शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात एनआरआय दाम्पत्याची ५५ लाखाने फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:03 IST

सायबर गुन्हेगारांनी एका एनआरआय दाम्पत्यास ५५ लाखाचा चुना लावला. तीन महिन्यानंतर या घटनेचा खुलासा झाल्यानंतर एनआरआय दाम्पत्याने धावपळ केली. बँकेच्या चुकीमुळे ही घटना घडल्याने त्यांना गमावलेले पैसे परत मिळाले.

ठळक मुद्देसायबर गुन्हेगारांचे कृत्य : बँकेने परत केली रक्कम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सायबर गुन्हेगारांनी एका एनआरआय दाम्पत्यास ५५ लाखाचा चुना लावला. तीन महिन्यानंतर या घटनेचा खुलासा झाल्यानंतर एनआरआय दाम्पत्याने धावपळ केली. बँकेच्या चुकीमुळे ही घटना घडल्याने त्यांना गमावलेले पैसे परत मिळाले.मीनाक्षी प्रसाद आणि त्यांची पत्नी विजया प्रसाद हे अमेरिकेत राहतात. ते मूळचे नागपूरचे आहेत. ते अमेरिकेत स्थायिक झाले. त्यांना अनिवासी भारतीय (एनआरआय)चा दर्जा मिळालेला आहे. प्रसाद दाम्पत्याचे किंग्सवे येथील आयसीआयसीआय बँकेत एनआरआय खाते आहे. फसवणुकीची घटना जुलै महिन्यातील आहे. अज्ञात आरोपींनी चेकने प्रसाद दाम्पत्याच्या खात्यातून ५५ लाख रुपये लंपास केले. ही रक्कम प्रसाद दाम्पत्याच्या मुंबई येथील उमंग ट्रेडर्सच्या खात्यातून ट्रान्सफर झाली. त्यानंतर ती काढण्यात आली. प्रसाद दाम्पत्य वर्षभरापासून भारतात आलेच नाही. त्यांना बँकेकडून पैसे काढण्यात आल्याचा कुठलाही एसएमएस आला नाही. यामुळे त्यांना त्यांच्या खात्यातून पैसे काढण्याबाबत माहितीच मिळाली नाही. आॅक्टोबर महिन्यात इ-स्टेटमेंट तपासले असता ही बाब लक्षात आली. प्रसाद दाम्पत्यांनी बँकेशी संपर्क केला. बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना चेकद्वारे पैसे काढण्यात आल्याचे सांगितले. तेव्हा प्रसाद यांना धक्का बसला.त्यांनी अधिकाºयांना सांगितले की, ते एक वर्षापासून भारतात आलेच नाही. तसेच त्यांनी बँकेकडून चेकबुक सुद्धा घेतले नसल्याचेही स्पष्ट केले.सूत्रानुसार बँकेने माहिती काढली असता प्रसाद दाम्पत्यांनी केलेला दावा खरा आढळून आला. प्रसाद दाम्पत्यांनी चेकबुकसाठी कुठलाही अर्ज केला नव्हता. ही रक्कम त्यांना वडिलोपार्जित संपत्तीच्या विक्रीतून मिळालेली होती.या दरम्यान प्रसाद दाम्पत्याने ई-मेल आणि कुरियरने शहर पोलिसांच्या सायबर सेलला तक्रार केली. सायबर सेलचे पीएसआय बलराम झाडोकर यांनी तपास सुरु केला. पोलिसांना विचारपूस दरम्यान ही रक्कम मुंबईतील उमंग ट्रेडर्सच्या खात्यातून काढण्यात आल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी बँकेला प्रसाद दाम्पत्यास चेकबुक प्रदान केल्याचे दस्तावेज मगितले. तेव्हापर्यंत ग्राहकाची कुठलही चूक नसल्याचे बँकेच्याही लक्षात आले होते. बँकेने प्रसाद दाम्पत्यास ५५ लाख रुपये परत केले. प्रसाद दाम्पत्याने या सहकार्याबाबत सायबर सेलचे आभार मानले.बँकेतील व्यक्तीवर संशयया प्रकरणात पोलिसांना बँकेशी जुळलेल्या व्यक्तीचा सहभाग असल्याचा संशय आहे. या प्रकारची फसवणूक जाणकार व्यक्तीच करू शकते. रक्कम परत मिळाल्याने प्रसाद दाम्पत्य तक्रार करण्यास इच्छुक नाही तर बँकेनेही या दिशेने अद्याप कुठलेही पाऊल उचलले नाही.नियमाचा ग्राहकाला लाभग्राहकाची कुठलीही चूक नसताना त्याच्या खात्यातून पैसे काढण्यात आले असेल तर अशा परिस्थितीत बँकेला नुकसान भरपाई द्यावी लागते. यासाठी ग्राहकाला तीन दिवसाच्या आत तक्रार दाखल करावी लागते. ग्राहकाला लगेच डिस्प्युट डिक्लेरेशन फार्म भरावा लागतो.चहा व्यापाऱ्यास तीन लाखाचा चुनाचहा व्यापाऱ्याची तीन लाखाने फसवणूक करणाऱ्या आरोपीविरुद्ध शांतिनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विनोद सव्वालाखे व योगेंद्र सव्वालाखे रा. कावरापेठ अशी आरोपीची नावे आहे.वाठोडा येथील रहिवासी जयकिशन शर्मा यांचे कावरापेठ येथे आकाश सेल्स कॉर्पोरेशन आहे. आरोपींनी शर्मा यांच्याशी ३ लाख १६ हजार रुपये किमतीचा २०२४ किलो चहा खरेदी केला. आरोपींनी हा चहा दुसऱ्या व्यापाऱ्याला विकून मिळालेली रक्कम परस्पर लंपास केली. शर्मा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.बंद घरातून दोन लाख रुपये उडवलेकळमना येथील एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपये चोरले. न्यू ओमसाईनगर येथील मो. यासिन युनुस लंघा हे २ डिसेंबर रोजी कुटुंबासह गुजरातला गेले होते. दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आलमारीत ठेवलेले पैसे चोरून नेले. मंगळवारी ते परत आले असता चोरी झाल्याचे उघडकीस आले. कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.बाईकवर बसवून महिलेचा विनयभंगएका महिलेचा पाठलाग करून तिला आपल्या बाईकवर बसवून विनयभंग करणाऱ्या आरोपीविरुद्ध गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हितेश भैसारे (३२ ) अंगुलीमालनगर इंदोरा असे आरोपीचे नाव अहे. आरोपी हितेशने मंगळवारी गिट्टीखदान पोलीस ठाणे हद्दीत एका महिलेचा पाठलाग केला. तिला आपल्या बाईकवर बसवून तिचा विनयभंग केला. महिलेच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.युवा अभियंत्याने केली आत्महत्याजरीपटका येथे एका युवा अभियंत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. गौतम विजय तिवारी (२६) रा. रमाईनगर जरीपटका, असे मृताचे नाव आहे. गौरवने नुकताच अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. त्याचे वडील पोलीस विभागात कार्यरत आहेत. गौरवने मंगळवारी दुपारी गळफास घेतला. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. जरीपटका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमbankबँक