शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

अधिकारी म्हणतात, प्रत्येक मित्र असतो जिवलग

By admin | Updated: August 2, 2015 03:13 IST

व्यक्तीच्या जीवनात आईवडील आणि कुटुंब महत्त्वाचे आहे, असे समजले जाते. परंतु मानवाच्या नात्यात एक असे नाते आहे जे खास असते.

आशिष दुबे  नागपूरव्यक्तीच्या जीवनात आईवडील आणि कुटुंब महत्त्वाचे आहे, असे समजले जाते. परंतु मानवाच्या नात्यात एक असे नाते आहे जे खास असते. ते अनेक नात्यांपेक्षा मजबूत आणि विश्वासाचे असते. ते नाते आहे मैत्रीचे. याच कारणामुळे मैत्रीचा पाया भक्कम समजण्यात येतो.जेव्हा भेटतो तेव्हा मनापासून भेटतोआजकाल मदर्स डे, फादर्स डे, व्हॅलेंटाईन डे साजरे होतात. माझा या दिवसांवर विश्वास नाही. कारण हे दिवस जेथे नाते संपुष्टात येत आहेत, तेथे साजरे करण्यात येतात. प्रत्येक दिवशी त्यांना आठवणे महत्त्वाचे आहे. मी याचे पालन करतो. माझ्या मित्रांची संख्या खूप मोठी आहे. यात प्राथमिक, माध्यमिक, कॉलेज, उच्च शिक्षण, शासकीय सेवेत आल्यानंतर प्रशिक्षण अकादमीतील मित्रांचा समावेश आहे. या सर्व मित्रात सुब्रत गुप्ता मला सर्वात जवळचे आहेत. ते आमच्या बॅचचे अखिल भारतीय स्तरावरील ४ थे टॉपर होते. आम्ही सोबतच प्रशिक्षण घेतले. सेवेत आल्यानंतरही आमची मैत्री कायम आहे. आम्ही अनेक वर्षानंतर भेटतो तरीसुद्धा आमच्या मैत्रीतील ओलावा कायम आहे. आमच्यात व्हॉट्स अप सारखी मैत्री नाही. व्यक्तीच्या जीवनात मैत्री हे खास नाते असते. हे नाते कठीण प्रसंगी भक्कमपणे पाठीशी उभे राहते. सुब्रत आणि माझे अनेक मित्र आजही काही समस्या असल्यास एकमेकांना मदत करतात. - अनुप कुमार, विभागीय आयुक्तमित्रांमुळेच या पदावर आहोमाझ्या जीवनात मित्रांचे महत्त्व खूप आहे. मी आज ज्या पदावर आहो त्यात आईवडिलांसह माझ्या मित्रांचे महत्त्वाचे योगदान आहे. माझे मित्र नसते तर मी आज या पदावर राहिलो नसतो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात एक असे नाते असते जे अनेक नात्यांपासून वेगळे आणि महत्त्वाचे असते. कारण जीवनात अनेक बाबी आपण कुटुंबीयांसोबत शेअर करू शकत नाही त्या बाबी फक्त मित्रांसोबत बोलल्या जाऊ शकतात. मित्रच आपल्या समस्येला त्यांची समस्या समजतात. त्या सोबतच ती समस्या दूर करण्यासाठी खांद्याला खांदा लावून आपली साथ देतात. समस्यांचे समाधान करतात. तुम्ही त्यांचा सल्ला ऐकला, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकल्यास तुमच्या सगळ्या समस्या दूर होतात. माझ्या जीवनातही अनेक मित्र आले. आजही ते माझे मित्र आहेत. कोण्या एका मित्राचे नाव घेणे सर्वांसोबत अन्याय करणारे ठरेल. कारण माझ्या जीवनात प्रत्येक मित्राचे योगदान आहे. शाळेपासून आजपर्यंत माझ्या मित्रांनी माझी साथ देताना त्यांचा काय फायदा होईल हा विचार केला नाही. ते फायद्यातोट्याचा विचार न करता माझी मदत करीत राहिले. आजही मी माझ्या मित्रांची मनापासून आठवण करतो.-डॉ. श्याम वर्धने, नासुप्र सभापती