शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

आमदार, खासदार, अधिकाऱ्यांकडून विकासकामांत अडथळा; गडकरींकडून परखड शब्दांत खरडपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2022 10:44 IST

अधिकाऱ्यांचे पत्नीपेक्षा फाइलवर प्रेम जास्त

नागपूर : केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी खासदार, आमदार आणि अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. महाराष्ट्रातील अनेक आमदार, खासदार आपला प्रभाव वापरून विकासकामे थांबवतात, तर कार्यालयांमध्ये भ्रष्टाचाराशिवाय फाइल पुढे सरकत नाही. अशा अधिकाऱ्यांची ओळख पटवून त्यांना निलंबित करण्यात आले पाहिजे, असे ते म्हणाले.

चिटणवीस सेंटर येथे ‘वेद’तर्फे आयोजित ‘मिन्कॉन’ या खाण प्रदर्शन आणि संमेलनाच्या उद्घाटन समारंभात गडकरी बोलत होते. आपल्या घरासमोर बांधलेल्या रस्त्याचा संदर्भ देत ते म्हणाले की, यासाठी त्यांनी ११ वर्षांत ३० बैठका घेतल्या. मात्र अधिकारी आले तर लाज वाटते, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर न्यायालयाच्या निर्णयानंतर न्याय मिळाला. अधिकाऱ्यांना पत्नीपेक्षा फाइल जास्त आवडते. फायली अशाच राहतात. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांच्या कामगिरीचे ऑडिट व्हायला हवे, असे गडकरी म्हणाले.

यावेळी गडकरी यांनी वेकोलिच्या अधिकाऱ्यांच्या कानपिचक्या काढल्या. पाच नवीन कोळसा खाणी बांधल्या जात असल्याचे अनेक वर्षांपासून ऐकत आहोत; परंतु आजपर्यंत तसे झालेले नाही. अधिकाऱ्यांची भूमिका नकारात्मक आहे. त्यामुळे अनेक कोळसा खाणींचा लिलाव झाला; पण भूसंपादन होऊ शकले नाही. ब्लॅकमेलिंगदेखील होत आहे. खाण कंपन्यांना परवानगी देण्यासाठी कालमर्यादा असावी. सध्या या कामात दिरंगाई आणि भ्रष्टाचार होत आहे, असे गडकरी म्हणाले. हा कार्यक्रम फोटो काढण्यासाठी नसावा, या शब्दांत त्यांनी आयोजकांनादेखील टोला मारला.

वाघ ताडोबात मात्र खाण उमरेडची बंद

गडकरी म्हणाले की, ताडोबात वाघ आहेत. मात्र त्यामुळे उमरेडची मुरपार खाण बंद आहे. हा एक विचित्र निर्णय आहे. मुरपारमध्ये क्वचितच वाघ आला असेल. विकासकामे आणि उद्योग उभारणीत वन व पर्यावरण परवानगी मिळण्यात मोठी अडचण होते.

आणखी काय म्हणाले गडकरी ?

- वेकोलिने घोषित केलेल्या कॅलोरीफिक व्हॅल्यू कोळशात आढळल्यास ते शिक्षा भोगण्यास तयार आहेत.

- विजेशिवाय उद्योग नाही, उद्योगाशिवाय विकास नाही. अशा परिस्थितीत हरित ऊर्जा आवश्यक आहे.

- स्वावलंबी भारतासाठी कोळशाचे उत्पादन वाढवावे लागेल.

- खनिजे कोळसा आयात करतात, मग भारत स्वावलंबी कसा होईल.

- त्यांनी मंत्र्यांना सांगितले की सरकार त्यांचे आहे. लोक त्याला कामाबद्दल विचारतील, अधिकाऱ्यांना नाही.

टॅग्स :PoliticsराजकारणNitin Gadkariनितीन गडकरी