शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

समुपदेशन करण्यात अधिकारी कमी पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:46 IST

फवारणी करताना शेतकºयांना विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी प्रकाराला अनेक बाबी कारणीभूत आहेत.

ठळक मुद्देकेंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांची कबुली े चौकशी करून कारवाई करणार ेकीटकनाशक बळींची आर्थिक मदतीची रक्कम वाढविणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फवारणी करताना शेतकºयांना विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी प्रकाराला अनेक बाबी कारणीभूत आहेत. मात्र, या शेतकºयांचे समुपदेशन करण्यात, त्यांना योग्य प्रकारचा सल्ला देण्यात शासकीय यंत्रणेतील संबंधित अधिकारी कमी पडले, अशी कबुली केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.अमली पदार्थाच्या तस्करीला आळा घालण्यासाठी आयोजित उच्चस्तरीय बैठक घेतल्यानंतर अहीर शेतकरी मृत्यू प्रकरणसंबंधाने पत्रकारांशी बोलले. ३२ शेतकºयांचा मृत्यू झाला. सरकार या प्रकरणाची पूर्ण चौकशी करीत आहे. काय कारण आहेत, कोण जबाबदार आहे, ते पाहून कारवाईचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. मृत शेतकºयाच्या परिवाराला दोन लाखांची आर्थिक मदत करण्याचे सरकारने जाहीर केले आहे. ज्याप्रमाणे वीज पडून कुणी ठार झाल्यास सरकार त्याच्या कुटुंबीयाला चार लाखांची आर्थिक मदत देते, त्याचप्रमाणे राज्याच्या दोन लाखांच्या मदतीत केंद्र सरकारदेखील दोन लाखांची भर घालून मृत शेतकºयाच्या कुटुंबीयांना चार लाख रुपये मदत देण्याचा विचार करीत आहे. लवकरच त्या संबंधाने निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.ज्या औषधांनी त्यांचा मृत्यू झाला, तैवानचे जे फवारणी यंत्र वापरण्यात आले, त्यावर प्रतिबंध घालण्याचा निर्णय किंवा कारवाई पूर्ण चौकशीनंतर राज्य सरकार घेईल, असेही ते म्हणाले.रोहिंग्यांना नो एन्ट्रीयापूर्वी हे रोहिंगे भारतात शिरले आणि म्यान्मारमध्ये जी स्थिती निर्माण झाली, त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येत आहे. घुसखोरी केलेल्या रोहिंग्यांना भारतातून त्यांच्या देशात हाकलून लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मात्र, यापुढे रोहिंग्या मुसलमानांना भारतात प्रवेश दिला जाणार नाही, असेही अहीर यांनी स्पष्ट केले.