शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

नाऊ इंडिया इज नंबर वन

By admin | Updated: September 27, 2014 02:40 IST

आतापर्यंत भारताचा तिसऱ्या, चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर उल्लेख केला जात होता. मंगळ मोहीम यशस्वी झाल्यामुळे भारत पहिल्या क्रमांकावर आला आहे.

नागपूर : आतापर्यंत भारताचा तिसऱ्या, चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर उल्लेख केला जात होता. मंगळ मोहीम यशस्वी झाल्यामुळे भारत पहिल्या क्रमांकावर आला आहे. ‘नाऊ इंडिया इज नंबर वन’ अशा भावना माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी व्यक्त केल्या.विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (व्हीएनआयटी) नागपूरतर्फे आयोजित ‘अ‍ॅक्सिस-२०१४’ वार्षिक तांत्रिक प्रदर्शनाचे आज, शुक्रवारी कलाम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष विश्राम जामदार, संचालक नरेंद्र चौधरी, प्रदर्शनाचे प्रभारी डॉ. यशवंत काटपाताळ व डॉ. जे. पी. सिंग व्यासपीठावर उपस्थित होते.व्हीएनआयटी परिसरातील हिरवळ पाहून कलाम प्रभावित झाले. वातावरणातील कार्बनडाय आॅक्साईड कमी करण्यासाठी वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने वृक्ष संवर्धनाचा पण केल्यास एक सुंदर भारत घडविता येईल, असे ते म्हणाले. आपण अनेक अचंबित करणारे वैज्ञानिक शोध लावले. त्या-त्या वैज्ञानिकांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून तुम्ही स्वत:लाच विचारा की आपण काय मिळविले. अविष्कार घडविण्यासाठी समर्पणाची भावना, आत्मविश्वास व परिश्रम आवश्यक आहे. तेव्हाच तुम्हाला हवे ते प्राप्त करता येईल, असे सांगून कलाम यांनी ‘आय विल फ्लाय’ कविता ऐकविली. जीवनात नेहमीच समस्या येत असतात. समस्यांना स्वत:वर हावी होऊ देऊ नका. तंत्रज्ञानात अपयश येतच असते. समस्यांवर मात करा. यशस्वी होण्यासाठी हे आवश्यक आहे. कोणत्याही एका क्षेत्राची निवड करून नवनवीन शोध लावा, असे आवाहन कलाम यांनी केले. (प्रतिनिधी)