शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

आता स्वाईन फ्लूचा धोका ‘मास्क’मुळे

By admin | Updated: February 22, 2015 02:21 IST

स्वाईन फ्लूचा पडलेला विळखा लक्षात घेत आरोग्य विभागाकडून नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

नागपूर : स्वाईन फ्लूचा पडलेला विळखा लक्षात घेत आरोग्य विभागाकडून नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, स्वाईन फ्लूचा संसर्ग होऊ नये म्हणून मास्कचा वापर वाढला आहे. विशेषत: शासकीय इस्पितळात डॉक्टरांसह बहुसंख्य रुग्ण व त्यांचे नातेवाईक मास्क घालून वावरताना दिसून येत आहे, परंतु वापरलेले मास्क कचरापेटीत न टाकता उघड्यावर कुठेही फेकण्याची वृत्ती वाढल्याने आजार कमी होण्यापेक्षा तो पसरण्याची शक्यता आहे. शहर स्वाईन फ्लूच्या दहशतीत आहेत. आतापर्यंत २२ रुग्णांचा मृत्यू झाला असून १३३ रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. स्वाईन फ्लूच्या संसर्गपासून दूर राहण्यासाठी अनेक रुग्ण मास्क घालून आपले दैनंदिन काम करताना दिसून येत आहे. विशेषत: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) मास्क घालणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याला कारण म्हणजे मेडिकलमध्ये आतापर्यंत १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या शिवाय येथील ३० खाटाच्या स्वाईन फ्लू वॉर्डात २० तर बालरुग्णाच्या स्वाईन फ्लू वॉर्डात ९ रुग्ण उपचार घेत आहेत.यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. खबरदारी म्हणून रुग्णालयातील बहुसंख्य डॉक्टरांसोबतच, परिचारिका, कर्मचारी रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक मास्कमध्येच दिसून येत आहे. मेडिकल प्रशासनही यावर जोर देत आहे. परंतु वापरण्यात आलेले मास्कची विल्हेवाट योग्य पद्धतीने होत नसल्याचे दिसून येत आहे. विशेषत: डॉक्टरांसह रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक वापरलेले मास्क कुठेही फेकून देत असल्याचे चित्र आहे. अपघात विभागाच्यासमोर, सायकल स्टॅण्डवर तर मास्कचा सडा पडलेला आहे. यामुळे स्वाईन फ्लूचा संसर्ग वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, तर मास्कच्या वाढत्या कचऱ्याची समस्या मेडिकलसाठी डोकेदुखी ठरत आहे.(प्रतिनिधी)