शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आता संत्रा मार्केटमध्येही सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा : बाजार बंद करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 23:07 IST

कळमन्यातील फळ बाजार आठवड्यातून तीन दिवसच सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याने आता संत्रा मार्केटमध्ये व्यापारी, अडतिया, शेतकरी आणि नागरिकांची गर्दी वाढली आहे. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा होत असून, कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे कळमना फळ बाजार आठवड्यात तीन दिवसच

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कळमन्यातील फळ बाजार आठवड्यातून तीन दिवसच सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याने आता संत्रा मार्केटमध्ये व्यापारी, अडतिया, शेतकरी आणि नागरिकांची गर्दी वाढली आहे. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा होत असून, कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. कॉटन मार्केट आणि कळमना भाजी बाजाराप्रमाणेच संत्रा मार्केटही बंद करण्याची मागणी काही सजग नागरिकांनी लोकमतकडे लावून धरली आहे.कोविड-१९ लॉकडाऊनमध्ये कळमन्यातील सर्व बाजारात होणारी गर्दी पाहता, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बाजाराचे वेळापत्रक ठरवून दिले आहे. त्यानुसार फळ बाजार मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी सुरू राहणार असून, आठवड्यात तीन दिवस बाजार सुरू राहणार असल्याने उर्वरित दिवस फळांची विक्री कुठे करायची, असा प्रश्न अडतिया आणि व्यापाऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे एरवी गर्दी नसलेल्या कॉटन मार्केटलगतच्या संत्रा मार्केटमध्ये व्यापारी, अडतिया, उत्पादक शेतकरी आणि नागरिकांची गर्दी होत आहे. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा होत आहे.व्यापारी व अडतियांनी निवडला दुसरा पर्यायजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बुधवारी कळमना फळ बाजार बंद होता. पण व्यापारी आणि अडतियांनी फळांच्या गाड्या संत्रा मार्केटमध्ये बोलविल्या. व्यापारी आणि अडतियांनी या ठिकाणी संत्र्याचा लिलावही करण्यात आला आणि मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री झाली. कळमन्याच्या तुलनेत संत्रा मार्केटमध्ये जागा फारच कमी आहे. एवढ्याशा जागेत बुधवारी सकाळी ७ ते १० या वेळेत पाच हजारापेक्षा जास्त लोकांची गर्दी होती, अशी माहिती आहे.संत्र्याच्या हंगामाचे काहीच दिवस उरले आहेत. याशिवाय अननस, द्राक्षांचा मोसम सुरू आहे. कळमन्यात नागपूर जिल्ह्यातून संत्री, महाराष्ट्रातून द्राक्षे आणि अन्य राज्यातून विविध फळांची आवक सुरू आहे. मार्च ते मे महिन्यात फळांची दररोज सर्वाधिक आवक असते. त्यामुळे एक दिवसाआड फळांची विक्री करणे उत्पादक आणि व्यापाºयांना परवडणारे नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांचे लक्ष नसलेल्या संत्रा मार्केटचा पर्याय व्यापारी आणि अडतियांनी निवडल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार