शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

डेंग्यू रुग्णांची संख्या ७७९ वर, सात जणांच्या मृत्यूची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 20:46 IST

डेंग्यूच्या डासांनी नागपूरकरांची झोप उडवली आहे. शासकीयसह खासगी रुग्णालये या आजाराच्या रुग्णांनी खचाखच भरली आहेत. दिवाळीच्या उत्सावावर काहीसे विरजण पडल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात या आजाराचे ११० रुग्ण आढळून आल्याने रुग्णांची संख्या नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या सहा जिल्हामिळून ७७९वर पोहचली आहे. तर सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात आढळून आले आहे. यात दोन मृत्यू व ३३७ रुग्णांची नोंद आहे.

ठळक मुद्देसर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डेंग्यूच्या डासांनी नागपूरकरांची झोप उडवली आहे. शासकीयसह खासगी रुग्णालये या आजाराच्या रुग्णांनी खचाखच भरली आहेत. दिवाळीच्या उत्सावावर काहीसे विरजण पडल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात या आजाराचे ११० रुग्ण आढळून आल्याने रुग्णांची संख्या नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या सहा जिल्हामिळून ७७९वर पोहचली आहे. तर सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात आढळून आले आहे. यात दोन मृत्यू व ३३७ रुग्णांची नोंद आहे.‘एडिस’ डासाच्या चावण्याने होणाऱ्या डेंग्यूने नागपूरकर चांगलेच गारद झाले आहे. शहरात २०१४मध्ये सर्वाधिक म्हणजे ६०१ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर २०१५ मध्ये २३०, २०१६ मध्ये १९५ तर २०१७ मध्ये २०० रुग्ण आढळून आले होते. परंतु या वर्षी हा आकडा आतापर्यंत २४३ वर पोहचला आहे. तर नागपूर ग्रामीणमध्ये दोन मृत्यू व ९४ रुग्णांची नोंद आहे. नागपूर विभागाचा विचार केल्यास नागपूर जिल्ह्यानंतर सर्वाधिक रुग्ण चंद्रपूर जिल्ह्यात आढळून आले आहेत. रुग्णांची ही संख्या २७५वर गेली आहे. वर्धा जिल्ह्यात १५१ रुग्ण, गोंदिया तीन तर गडचिरोली जिल्ह्यात ११ रुग्ण आढळून आले आहेत.सर्वाधिक मृत्यू वर्धा जिल्ह्यातया वर्षी डेंग्यूचे सर्वाधिक मृत्यू वर्धा जिल्ह्यात झाले आहेत. या जिल्ह्यात जानेवारी ते आतापर्यंत १५१ रुग्ण आढळून आले असून यातील पाच रुग्णांचे बळी गेले आहेत. आरोग्य विभाग याकडे विशेष लक्ष देऊन असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.नागपुरात कठोर उपाययोजनांकडे दुर्लक्षनागपूर शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना शासनाकडून वेळीच उपाययोजना झाल्या नाहीत. घराघरांची तपासणी करून डेंग्यू अळ्या शोधण्याचे व फवारणीचेच कार्य एवढ्यापुरतेच महानगरपालिकेचे आरोग्य विभागत मर्यादित राहिले आहे. वेळीच मनुष्यबळ, अद्यावत यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिली असती आणि डेंग्यू अळ्या आढळून येणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे अधिकार दिले असते तर आज चित्र वेगळे असते असे, तज्ज्ञांचे म्हणणे आहे.नागरिकांनी गंभीरतेने घ्यावेडेंग्यूला कारणीभूत असलेले एडीस डास हे जास्त करून शहरी वस्त्यांत आढळतात. या डासांवर पांढरे पट्टे असल्यामुळे ओळखायला सोपे जाते. रिकामे डबे, मडकी, चाकांचे टायर्स इत्यादींमध्ये साचलेल्या पाण्यात हे डास लवकर फैलावतात. यामुळे यातले पाणी दर आठवड्याला काढून त्यांचा तळ ब्रशने घासावा लागतो तरच चिकटलेली अंडी निघतात. डेंग्यूवर उपचार नाही, दिसून आलेल्या लक्षणांवर उपचार केला जातो. यामुळे या डासाची उत्पत्तीच होणार नाही यासाठी प्रत्येक नागरिकाने याला गंभीरतेने घेणे आवश्यक आहे.डॉ. संजय जयस्वालउपसंचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग

टॅग्स :dengueडेंग्यूDeathमृत्यू