शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

आता १० व १२ वीच्या परिक्षेत प्रश्नांचा ‘पॅटर्न’ बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 10:35 IST

राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमाची गुणवत्ता सुधारण्याच्या प्रयत्नात असलेल्या राज्य शिक्षण मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गत प्रश्नपत्रिकांमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या पॅटर्नमध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देबोर्डाचा निर्णयशिक्षकांसाठी होणार कार्यशाळा

आशिष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमाची गुणवत्ता सुधारण्याच्या प्रयत्नात असलेल्या राज्य शिक्षण मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गत प्रश्नपत्रिकांमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या पॅटर्नमध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे. वर्ग १० वी व १२ व्या वर्गाच्या बोर्डाच्या परीक्षेत प्रश्नांच्या पॅटर्न बदल होणार असून येत्या मार्च २०१९ पासून अंमलबजावणी होणार असल्याची माहिती बोर्डाच्या सूत्रांनी दिली आहे.लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार प्रश्नांच्या नवीन पद्धतीबाबत शिक्षकांना माहिती देण्यासाठी शिक्षण मंडळातर्फे सप्टेंबर- आॅक्टोबर महिन्यात विशेष कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या कार्यशाळेत राज्यभरातील शिक्षकांना बोलाविण्यात येणार आहे, ज्यामुळे बदललेल्या पद्धतीची माहिती ते विद्यार्थ्यांना देऊ शकतील. या कार्यशाळेच्या आयोजनाची तयारी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रश्नांची ही नवी पद्धत वर्तमान पद्धतीपेक्षा पूर्णपणे भिन्न असेल. विशेषत्वाने भाषा विषयांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये प्रश्न वेगळे असतील. मिळालेल्या माहितीनुसार नवीन पद्धतीत विद्यार्थ्यांच्या संवादकौशल्यावर (कम्युनिकेशन स्कील) अधिक भर राहणार आहे. त्यांच्या अभ्यास व लेखनकौशल्याचे आकलन केले जाणार आहे. मंडळाचे विभागीय सचिव रविकांत देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता, हा बदल होणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र हे बदल कशा प्रकारचे असतील, याबाबत स्पष्ट नसल्याचे त्यांनी सांगितले. या विषयावर पुण्यात बैठक होणार असून नंतरच स्थिती स्पष्ट होणार असल्याचे ते म्हणाले.

सीबीएसईचा स्तर गाठण्यावर भरनव्या बदलाच्या माध्यमातून राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) च्या स्तराचा करण्यासाठी प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जेईई व नीट आदींसारख्या परीक्षांची वेगळी तयारी करावी लागणार नाही. गेल्या काही वर्षात राज्य मंडळाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या रोडावत चालली असून सीबीएसईकडे विद्यार्थी व पालकांचा कल वाढला आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी मंडळाकडून प्रयत्न केले जात असल्याचे संकेत यातून मिळत आहेत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र