शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

प्रवासी वाढूनही आपली बसची संख्या जैसे थे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:08 IST

नागपूर : महानगरपालिकेने आपली बसची संख्या टप्प्याटप्प्याने वाढविण्याची घोषणा केली हाेती. परंतु, आतापर्यंत निम्म्या बसेसही रोडवर आणल्या नाहीत. आता ...

नागपूर : महानगरपालिकेने आपली बसची संख्या टप्प्याटप्प्याने वाढविण्याची घोषणा केली हाेती. परंतु, आतापर्यंत निम्म्या बसेसही रोडवर आणल्या नाहीत. आता प्रवाशांची संख्या वाढली आहे. सकाळी व सायंकाळी बुटीबोरी, हिंगणा, खापरखेडा, पारडी, कामठी इत्यादी मार्गावरील बसेसमध्ये पाय ठेवायलाही जागा नसते. त्यामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन होते. ही परिस्थिती पाहता मनपाला नागरिकांपेक्षा तिजोरीची चिंता जास्त असल्याचे स्पष्ट होत आहे.

लॉकडाऊनपूर्वी शहरात ३६० बसेस धावत होत्या. लॉकडाऊन काळात या सर्व बसेस सुमारे आठ महिने बंद राहिल्या. दरम्यान, अन्य महानगरपालिकांनी बसेस सुरू केल्यानंतर नागपूर महानगरपालिकेनेही बसेस रोडवर उतरवल्या. त्यावेळी बसेसची संख्या टप्प्याटप्प्याने वाढविण्याची घोषणा करण्यात आली होती. त्याचा मनपाला विसर पडला आहे. प्रवासी वाढले असताना सध्या केवळ १७२ बसेसच धावत आहेत. ऑटो व कॅब चालक या परिस्थितीचा फायदा घेत आहेत. ते प्रवाशांकडून अधिक भाडे वसूल करीत आहेत.

--------------

रोज ४० हजार प्रवासी

सध्या आपली बसमध्ये रोज सुमारे ४० हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. आधी ही संख्या १८ ते २० हजार होती. सकाळी व सायंकाळी प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागतो.

------

सकाळी, सायंकाळी फेऱ्या वाढणार

वर्तमानात सुरू असलेल्या बसेसमधून रोज सुमारे ७५ हजार प्रवासी प्रवास करू शकतात. परंतु, सध्या ३५ ते ४० हजार प्रवासीच प्रवास करीत आहेत. केवळ सकाळी व सायंकाळी प्रवाशांची संख्या जास्त असते. त्यामुळे या वेळेत बसेसच्या फेऱ्या वाढविण्यात येतील.

----- रवींद्र पागे, प्रशासकीय अधिकारी, मनपा परिवहन विभाग.