शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कामात अडथळा हा खासगी गुन्हा नाही : उच्च न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2021 10:20 IST

२०१९ मध्ये बल्लारपूर पोलिसांनी नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी व चंद्रपूरचे वर्तमान अतिरिक्त आयुक्त विपीन मुद्धा यांच्या तक्रारीवरून विजय राठी व इतरांविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा नाेंदविला.

ठळक मुद्देअधिकारी व आरोपींमधील तडजोड अमान्य

राकेश घानोडे

नागपूर : सरकारी कामात अडथळा निर्माण करणे हा खासगी स्वरुपाचा गुन्हा नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका निर्णयात स्पष्ट केले, तसेच हा गुन्हा रद्द करण्यासाठी सरकारी अधिकारी व आरोपींनी केलेली तडजोड अमान्य केली. न्यायमूर्तीद्वय महेश सोनक व पुष्पा गणेडीवाला यांनी हा निर्णय दिला.

२०१९ मध्ये बल्लारपूर पोलिसांनी नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी व चंद्रपूरचे वर्तमान अतिरिक्त आयुक्त विपीन मुद्धा यांच्या तक्रारीवरून विजय राठी व इतरांविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा नाेंदविला. त्यानंतर मुद्धा व आरोपींनी तडजोड केली व हा गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये संयुक्त अर्ज दाखल केला होता. आरोपींनी रागाच्या भरात बेकायदेशीर कृती केली. आरोपींच्या कृतीमुळे सार्वजनिक हित बाधित झाले नाही. हे प्रकरण खासगी स्वरुपाचे आहे. त्यामुळे गुन्हा रद्द करण्यास हरकत नाही, असे मुद्दे मुद्धा यांनी मांडले होते.

न्यायालयाने मुद्धा यांची ही भूमिका पाहून आश्चर्य व्यक्त करीत, असे प्रकरण पहिल्यांदाच पाहत असल्याचे सांगितले. हे प्रकरण खासगी स्वरुपाचे आहे, हा मुद्धा यांचा समज चुकीचा आहे. त्यांनी पोलीस तक्रारीतील आरोप खासगी क्षमतेत नाही तर, सरकारी अधिकारी म्हणून केले आहेत. परिणामी या प्रकरणात झालेली तडजोड मान्य करणे सार्वजनिक हिताचे होणार नाही. त्यामुळे समाजात चांगला संदेश जाणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले. हा गुन्हा रद्द करण्यास न्यायालयाकडून नकार मिळाल्यानंतर अर्जदारांनी संबंधित अर्ज मागे घेतला. राज्य सरकारच्या वतीने ॲड. विनोद ठाकरे यांनी कामकाज पाहिले.

सरकारी अधिकाऱ्याने जबाबदारीने वागावे

एखाद्या व्यक्तीच्या कृतीमुळे कामात अडथळा निर्माण झाला, हा आरोप सरकारी अधिकाऱ्याने जबाबदारीने केला पाहिजे. असे आरोप सहज म्हणून केले जाऊ शकत नाहीत व ते आरोप सहजपणे मागेही घेतले जाऊ शकत नाही. असे आरोप केले गेल्यानंतर पोलीस यंत्रणेला आवश्यक चौकशी करावी लागते, तसेच न्यायिक संस्थेला त्यावर न्यायनिवाडा करण्यासाठी महत्त्वाचा वेळ खर्च करावा लागतो, याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले.

टॅग्स :Courtन्यायालयGovernmentसरकार