शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

आता मतांसाठी कुणालाही लोणी लावणार नाही, पटले तर मत द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2023 22:17 IST

Nagpur News मी याअगोदरदेखील निवडणूक जिंकलो आहे. मात्र आता मी फार लोणी लावायला तयार नाही. लोकांना पटले तर त्यांनी मत द्यावे. मी नसेल तर कुणी नवीन येईल. पण मला आता समाजकारण व विकासाच्या कामांना जास्त वेळ द्यायचा आहे, असे गडकरी म्हणाले.

नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणात आता जास्त रस राहिला नसल्याचे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुुवया उंचावल्या आहेत. मी एकतर प्रेमाने काम करवून घेतो किंवा कठोर होतो. मी याअगोदरदेखील निवडणूक जिंकलो आहे. मात्र आता मी फार लोणी लावायला तयार नाही. लोकांना पटले तर त्यांनी मत द्यावे. मी नसेल तर कुणी नवीन येईल. पण मला आता समाजकारण व विकासाच्या कामांना जास्त वेळ द्यायचा आहे, असे गडकरी म्हणाले. रविवारी एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

मला कुणी कुठे सोडायला आलेले आवडत नाही. तसेच मला हार घातले तर मी विचलित होतो. त्यामुळे सत्कार सोहळ्याला जाणे मला फारसे रुचत नाही. मी आजवर प्रचारासाठी कटआऊट लावले नाही व पुढेदेखील लावणार नाही, असे गडकरी यांनी सांगितले. माझ्या अनुभवातून मी एक गोष्ट शिकलो आहे की नवीन कल्पना प्रत्यक्षात आणायला वेळ लागतो. मी २००४ सालापासून इथेनॉलच्या गोष्टी करायचो व लोक प्रश्न निर्माण करायचे. आता याच इथेनॉलला लोकांनी स्वीकारले आहे. आपल्याकडील लोकांना पर्यावरणाचे महत्त्व कळत नाही. मुख्य प्रवाहातील लोक पर्यावरण, जलसंवर्धनाचे महत्त्व समजून घेत नाहीत, असेदेखील ते म्हणाले.

म्हणून मी डॉक्टर लावत नाही

मला आजवर सहा डी.लिट. मिळाल्या. पण मी नावासमोर डॉक्टर लावत नाही. मी थर्डक्लासमध्ये सिनेमा पाहणारा व फुटपाथवर खाणारा व्यक्ती आहे. मला बारावीला ५२ टक्के मिळाले होते व अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळू शकला नाही. पण मला त्याचे शल्य नव्हते. मला प्रॅक्टिकल वागण्यात जास्त आनंद मिळायचा व आजदेखील मिळतो, असे गडकरी म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी