शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

विदर्भात रुग्णांची संख्या ७५ हजारावर; २, ३८७ नवे रुग्ण, ५९ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 10:35 IST

विदर्भात कोरोनाचे संकट आणखीच गडद होत चालले आहे. सोमवारी २,३८७ नव्या रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्या ७५,१४१ झाली आहे. तर ५९ रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या २,०५८वर पोहचली आहे.

ठळक मुद्देमृतांची संख्या २,०५८६३.७१ टक्के रुग्ण बरे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात कोरोनाचे संकट आणखीच गडद होत चालले आहे. सोमवारी २,३८७ नव्या रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्या ७५,१४१ झाली आहे. तर ५९ रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या २,०५८वर पोहचली आहे. आतापर्यंत ४७,८७९ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्णसंख्येच्या तुलनेत ६३.७१ टक्केरुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या २०,४९७ रुग्ण उपचाराखाली आहेत.

नागपूर जिल्ह्यात १,५५० रुग्ण पॉझिटिव्ह तर ५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या सात दिवसांपासून हीच स्थिती आहे. रुग्णांची एकूण संख्या ४१,०३२ तर मृतांची संख्या १,३६५ झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या २८,६३८ वर गेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १५२ नव्या रुग्णांची नोंद झाली तर दोन रुग्णांचे मृत्यू झाले. रुग्णसंख्या ४,०५५ तर मृतांची संख्या ४८ झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात १५० रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने येथील रुग्णसंख्या ३,९९५ झाली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात १३९ रुग्णांची नोंद झाली तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णसंख्या ४,३९२ झाली असून मृतांची संख्या १२४ वर गेली आहे. भंडारा जिल्ह्यात १०३ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांची संख्या २,१०६ झाली आहे. जिल्ह्यात दोन रुग्णाचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ३७ वर पोहचली आहे.अमरावती जिल्ह्यात ८२ रुग्णांची भर पडल्याने बाधितांची संख्या ७,०८७ झाली आहे. वाशिम जिल्ह्यात ८१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णसंख्या २,२४४ झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात रुग्णसंख्येत किंचीत घट आली. ५४ रुग्ण पॉझिटिव्ह आले, मात्र मृत्यूचे सत्र सुरूच आहे. दोन रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या ३३ झाली आहे.

वर्धा जिल्ह्यात ५७ रुग्ण व दोन रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णसंख्या १,७७५ तर मृतांची संख्या ३४ वर गेली आहे. गडचिरोली जिल्ह्यात १९ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने येथील रुग्णसंख्या १,३०१ झाली आहे. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस