शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

आता कुणालाही ‘अभय’ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 00:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मालमत्ता कर आणि पाणी कर थकीत असलेल्या नागरिकांसाठी अभय योजना जाहीर केली होती. योजनेला १० आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु थकबाकीदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने थकबाकी वसुलीसाठी मालमत्ता जप्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यात ४९५ ...

ठळक मुद्देमनपाने जप्त केल्या ४९५ मालमत्ता : थकबाकी न भरल्यास लिलाव करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मालमत्ता कर आणि पाणी कर थकीत असलेल्या नागरिकांसाठी अभय योजना जाहीर केली होती. योजनेला १० आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु थकबाकीदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने थकबाकी वसुलीसाठी मालमत्ता जप्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यात ४९५ मालमत्ता जप्त करण्यात आलेल्या आहेत.

वाढीव मुदतीतही प्रतिसाद नाहीमालमत्ता व पाणीपट्टीची ४५८ कोटींची थकबाकी होती. थकबाकी वसुलीसाठी १७ जुलै ते ७ आॅगस्ट या कालावधीत अभय योजना राबविण्यात आली. परंतु ३९.३१ कोटींचीच वसुली झाली. या योजनेला प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा तीन दिवस मुदतवाढ देण्यात आली. यात ४.८६ कोटींची थकबाकी वसुली झाली. थकबाकीचा विचार करता वसुली १० टक्केही होऊ शकली नाही.या मालमत्ता जप्त करून हुकूमनामे काढण्यात आले आहे. संबंधितांना नोटीस बजावण्यात आल्या आहे. मालमत्ता जप्त केल्यानतंर ३१ दिवसात थकबाकी न भरल्यास मालमत्तांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबतचा जाहीरनामा प्रकाशित केल्यानतंर १५ दिवसात लिलावाची तारीख निश्चित केली जाणार आहे.जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांचे रेडिरेकनरच्या दरानुसार लिलावाची किंमत निश्चित क रण्यात येईल. यातून मालमत्ता कराची थकबाकी, हुकूमनामे व लिलाव प्रक्रियेचा खर्च वसूल करण्यात येईल. त्यानंतर रक्कम शिल्लक असल्यास ती मालमत्ताधारकांना दिली जाणार आहे. गेल्या गुरुवारी थकबाकी वसुलीचा आढावा घेण्यात आला. यात थकबाकी वसुलीसाठी झोनच्या सहायक आयुक्तांना मालमत्ता जप्त करून लिलाव प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार कारवाई सुरू आहे. मालमत्ता व पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी आॅगस्टपर्यंत अभय योजना राबविण्यात आली. परंतु ४५८ कोटींच्या थकबाकीपैकी ४४.१७ कोटींची वसुली झाली. मालमत्ताकरातून ३० कोटी ४६ लाख ८७ हजारांची वसुली झाली तर पाणीपट्टीतून १३.६१ कोटींचा महसूल जमा झाला आहे.४.५० कोटींची थकबाकीजप्त करण्यात आलेल्या ४९५ मालमत्ताधारकांकडे ४.५० कोटींची थकबाकी आहे. वारंवार नोटीस बजावण्यात आल्यानंतरही ही थकबाकी भरण्यात आलेली नाही. अभय योजनेतही मालमत्ताधारकांनी थकबाकी भरलेली नाही. त्यामुळे कर आकारणी व संकलन विभागाने मालमत्ता जप्त क रून लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे.मालमत्ता कर अभय योजनेंतर्गत मालमत्ताधारकांना थकीत करातील दंडाची रक्कम ९० टक्के तर थकीत पाणी बिलावरील विलंब शुल्क किंवा दंडाच्या रकमेत १०० टक्के सूट देण्यात आली होती. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. प्रत्यक्षात या योजनेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मालमत्ता व पाणीकरातून ४४.१७ कोटींची वसुली करण्यात आली. थकबाकी वसुलीसाठी जप्ती मोहीम सक्षम राबविली जाणार आहे.- मिलिंद मेश्राम, सहायक आयुक्त,कर आकारणी व कर संकलन