शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

समुपदेशन करण्यात अधिकारी कमी पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:46 IST

फवारणी करताना शेतकºयांना विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी प्रकाराला अनेक बाबी कारणीभूत आहेत.

ठळक मुद्देकेंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांची कबुली े चौकशी करून कारवाई करणार ेकीटकनाशक बळींची आर्थिक मदतीची रक्कम वाढविणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फवारणी करताना शेतकºयांना विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी प्रकाराला अनेक बाबी कारणीभूत आहेत. मात्र, या शेतकºयांचे समुपदेशन करण्यात, त्यांना योग्य प्रकारचा सल्ला देण्यात शासकीय यंत्रणेतील संबंधित अधिकारी कमी पडले, अशी कबुली केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.अमली पदार्थाच्या तस्करीला आळा घालण्यासाठी आयोजित उच्चस्तरीय बैठक घेतल्यानंतर अहीर शेतकरी मृत्यू प्रकरणसंबंधाने पत्रकारांशी बोलले. ३२ शेतकºयांचा मृत्यू झाला. सरकार या प्रकरणाची पूर्ण चौकशी करीत आहे. काय कारण आहेत, कोण जबाबदार आहे, ते पाहून कारवाईचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. मृत शेतकºयाच्या परिवाराला दोन लाखांची आर्थिक मदत करण्याचे सरकारने जाहीर केले आहे. ज्याप्रमाणे वीज पडून कुणी ठार झाल्यास सरकार त्याच्या कुटुंबीयाला चार लाखांची आर्थिक मदत देते, त्याचप्रमाणे राज्याच्या दोन लाखांच्या मदतीत केंद्र सरकारदेखील दोन लाखांची भर घालून मृत शेतकºयाच्या कुटुंबीयांना चार लाख रुपये मदत देण्याचा विचार करीत आहे. लवकरच त्या संबंधाने निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.ज्या औषधांनी त्यांचा मृत्यू झाला, तैवानचे जे फवारणी यंत्र वापरण्यात आले, त्यावर प्रतिबंध घालण्याचा निर्णय किंवा कारवाई पूर्ण चौकशीनंतर राज्य सरकार घेईल, असेही ते म्हणाले.रोहिंग्यांना नो एन्ट्रीयापूर्वी हे रोहिंगे भारतात शिरले आणि म्यान्मारमध्ये जी स्थिती निर्माण झाली, त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येत आहे. घुसखोरी केलेल्या रोहिंग्यांना भारतातून त्यांच्या देशात हाकलून लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मात्र, यापुढे रोहिंग्या मुसलमानांना भारतात प्रवेश दिला जाणार नाही, असेही अहीर यांनी स्पष्ट केले.