शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
4
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
5
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
6
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
7
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
8
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
9
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
10
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
11
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
12
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
13
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
14
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
16
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
17
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
18
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
19
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
20
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन

अधिकारीच ठरताहेत झारीतील शुक्राचार्य

By admin | Updated: October 9, 2015 02:52 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपापल्या क्षेत्रातील एक गाव आदर्श ग्राम योजनेंतर्गत दत्तक घेऊन ...

आदर्श ग्राम योजना : आमदारांनी गाव दत्तक घेऊनही नियोजन विभागाकडे नोंद नाहीनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपापल्या क्षेत्रातील एक गाव आदर्श ग्राम योजनेंतर्गत दत्तक घेऊन विकासाच्या माध्यमातून गावाचा कायापालट करण्याचा संकल्प घेतला आहे. यासंदर्भात जिल्हा नियोजन विभागाकडे आतापर्यंत जिल्ह्यातील तीनच आमदारांनी गाव दत्तक घेतल्याची अधिकृत नोंद आहे. त्यामुळे गाव दत्तक घेण्यासंदर्भात लोकप्रतिनिधी उदासीन असल्याचे वरवर दिसून येते. मात्र खरा प्रकार वेगळाच आहे. आमदारांनी गाव दत्तक घेऊनही जिल्हा नियोजन विभागाला त्याची माहिती नाही, परिणामी शासनाकडे त्यांची नोंद नाही. अधिकाऱ्यांच्या समन्वयाच्या अभावामुळे पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांची ही महत्त्वाकांक्षी संकल्पना राबविण्यास अडथळा निर्माण होत आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर रामटेक विधानसभा मतदार क्षेत्राचे आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी १२ सप्टेंबर रोजी खैरी-बिजेवाडा ग्राम पंचायत अंतर्गत चारगाव हे गाव दत्तक घेतले होते. यानिमित्त चारगाव येथे एक छोटेखानी कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात गावातील नागरिक, सरपंच, ग्राम पंचायतीचे पदाधिकारी, यांच्यासह खंडविकास अधिकारी आणि तहसीलदार सुद्धा उपस्थित होते. हा जाहीर कार्यक्रम होऊन महिना होत आला. परंतु त्याची अधिकृत माहिती अजूनही तालुका स्तरावरील अधिकाऱ्यानी जिल्हा नियोजन विभागाला सादर केलेली नाही. परिणामी त्याबाबत नोंदणी झाली नसल्याने शासनदरबारी तसा अहवाल पोहोचू शकलेला नाही. असाच काहीसा प्रकार इतर मतदार संघातील क्षेत्रासंदर्भातही झाला असल्याचे यातून स्पष्ट होते. तालुका अधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन विभागाला कळविले नाही आणि जिल्हा नियोजन विभागातील अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यासंदर्भात माहिती घेण्याची तसदी घेतली नाही. अधिकाऱ्यांच्या समन्वयाच्या अभावामुळे आदर्श गाव होण्याच्या एका चांगल्या अभियानाला अजून गती येऊ शकली नाही. (प्रतिनिधी)