शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

नाऊ इंडिया इज नंबर वन

By admin | Updated: September 27, 2014 02:40 IST

आतापर्यंत भारताचा तिसऱ्या, चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर उल्लेख केला जात होता. मंगळ मोहीम यशस्वी झाल्यामुळे भारत पहिल्या क्रमांकावर आला आहे.

नागपूर : आतापर्यंत भारताचा तिसऱ्या, चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर उल्लेख केला जात होता. मंगळ मोहीम यशस्वी झाल्यामुळे भारत पहिल्या क्रमांकावर आला आहे. ‘नाऊ इंडिया इज नंबर वन’ अशा भावना माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी व्यक्त केल्या.विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (व्हीएनआयटी) नागपूरतर्फे आयोजित ‘अ‍ॅक्सिस-२०१४’ वार्षिक तांत्रिक प्रदर्शनाचे आज, शुक्रवारी कलाम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष विश्राम जामदार, संचालक नरेंद्र चौधरी, प्रदर्शनाचे प्रभारी डॉ. यशवंत काटपाताळ व डॉ. जे. पी. सिंग व्यासपीठावर उपस्थित होते.व्हीएनआयटी परिसरातील हिरवळ पाहून कलाम प्रभावित झाले. वातावरणातील कार्बनडाय आॅक्साईड कमी करण्यासाठी वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने वृक्ष संवर्धनाचा पण केल्यास एक सुंदर भारत घडविता येईल, असे ते म्हणाले. आपण अनेक अचंबित करणारे वैज्ञानिक शोध लावले. त्या-त्या वैज्ञानिकांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून तुम्ही स्वत:लाच विचारा की आपण काय मिळविले. अविष्कार घडविण्यासाठी समर्पणाची भावना, आत्मविश्वास व परिश्रम आवश्यक आहे. तेव्हाच तुम्हाला हवे ते प्राप्त करता येईल, असे सांगून कलाम यांनी ‘आय विल फ्लाय’ कविता ऐकविली. जीवनात नेहमीच समस्या येत असतात. समस्यांना स्वत:वर हावी होऊ देऊ नका. तंत्रज्ञानात अपयश येतच असते. समस्यांवर मात करा. यशस्वी होण्यासाठी हे आवश्यक आहे. कोणत्याही एका क्षेत्राची निवड करून नवनवीन शोध लावा, असे आवाहन कलाम यांनी केले. (प्रतिनिधी)