शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

सरकारी कामात अडथळा हा खासगी गुन्हा नाही : उच्च न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2021 10:20 IST

२०१९ मध्ये बल्लारपूर पोलिसांनी नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी व चंद्रपूरचे वर्तमान अतिरिक्त आयुक्त विपीन मुद्धा यांच्या तक्रारीवरून विजय राठी व इतरांविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा नाेंदविला.

ठळक मुद्देअधिकारी व आरोपींमधील तडजोड अमान्य

राकेश घानोडे

नागपूर : सरकारी कामात अडथळा निर्माण करणे हा खासगी स्वरुपाचा गुन्हा नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका निर्णयात स्पष्ट केले, तसेच हा गुन्हा रद्द करण्यासाठी सरकारी अधिकारी व आरोपींनी केलेली तडजोड अमान्य केली. न्यायमूर्तीद्वय महेश सोनक व पुष्पा गणेडीवाला यांनी हा निर्णय दिला.

२०१९ मध्ये बल्लारपूर पोलिसांनी नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी व चंद्रपूरचे वर्तमान अतिरिक्त आयुक्त विपीन मुद्धा यांच्या तक्रारीवरून विजय राठी व इतरांविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा नाेंदविला. त्यानंतर मुद्धा व आरोपींनी तडजोड केली व हा गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये संयुक्त अर्ज दाखल केला होता. आरोपींनी रागाच्या भरात बेकायदेशीर कृती केली. आरोपींच्या कृतीमुळे सार्वजनिक हित बाधित झाले नाही. हे प्रकरण खासगी स्वरुपाचे आहे. त्यामुळे गुन्हा रद्द करण्यास हरकत नाही, असे मुद्दे मुद्धा यांनी मांडले होते.

न्यायालयाने मुद्धा यांची ही भूमिका पाहून आश्चर्य व्यक्त करीत, असे प्रकरण पहिल्यांदाच पाहत असल्याचे सांगितले. हे प्रकरण खासगी स्वरुपाचे आहे, हा मुद्धा यांचा समज चुकीचा आहे. त्यांनी पोलीस तक्रारीतील आरोप खासगी क्षमतेत नाही तर, सरकारी अधिकारी म्हणून केले आहेत. परिणामी या प्रकरणात झालेली तडजोड मान्य करणे सार्वजनिक हिताचे होणार नाही. त्यामुळे समाजात चांगला संदेश जाणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले. हा गुन्हा रद्द करण्यास न्यायालयाकडून नकार मिळाल्यानंतर अर्जदारांनी संबंधित अर्ज मागे घेतला. राज्य सरकारच्या वतीने ॲड. विनोद ठाकरे यांनी कामकाज पाहिले.

सरकारी अधिकाऱ्याने जबाबदारीने वागावे

एखाद्या व्यक्तीच्या कृतीमुळे कामात अडथळा निर्माण झाला, हा आरोप सरकारी अधिकाऱ्याने जबाबदारीने केला पाहिजे. असे आरोप सहज म्हणून केले जाऊ शकत नाहीत व ते आरोप सहजपणे मागेही घेतले जाऊ शकत नाही. असे आरोप केले गेल्यानंतर पोलीस यंत्रणेला आवश्यक चौकशी करावी लागते, तसेच न्यायिक संस्थेला त्यावर न्यायनिवाडा करण्यासाठी महत्त्वाचा वेळ खर्च करावा लागतो, याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले.

टॅग्स :Courtन्यायालयGovernmentसरकार