शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

डेंग्यू रुग्णांची संख्या ७७९ वर, सात जणांच्या मृत्यूची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 20:46 IST

डेंग्यूच्या डासांनी नागपूरकरांची झोप उडवली आहे. शासकीयसह खासगी रुग्णालये या आजाराच्या रुग्णांनी खचाखच भरली आहेत. दिवाळीच्या उत्सावावर काहीसे विरजण पडल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात या आजाराचे ११० रुग्ण आढळून आल्याने रुग्णांची संख्या नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या सहा जिल्हामिळून ७७९वर पोहचली आहे. तर सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात आढळून आले आहे. यात दोन मृत्यू व ३३७ रुग्णांची नोंद आहे.

ठळक मुद्देसर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डेंग्यूच्या डासांनी नागपूरकरांची झोप उडवली आहे. शासकीयसह खासगी रुग्णालये या आजाराच्या रुग्णांनी खचाखच भरली आहेत. दिवाळीच्या उत्सावावर काहीसे विरजण पडल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात या आजाराचे ११० रुग्ण आढळून आल्याने रुग्णांची संख्या नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या सहा जिल्हामिळून ७७९वर पोहचली आहे. तर सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात आढळून आले आहे. यात दोन मृत्यू व ३३७ रुग्णांची नोंद आहे.‘एडिस’ डासाच्या चावण्याने होणाऱ्या डेंग्यूने नागपूरकर चांगलेच गारद झाले आहे. शहरात २०१४मध्ये सर्वाधिक म्हणजे ६०१ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर २०१५ मध्ये २३०, २०१६ मध्ये १९५ तर २०१७ मध्ये २०० रुग्ण आढळून आले होते. परंतु या वर्षी हा आकडा आतापर्यंत २४३ वर पोहचला आहे. तर नागपूर ग्रामीणमध्ये दोन मृत्यू व ९४ रुग्णांची नोंद आहे. नागपूर विभागाचा विचार केल्यास नागपूर जिल्ह्यानंतर सर्वाधिक रुग्ण चंद्रपूर जिल्ह्यात आढळून आले आहेत. रुग्णांची ही संख्या २७५वर गेली आहे. वर्धा जिल्ह्यात १५१ रुग्ण, गोंदिया तीन तर गडचिरोली जिल्ह्यात ११ रुग्ण आढळून आले आहेत.सर्वाधिक मृत्यू वर्धा जिल्ह्यातया वर्षी डेंग्यूचे सर्वाधिक मृत्यू वर्धा जिल्ह्यात झाले आहेत. या जिल्ह्यात जानेवारी ते आतापर्यंत १५१ रुग्ण आढळून आले असून यातील पाच रुग्णांचे बळी गेले आहेत. आरोग्य विभाग याकडे विशेष लक्ष देऊन असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.नागपुरात कठोर उपाययोजनांकडे दुर्लक्षनागपूर शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना शासनाकडून वेळीच उपाययोजना झाल्या नाहीत. घराघरांची तपासणी करून डेंग्यू अळ्या शोधण्याचे व फवारणीचेच कार्य एवढ्यापुरतेच महानगरपालिकेचे आरोग्य विभागत मर्यादित राहिले आहे. वेळीच मनुष्यबळ, अद्यावत यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिली असती आणि डेंग्यू अळ्या आढळून येणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे अधिकार दिले असते तर आज चित्र वेगळे असते असे, तज्ज्ञांचे म्हणणे आहे.नागरिकांनी गंभीरतेने घ्यावेडेंग्यूला कारणीभूत असलेले एडीस डास हे जास्त करून शहरी वस्त्यांत आढळतात. या डासांवर पांढरे पट्टे असल्यामुळे ओळखायला सोपे जाते. रिकामे डबे, मडकी, चाकांचे टायर्स इत्यादींमध्ये साचलेल्या पाण्यात हे डास लवकर फैलावतात. यामुळे यातले पाणी दर आठवड्याला काढून त्यांचा तळ ब्रशने घासावा लागतो तरच चिकटलेली अंडी निघतात. डेंग्यूवर उपचार नाही, दिसून आलेल्या लक्षणांवर उपचार केला जातो. यामुळे या डासाची उत्पत्तीच होणार नाही यासाठी प्रत्येक नागरिकाने याला गंभीरतेने घेणे आवश्यक आहे.डॉ. संजय जयस्वालउपसंचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग

टॅग्स :dengueडेंग्यूDeathमृत्यू