शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन मागे देण्याची शक्यता 
2
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
3
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
4
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
5
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
6
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
7
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
8
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
9
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
10
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
11
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
12
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू
13
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
14
Rahul Gandhi: "मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
15
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
16
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
17
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
18
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
19
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट

आता १० व १२ वीच्या परिक्षेत प्रश्नांचा ‘पॅटर्न’ बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 10:35 IST

राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमाची गुणवत्ता सुधारण्याच्या प्रयत्नात असलेल्या राज्य शिक्षण मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गत प्रश्नपत्रिकांमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या पॅटर्नमध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देबोर्डाचा निर्णयशिक्षकांसाठी होणार कार्यशाळा

आशिष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमाची गुणवत्ता सुधारण्याच्या प्रयत्नात असलेल्या राज्य शिक्षण मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गत प्रश्नपत्रिकांमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या पॅटर्नमध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे. वर्ग १० वी व १२ व्या वर्गाच्या बोर्डाच्या परीक्षेत प्रश्नांच्या पॅटर्न बदल होणार असून येत्या मार्च २०१९ पासून अंमलबजावणी होणार असल्याची माहिती बोर्डाच्या सूत्रांनी दिली आहे.लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार प्रश्नांच्या नवीन पद्धतीबाबत शिक्षकांना माहिती देण्यासाठी शिक्षण मंडळातर्फे सप्टेंबर- आॅक्टोबर महिन्यात विशेष कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या कार्यशाळेत राज्यभरातील शिक्षकांना बोलाविण्यात येणार आहे, ज्यामुळे बदललेल्या पद्धतीची माहिती ते विद्यार्थ्यांना देऊ शकतील. या कार्यशाळेच्या आयोजनाची तयारी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रश्नांची ही नवी पद्धत वर्तमान पद्धतीपेक्षा पूर्णपणे भिन्न असेल. विशेषत्वाने भाषा विषयांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये प्रश्न वेगळे असतील. मिळालेल्या माहितीनुसार नवीन पद्धतीत विद्यार्थ्यांच्या संवादकौशल्यावर (कम्युनिकेशन स्कील) अधिक भर राहणार आहे. त्यांच्या अभ्यास व लेखनकौशल्याचे आकलन केले जाणार आहे. मंडळाचे विभागीय सचिव रविकांत देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता, हा बदल होणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र हे बदल कशा प्रकारचे असतील, याबाबत स्पष्ट नसल्याचे त्यांनी सांगितले. या विषयावर पुण्यात बैठक होणार असून नंतरच स्थिती स्पष्ट होणार असल्याचे ते म्हणाले.

सीबीएसईचा स्तर गाठण्यावर भरनव्या बदलाच्या माध्यमातून राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) च्या स्तराचा करण्यासाठी प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जेईई व नीट आदींसारख्या परीक्षांची वेगळी तयारी करावी लागणार नाही. गेल्या काही वर्षात राज्य मंडळाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या रोडावत चालली असून सीबीएसईकडे विद्यार्थी व पालकांचा कल वाढला आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी मंडळाकडून प्रयत्न केले जात असल्याचे संकेत यातून मिळत आहेत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र