शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

आमदार, खासदार, अधिकाऱ्यांकडून विकासकामांत अडथळा; गडकरींकडून परखड शब्दांत खरडपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2022 10:44 IST

अधिकाऱ्यांचे पत्नीपेक्षा फाइलवर प्रेम जास्त

नागपूर : केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी खासदार, आमदार आणि अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. महाराष्ट्रातील अनेक आमदार, खासदार आपला प्रभाव वापरून विकासकामे थांबवतात, तर कार्यालयांमध्ये भ्रष्टाचाराशिवाय फाइल पुढे सरकत नाही. अशा अधिकाऱ्यांची ओळख पटवून त्यांना निलंबित करण्यात आले पाहिजे, असे ते म्हणाले.

चिटणवीस सेंटर येथे ‘वेद’तर्फे आयोजित ‘मिन्कॉन’ या खाण प्रदर्शन आणि संमेलनाच्या उद्घाटन समारंभात गडकरी बोलत होते. आपल्या घरासमोर बांधलेल्या रस्त्याचा संदर्भ देत ते म्हणाले की, यासाठी त्यांनी ११ वर्षांत ३० बैठका घेतल्या. मात्र अधिकारी आले तर लाज वाटते, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर न्यायालयाच्या निर्णयानंतर न्याय मिळाला. अधिकाऱ्यांना पत्नीपेक्षा फाइल जास्त आवडते. फायली अशाच राहतात. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांच्या कामगिरीचे ऑडिट व्हायला हवे, असे गडकरी म्हणाले.

यावेळी गडकरी यांनी वेकोलिच्या अधिकाऱ्यांच्या कानपिचक्या काढल्या. पाच नवीन कोळसा खाणी बांधल्या जात असल्याचे अनेक वर्षांपासून ऐकत आहोत; परंतु आजपर्यंत तसे झालेले नाही. अधिकाऱ्यांची भूमिका नकारात्मक आहे. त्यामुळे अनेक कोळसा खाणींचा लिलाव झाला; पण भूसंपादन होऊ शकले नाही. ब्लॅकमेलिंगदेखील होत आहे. खाण कंपन्यांना परवानगी देण्यासाठी कालमर्यादा असावी. सध्या या कामात दिरंगाई आणि भ्रष्टाचार होत आहे, असे गडकरी म्हणाले. हा कार्यक्रम फोटो काढण्यासाठी नसावा, या शब्दांत त्यांनी आयोजकांनादेखील टोला मारला.

वाघ ताडोबात मात्र खाण उमरेडची बंद

गडकरी म्हणाले की, ताडोबात वाघ आहेत. मात्र त्यामुळे उमरेडची मुरपार खाण बंद आहे. हा एक विचित्र निर्णय आहे. मुरपारमध्ये क्वचितच वाघ आला असेल. विकासकामे आणि उद्योग उभारणीत वन व पर्यावरण परवानगी मिळण्यात मोठी अडचण होते.

आणखी काय म्हणाले गडकरी ?

- वेकोलिने घोषित केलेल्या कॅलोरीफिक व्हॅल्यू कोळशात आढळल्यास ते शिक्षा भोगण्यास तयार आहेत.

- विजेशिवाय उद्योग नाही, उद्योगाशिवाय विकास नाही. अशा परिस्थितीत हरित ऊर्जा आवश्यक आहे.

- स्वावलंबी भारतासाठी कोळशाचे उत्पादन वाढवावे लागेल.

- खनिजे कोळसा आयात करतात, मग भारत स्वावलंबी कसा होईल.

- त्यांनी मंत्र्यांना सांगितले की सरकार त्यांचे आहे. लोक त्याला कामाबद्दल विचारतील, अधिकाऱ्यांना नाही.

टॅग्स :PoliticsराजकारणNitin Gadkariनितीन गडकरी