शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आता १० व १२ वीच्या परिक्षेत प्रश्नांचा ‘पॅटर्न’ बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 10:35 IST

राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमाची गुणवत्ता सुधारण्याच्या प्रयत्नात असलेल्या राज्य शिक्षण मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गत प्रश्नपत्रिकांमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या पॅटर्नमध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देबोर्डाचा निर्णयशिक्षकांसाठी होणार कार्यशाळा

आशिष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमाची गुणवत्ता सुधारण्याच्या प्रयत्नात असलेल्या राज्य शिक्षण मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गत प्रश्नपत्रिकांमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या पॅटर्नमध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे. वर्ग १० वी व १२ व्या वर्गाच्या बोर्डाच्या परीक्षेत प्रश्नांच्या पॅटर्न बदल होणार असून येत्या मार्च २०१९ पासून अंमलबजावणी होणार असल्याची माहिती बोर्डाच्या सूत्रांनी दिली आहे.लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार प्रश्नांच्या नवीन पद्धतीबाबत शिक्षकांना माहिती देण्यासाठी शिक्षण मंडळातर्फे सप्टेंबर- आॅक्टोबर महिन्यात विशेष कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या कार्यशाळेत राज्यभरातील शिक्षकांना बोलाविण्यात येणार आहे, ज्यामुळे बदललेल्या पद्धतीची माहिती ते विद्यार्थ्यांना देऊ शकतील. या कार्यशाळेच्या आयोजनाची तयारी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रश्नांची ही नवी पद्धत वर्तमान पद्धतीपेक्षा पूर्णपणे भिन्न असेल. विशेषत्वाने भाषा विषयांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये प्रश्न वेगळे असतील. मिळालेल्या माहितीनुसार नवीन पद्धतीत विद्यार्थ्यांच्या संवादकौशल्यावर (कम्युनिकेशन स्कील) अधिक भर राहणार आहे. त्यांच्या अभ्यास व लेखनकौशल्याचे आकलन केले जाणार आहे. मंडळाचे विभागीय सचिव रविकांत देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता, हा बदल होणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र हे बदल कशा प्रकारचे असतील, याबाबत स्पष्ट नसल्याचे त्यांनी सांगितले. या विषयावर पुण्यात बैठक होणार असून नंतरच स्थिती स्पष्ट होणार असल्याचे ते म्हणाले.

सीबीएसईचा स्तर गाठण्यावर भरनव्या बदलाच्या माध्यमातून राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) च्या स्तराचा करण्यासाठी प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जेईई व नीट आदींसारख्या परीक्षांची वेगळी तयारी करावी लागणार नाही. गेल्या काही वर्षात राज्य मंडळाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या रोडावत चालली असून सीबीएसईकडे विद्यार्थी व पालकांचा कल वाढला आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी मंडळाकडून प्रयत्न केले जात असल्याचे संकेत यातून मिळत आहेत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र