शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

अधिकारीच ठरताहेत झारीतील शुक्राचार्य

By admin | Updated: October 9, 2015 02:52 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपापल्या क्षेत्रातील एक गाव आदर्श ग्राम योजनेंतर्गत दत्तक घेऊन ...

आदर्श ग्राम योजना : आमदारांनी गाव दत्तक घेऊनही नियोजन विभागाकडे नोंद नाहीनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपापल्या क्षेत्रातील एक गाव आदर्श ग्राम योजनेंतर्गत दत्तक घेऊन विकासाच्या माध्यमातून गावाचा कायापालट करण्याचा संकल्प घेतला आहे. यासंदर्भात जिल्हा नियोजन विभागाकडे आतापर्यंत जिल्ह्यातील तीनच आमदारांनी गाव दत्तक घेतल्याची अधिकृत नोंद आहे. त्यामुळे गाव दत्तक घेण्यासंदर्भात लोकप्रतिनिधी उदासीन असल्याचे वरवर दिसून येते. मात्र खरा प्रकार वेगळाच आहे. आमदारांनी गाव दत्तक घेऊनही जिल्हा नियोजन विभागाला त्याची माहिती नाही, परिणामी शासनाकडे त्यांची नोंद नाही. अधिकाऱ्यांच्या समन्वयाच्या अभावामुळे पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांची ही महत्त्वाकांक्षी संकल्पना राबविण्यास अडथळा निर्माण होत आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर रामटेक विधानसभा मतदार क्षेत्राचे आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी १२ सप्टेंबर रोजी खैरी-बिजेवाडा ग्राम पंचायत अंतर्गत चारगाव हे गाव दत्तक घेतले होते. यानिमित्त चारगाव येथे एक छोटेखानी कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात गावातील नागरिक, सरपंच, ग्राम पंचायतीचे पदाधिकारी, यांच्यासह खंडविकास अधिकारी आणि तहसीलदार सुद्धा उपस्थित होते. हा जाहीर कार्यक्रम होऊन महिना होत आला. परंतु त्याची अधिकृत माहिती अजूनही तालुका स्तरावरील अधिकाऱ्यानी जिल्हा नियोजन विभागाला सादर केलेली नाही. परिणामी त्याबाबत नोंदणी झाली नसल्याने शासनदरबारी तसा अहवाल पोहोचू शकलेला नाही. असाच काहीसा प्रकार इतर मतदार संघातील क्षेत्रासंदर्भातही झाला असल्याचे यातून स्पष्ट होते. तालुका अधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन विभागाला कळविले नाही आणि जिल्हा नियोजन विभागातील अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यासंदर्भात माहिती घेण्याची तसदी घेतली नाही. अधिकाऱ्यांच्या समन्वयाच्या अभावामुळे आदर्श गाव होण्याच्या एका चांगल्या अभियानाला अजून गती येऊ शकली नाही. (प्रतिनिधी)