शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

डेंग्यू रुग्णांची संख्या ७७९ वर, सात जणांच्या मृत्यूची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 20:46 IST

डेंग्यूच्या डासांनी नागपूरकरांची झोप उडवली आहे. शासकीयसह खासगी रुग्णालये या आजाराच्या रुग्णांनी खचाखच भरली आहेत. दिवाळीच्या उत्सावावर काहीसे विरजण पडल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात या आजाराचे ११० रुग्ण आढळून आल्याने रुग्णांची संख्या नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या सहा जिल्हामिळून ७७९वर पोहचली आहे. तर सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात आढळून आले आहे. यात दोन मृत्यू व ३३७ रुग्णांची नोंद आहे.

ठळक मुद्देसर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डेंग्यूच्या डासांनी नागपूरकरांची झोप उडवली आहे. शासकीयसह खासगी रुग्णालये या आजाराच्या रुग्णांनी खचाखच भरली आहेत. दिवाळीच्या उत्सावावर काहीसे विरजण पडल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात या आजाराचे ११० रुग्ण आढळून आल्याने रुग्णांची संख्या नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या सहा जिल्हामिळून ७७९वर पोहचली आहे. तर सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात आढळून आले आहे. यात दोन मृत्यू व ३३७ रुग्णांची नोंद आहे.‘एडिस’ डासाच्या चावण्याने होणाऱ्या डेंग्यूने नागपूरकर चांगलेच गारद झाले आहे. शहरात २०१४मध्ये सर्वाधिक म्हणजे ६०१ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर २०१५ मध्ये २३०, २०१६ मध्ये १९५ तर २०१७ मध्ये २०० रुग्ण आढळून आले होते. परंतु या वर्षी हा आकडा आतापर्यंत २४३ वर पोहचला आहे. तर नागपूर ग्रामीणमध्ये दोन मृत्यू व ९४ रुग्णांची नोंद आहे. नागपूर विभागाचा विचार केल्यास नागपूर जिल्ह्यानंतर सर्वाधिक रुग्ण चंद्रपूर जिल्ह्यात आढळून आले आहेत. रुग्णांची ही संख्या २७५वर गेली आहे. वर्धा जिल्ह्यात १५१ रुग्ण, गोंदिया तीन तर गडचिरोली जिल्ह्यात ११ रुग्ण आढळून आले आहेत.सर्वाधिक मृत्यू वर्धा जिल्ह्यातया वर्षी डेंग्यूचे सर्वाधिक मृत्यू वर्धा जिल्ह्यात झाले आहेत. या जिल्ह्यात जानेवारी ते आतापर्यंत १५१ रुग्ण आढळून आले असून यातील पाच रुग्णांचे बळी गेले आहेत. आरोग्य विभाग याकडे विशेष लक्ष देऊन असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.नागपुरात कठोर उपाययोजनांकडे दुर्लक्षनागपूर शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना शासनाकडून वेळीच उपाययोजना झाल्या नाहीत. घराघरांची तपासणी करून डेंग्यू अळ्या शोधण्याचे व फवारणीचेच कार्य एवढ्यापुरतेच महानगरपालिकेचे आरोग्य विभागत मर्यादित राहिले आहे. वेळीच मनुष्यबळ, अद्यावत यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिली असती आणि डेंग्यू अळ्या आढळून येणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे अधिकार दिले असते तर आज चित्र वेगळे असते असे, तज्ज्ञांचे म्हणणे आहे.नागरिकांनी गंभीरतेने घ्यावेडेंग्यूला कारणीभूत असलेले एडीस डास हे जास्त करून शहरी वस्त्यांत आढळतात. या डासांवर पांढरे पट्टे असल्यामुळे ओळखायला सोपे जाते. रिकामे डबे, मडकी, चाकांचे टायर्स इत्यादींमध्ये साचलेल्या पाण्यात हे डास लवकर फैलावतात. यामुळे यातले पाणी दर आठवड्याला काढून त्यांचा तळ ब्रशने घासावा लागतो तरच चिकटलेली अंडी निघतात. डेंग्यूवर उपचार नाही, दिसून आलेल्या लक्षणांवर उपचार केला जातो. यामुळे या डासाची उत्पत्तीच होणार नाही यासाठी प्रत्येक नागरिकाने याला गंभीरतेने घेणे आवश्यक आहे.डॉ. संजय जयस्वालउपसंचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग

टॅग्स :dengueडेंग्यूDeathमृत्यू