाही. ते फायद्यातोट्याचा विचार न करता माझी मदत करीत राहिले. आजही मी माझ्या मित्रांची मनापासून आठवण करतो.-डॉ. श्याम वर्धने, नासुप्र सभापती