शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

दीक्षाभूमीबाबत अधिकाऱ्यांची उदासीनता

By admin | Updated: April 5, 2015 02:31 IST

कोट्यवधी लोकांचे श्रद्धास्थान आणि ऊर्जाकेंद्र असलेल्या दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्र घोषित करण्याबाबत नगर विकास विभागाचे अधिकारी

नागपूर : कोट्यवधी लोकांचे श्रद्धास्थान आणि ऊर्जाकेंद्र असलेल्या दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्र घोषित करण्याबाबत नगर विकास विभागाचे अधिकारी उदासीन असून टाळाटाळ करीत असल्याची बाब माहितीच्या अधिकारांतर्गत उघडकीस आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्धधम्माची दीक्षा घेऊन ज्या ठिकाणी ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन घडवून आले. ते ठिकाण म्हणजे दीक्षाभूमी होय. दीक्षाभूमीवर आज आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभे आहे. जगभरातील लोकांसाठी हे ठिकाण ऊर्जेचे केंद्र बनले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप शहर उपाध्यक्ष भूषण दडवे यांनी २१ मे २०१३ रोजी दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्र घोषित करण्याची मागणी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनाही निवेदन सादर करण्यात आले होते. जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांनी यासंबंधात शासनाला शिफारससुद्धा केली होती. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख यांनी विधानसभेत व परिषदेत यासंबंधात प्रश्न उपस्थित केला होता. १० डिसेंबर २०१३ रोजी हिवाळी अधिवेशनात यासंबंधीच्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर देतांना दीक्षाभूमीला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगितले होते. यापार्श्वभूमीवर नगरविकास विभागाने कुठली कारवाई केली, याची माहिती दडवे यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत विचारली तेव्हा नगर विकास विभागातर्फे कक्ष अधिकारी व जन माहिती अधिकारी राजेश पाध्ये यांनी यासंबंधात कुठलाही निर्णय घेण्यात आला नसल्याचे स्पष्ट केले. तसेच ११ आॅगस्ट २०१४ चे पत्र कार्यालयास प्राप्त झालेच नसल्याचेही सांगितले. एकूणच अधिकारी हे या प्रकरणाबाबत उदासीन असून टाळाटाळ करीत आहेत. (प्रतिनिधी)