शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

नागपूर जिल्ह्यात दरवर्षी वाढतेय बोअरवेलची संख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 10:58 IST

नागपूर जिल्ह्यात आजपर्यंत आठ हजारावर बोअरवेल खोदण्यात आल्या आहेत. दुसरीकडे दिवसेंदिवस जमिनीतील पाण्याची पातळी कमी होत आहे.

ठळक मुद्दे६०० फुटावर गेली पाण्याची पातळी नादुरुस्त बोअरवेलकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यात आजपर्यंत आठ हजारावर बोअरवेल खोदण्यात आल्या आहेत. दुसरीकडे दिवसेंदिवस जमिनीतील पाण्याची पातळी कमी होत आहे. कधी २५० ते ३०० फुटावर पाणी लागायचे. आता त्याच ठिकाणी ६०० ते ७०० फुटावर पाणी लागत आहे. टंचाई निवारणार्थ दरवर्षी बोअरवेलची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यात भूजलाची पातळी खोल गेली आहे.उन्हाळ्यात ग्रामीण भागातील पाण्याचे स्रोत कोरडे पडतात. त्यामुळे पाणी टंचाईला सुरुवात होते. प्रशासन दरवर्षी टंचाई निवारणार्थ आराखडा तयार क रते. यात उपाययोजनात्मक तरतुदीमध्ये सर्वाधिक बोअरवेलचा समावेश असतो. जिल्ह्यात १३ पंचायत समिती अंतर्गत सुमारे ७६८ ग्रा.पं.अंतर्गत १५५० वर गावे येतात. दरवर्षी जिल्ह्याचा टंचाई आराखडा हा सुमारे ३० कोटीच्या घरात असतो तर दुसरीकडे दिवसेंदिवस जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये बोअरवेल खोदकामांची संख्या दुपटीने वाढत चालली आहे. जि.प.च्या पाणी पुरवठा विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात ८३०० च्या वर बोअरवेल खोदण्यात आल्या आहेत. जिल्ह्याची लोकसंख्या वाढत चालल्यामुळे पाण्याची मागणी व जमिनीतील पाण्याचा उपसाही हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यामुळे जमिनीतील पाणी पातळी ही घटत चालली आहे. आताच भूजलातील पाण्याचे योग्य नियोजन झाले नाही, तर पुढील काही वर्षात पाण्याची समस्या ही आणखी तीव्र प्रमाणात भेडसावणार आहे.

चालू वर्षात ३९४ बोअरला मंजुरी १५ टक्के पूर्णदरवर्षी नव्याने बोअरवेल खोदण्यापेक्षा निर्लेखित केलेल्या बोअरवेलला पुनर्भरणाच्या दृष्टीने फ्लशिंग करुन बोअरमधील गाळ कचरा साफ करुन बोअरवेलचे पुनर्भरण केल्यास जमिनीतील पाण्याचा उपसा हा मर्यादित राहील. यासोबतच नव्याने बोअरवेल करण्याची गरज न भासता आहे त्या बोअरवेलच्याच माध्यमातून गावातील जनतेला पाण्याचा सुरळीत पुरवठा करता येईल. त्यासाठी ग्रामपंचायतीला मिळालेल्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्राम पंचायतींनी दरवर्षी आपल्या गावातील बोअरवेलचे फ्लशिंग करण्याचे नियोजन केल्यास, त्या जुन्याच बोअरमधून गावाची पाण्याची गरज भागेल व नवीन बोअरवेल करण्याची गरज भासणार नाही. यामुळे भूजल पातळीही घटणार नसल्याचे तज्ञांचे म्हणने आहे.

झमकोली गावात प्रयोग ठरला यशस्वीउपलब्ध बोअरवेल ड्राय झाली असल्यास तिच्या शेजारी १०० फुटाचे नवीन बोअर तयार करून त्यामध्ये स्लॉटेड पाईप सोडल्यास उपलब्ध बोअरमधून पिण्याच्या पाण्याची सोय होऊ शकते. हा प्रयोग जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील झमकोली गावात यशस्वी ठरला आहे. हाच प्रयोग जिल्ह्यातील इतरही गावात राबविल्यास तो यशस्वी होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई