शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

आता रक्त पिशव्यांचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:10 IST

सुमेध वाघमारे नागपूर : कोरोनामुळे ऐच्छिक रक्तदानाचे प्रमाण कमी झाल्याने आधीच अडचणीत आलेल्या शासकीय रक्तपेढ्यांना आता रक्त पिशव्यांच्या तुटवड्याला ...

सुमेध वाघमारे

नागपूर : कोरोनामुळे ऐच्छिक रक्तदानाचे प्रमाण कमी झाल्याने आधीच अडचणीत आलेल्या शासकीय रक्तपेढ्यांना आता रक्त पिशव्यांच्या तुटवड्याला तोंड द्यावे लागत आहे. सध्या डेंग्यूमुळे दोन्ही रक्तपेढीत रोज २५ ते ३० प्लेटलेट्सची मागणी होत आहे; मात्र पिशवीच नसल्याने प्लेटलेट्स देणार कसे, हा प्रश्न आहे. परिणामी, रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे.

डेंग्यू व डेंग्यूसदृश आजाराचे घराघरांत रुग्ण दिसून येत आहेत. या आजारावर अँटिबायोटिक किंवा अँटिव्हायरल औषध नाही. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो. डेंग्यूचा गंभीर रुग्णांमध्ये शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी होण्याचा धोका असतो. जेव्हा ‘प्लेटलेट्स काऊंट १५ हजार प्रती मायक्रोलिटरपेक्षा खाली येतात तेव्हा त्याला ‘लो प्लेटलेट्स’ मानले जाते. अशावेळी रुग्णाला ‘रँडम डोनर प्लेटलेट्स’ (आरडीपी) किंवा ‘सिंगल डोनर प्लेटलेट्स’ (एसडीपी) दिले जाते. परंतु, कोरोनामुळे रक्तदानाची मोहीम थंडावल्याने प्लेटलेट्सचा तुटवडा पडला आहे. यातच प्लेटलेट्स देण्यासाठी मेयो, मेडिकलमध्ये पिशव्याच (बॅग) नसल्याने रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. गरीब रुग्णांवर पदरमोड करून खासगी रक्तपेढीतून प्लेटलेट्स आणण्याची वेळ आली आहे.

-ट्रिपल बॅगच्या मागणीत वाढ

एका रक्तदात्याचा रक्तातून लाल पेशी, ‘प्लेटलेट्स’, ‘प्लाझ्मा’ अशा तीन घटकांना वेगळे करता येते. यासाठी ट्रिपल बॅगची गरज पडते. सूत्रानूसार, कोरोनामुळे या बॅगच्या उत्पादनावर प्रभाव पडला आहे. कोरोना कमी होताच रक्त व रक्तघटकांच्या मागणीत वाढ झाली आहे. यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठादारांकडून कमी पुरवठा होत असल्याची माहिती आहे.

-वर्षभरापासून ‘एमएसएसीएस’तर्फे पुरवठा बंद

शासकीय रुग्णालयांच्या रक्तपेढ्यांना महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेतर्फे (एमएसएसीएस) रक्त पिशव्यांचा पुरवठा केला जातो. परंतु, कोरोनामुळे मागील वर्षभरापासून मेयो व मेडिकलच्या रक्तपेढ्यांना या संस्थेतर्फे पिशव्यांचा पुरवठाच झाला नाही. यामुळे दोन्ही रुग्णालयांवर या बॅग विकत घेण्याची वेळ आली आहे. मेयोने संबंधित पुरवठादाराकडे बॅगची मागणी केली आहे. परंतु, त्याच्याकडून अद्याप पिशव्या उपलब्ध झाल्या नाही, तर मेडिकलने बॅगचा खरेदीसाठी निविदा मागविल्या आहेत. परंतु, यात १५ दिवसांवर कालावधी लागणार असल्याने तोपर्यंत रक्तपेढी बंद करायची का, असा प्रश्न आहे.